शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राच्या विरोधात काँग्रेसचा एल्गार

By admin | Updated: January 22, 2015 00:17 IST

केंद्र व राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी व सामान्य जनतेला याचा परिणाम सहन करावा लागत आहे. त्यामुळे या चुकीच्या धोरणाविरोधात बुधवारी ..

अमरावती : केंद्र व राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी व सामान्य जनतेला याचा परिणाम सहन करावा लागत आहे. त्यामुळे या चुकीच्या धोरणाविरोधात बुधवारी शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी किरण गीत्ते यांच्यामार्फत शासनाला पाठविण्यात आले आहे. विविध अस्मानी संकटांनी शेतकरी उद्ध्वस्त झाल्यामुळे राज्य शासनाने कोरडवाहू शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हेक्टरी २५ हजार तर ओलिताच्या शेतीकरिता ५० हजार रुपये आर्थिक मदत तत्काळ जमा करावी. संपूर्ण कर्ज माफ करावे, शेतीसाठी २४ तास वीजपुरवठा करण्याची गरज आहे. मात्र केंद्रातील व राज्यातील सरकार शेतकरीविरोधी भूमिका घेऊन शेतकऱ्यांप्रती उदासीन आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय द्यावा तसेच पेट्रोल व डिझेलचे दर काँग्रेस पक्षाच्या कार्यकाळात कमी झाले होते व यामुळे ग्राहकांनाही दिलासा मिळाला होता. मात्र केंद्रातील मोदी सरकारने आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्चा तेलाच्या किमती व भारतातील पेट्रोल पदार्थाची तुलना करणारे तक्ते पाहिले असता सध्या पेट्रोलिंग कंपन्या सामान्य ग्राहकांची लूट करीत आहेत. त्यामुळे हा काळाबाजार थांबवावा, मोदी शासनाने नवीन केंद्रीय भूमी अधिग्रहण अध्यादेश हा कायदा लादून शेतकरीविरोधी षड्यंत्र रचले आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांना विश्वासात न घेता थेट मोठमोठ्या उद्योगपतींना देण्याचा घाट रचला आहे. त्यामुळे हा कायदा त्वरित रद्द करण्यात यावा, मुस्लिम समाजाला काँग्रेस सरकारने पाच टक्के आरक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. मात्र भाजप सरकारने तो रद्द करुन मुस्लिम समाजावर अन्याय केला आहे. त्यामुळे हा अन्याय दूर करण्यात यावा, अशा विविध मागण्या यावेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने करण्यात आले. यावेळी कमिटीचे अध्यक्ष संजय अकर्ते, पक्षनेते बबलू शेखावत, विलास इंगोले, नगरसेविका वंदना कंगाले, दिव्या सिसोदे, मालती दाभाडे, कांचन ग्रेसपुंजे, दीपक गुल्हाने, नूतन भुजाडे, मतीन अहमद, मजर अली उपस्थित होते. (प्रतिनिधी)