शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

फसव्या कर्जमाफी विरोधात काँग्रेसचा लढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 00:13 IST

राज्यातील भाजप सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी जी घोषणा केली ते पूर्णत: फसवी आहे.

बैठकीत निर्धार : संपूर्ण सातबारा कोराच हवालोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्यातील भाजप सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी जी घोषणा केली ते पूर्णत: फसवी आहे. त्यामुळे फडणवीस सरकारच्या या फसव्या कर्जमाफीसाठी आता जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमेटीच्यावतीने तीव्र लढा उभारण्याचा निर्णय मंगळवारी पार पडलेल्या जिल्हा काँग्रेसच्या बैठकीत घेण्यात आला. कर्जमाफीसाठी जनजागृती मोहीम राबविली जाणार आहे. शेतकऱ्यांकडून कर्जमाफीचे अर्ज करून घेतले जाणार आहेत. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख हे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून पक्ष निवडणूक निरीक्षक सतिंदर पाल सिंह गिल, पक्ष निरीक्षक बंडू सावरबांधे, शेखर शेंडे, आ. वीरेंद्र जगताप, यशवंत शेरेकर, नरेंशचंद्र ठाकरे, केवलराम काळे, विद्या देडू, झेडपी अध्यक्ष नितीन गोंडाणे, सभापती जयंत देशमुख आदी उपस्थित होते. यावेळी बैठकीत केंद्र व राज्यातील भाजप सरकारने निवडणूकीत अनेक आश्वासने नागरिक व शेतकऱ्यांना दिलीत. मात्र केवळ घोषणा बाजी करून सर्वसामान्याचे जगणे मुश्किल करणाऱ्या भाजप सरकारचा खरा चेहरा आता जनतेसमोर आला आहे. याशिवाय बैठकीत काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बाबीवरही विस्तुत चर्चा करण्यात आली. बैठकीला सुधाकर भारसाकळे, रावसाहेब लंगोटे, बंडू देशमुख, प्रकाश काळबांडे,किशोर बोरकर, गिरीश कराळे, सतीश हाडोळे, प्रमोद दाळू, राजू कुरेशी, अभिजित देवके, बापुराव गायकवाड, वासंती मंगरोळे व पदाधिकारी उपस्थित होते.