शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याला दिलसा, पॉझिटिव्हिटी दोन टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:09 IST

अमरावती : चार महिन्यांपासून वाढलेले कोरोनाचे संक्रमण आता कमी झालेले आहे. बुधवारी जिल्ह्याची पॉझिटिव्हिटी २.१३ टक्केच नोंद झाल्याने जिल्ह्याला ...

अमरावती : चार महिन्यांपासून वाढलेले कोरोनाचे संक्रमण आता कमी झालेले आहे. बुधवारी जिल्ह्याची पॉझिटिव्हिटी २.१३ टक्केच नोंद झाल्याने जिल्ह्याला दिलासा मिळाला आहे. त्यामुळे जिल्ह्याची आता अनलॉककडे वाटचाल सुरू झालेली आहे. येत्या आठवड्यात जिल्हा अनलॉक होण्याची शक्यता आहे.

राज्य शासनाने लॉकडाऊन हटविण्यासंदर्भात पाच स्तर दिले आहेत. त्यात जिल्हा तिसऱ्या स्तरात आहे. मात्र, चार दिवसांपासून सातत्याने रुग्णसंख्येत कमी आलेली आहे. याशिवाय पॉझिटिव्हिटी दोन ते तीन टप्प्याच्या दरम्यान आहे. याशिवाय मृत्यूसंख्येतही कमी आलेली आहे. आता ८० टक्के ऑक्सिजन बेड रिक्त आहेत. जिल्ह्याची अशीच वाटचाल राहिल्यास पुढील आठवड्यात जिल्हा अनलॉक होण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाने वर्तविली आहे.

जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यांपासून कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली व साधारणपणे चार महिन्यात या लाटेने अवघा जिल्हाच व्यापला. या कालावधीत ७०,४६९ पॉझिटिव्ह व १,०४३ रुग्णांचे मृत्यू झालेले आहेत. वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी २० फेब्रुवारीपासून वीकएंड कर्फ्यू लावला होता. तेव्हापासून आतापर्यंत कमी-अधिक प्रमाणात संचारबंदी सुरूच आहे. मात्र, आता संसर्गात कमी आल्याने जिल्ह्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मात्र, नागरिकांनी त्रिसूत्रीसह कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे पालन करणे महत्त्वाचे ठरणार आहे.

पाईंटर

जिल्ह्याची पॉझिटिव्हिटी (टक्के)

दिनांक पॉझिटिव्ह पॉझिटिव्हिटी

४ जून ३२० ४.४४

५ जून २९४ ४.६०

६ जून २९९ ४.९१

७ जून २०८ ३.५६

८ जून २०१ २.९६

९ जून १३४ २.१३

बॉक्स

अनलॉकचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना

जिल्ह्यात संचारबंदी हटविण्या संदर्भातील अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहे. यासंदर्भात पाच लेव्हल तयार करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये जिल्हा तिसऱ्या स्थानी होता. याबाबत पॉझिटिव्हिटी पाच ते दहा टक्क्यांच्या दरम्यान व ऑक्सिजन बेड ४० टक्क्यांवर व्यापले असेल, असा निकष आहे. आता जिल्ह्यात अशी परिस्थिती नाही. त्यामुळे निकष हटविण्याची मागणी होत आहे.

बॉक्स

- तर मिळणार अर्थचक्राला गती

जिल्ह्यात ७ जूनपासून लॉकडाऊनच्या निकषात काहीअंशी बदल केले आहेत. बिगर जीवनावश्यक दुकानांसाठी विकएंड कर्फ्यू सुरूच आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने जिल्ह्याच्या अर्थचक्राला गती द्यायची असेल तर लॉकडाऊन हटविणे आवश्यक आहे. तसे पाहता जिल्ह्यात २० फेब्रुवारीपासून कमी-अधिक प्रमाणात मिनी लॉकडाऊन सुरूच असल्याने नागरिकांच्या संतप्त भावना आहेत.

कोट

किमान एक आठवडा पॉझिटिव्हिटी कमी यायला पाहिजे, असे झाल्यास पुढच्या आठवड्यात जिल्हा अनलॉक होऊ शकतो. याकरिता नागरिकांनी त्रिसूत्रीचे पालन करणे गरजेचे आहे. संसर्ग वाढल्यास पुन्हा निर्बंध वाढणार आहे.

- शैलेश नवाल,

जिल्हाधिकारी