शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

केंद्राच्या विरोधात काँग्रेसचा एल्गार

By admin | Updated: January 22, 2015 00:17 IST

केंद्र व राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी व सामान्य जनतेला याचा परिणाम सहन करावा लागत आहे. त्यामुळे या चुकीच्या धोरणाविरोधात बुधवारी ..

अमरावती : केंद्र व राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी व सामान्य जनतेला याचा परिणाम सहन करावा लागत आहे. त्यामुळे या चुकीच्या धोरणाविरोधात बुधवारी शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी किरण गीत्ते यांच्यामार्फत शासनाला पाठविण्यात आले आहे. विविध अस्मानी संकटांनी शेतकरी उद्ध्वस्त झाल्यामुळे राज्य शासनाने कोरडवाहू शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हेक्टरी २५ हजार तर ओलिताच्या शेतीकरिता ५० हजार रुपये आर्थिक मदत तत्काळ जमा करावी. संपूर्ण कर्ज माफ करावे, शेतीसाठी २४ तास वीजपुरवठा करण्याची गरज आहे. मात्र केंद्रातील व राज्यातील सरकार शेतकरीविरोधी भूमिका घेऊन शेतकऱ्यांप्रती उदासीन आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय द्यावा तसेच पेट्रोल व डिझेलचे दर काँग्रेस पक्षाच्या कार्यकाळात कमी झाले होते व यामुळे ग्राहकांनाही दिलासा मिळाला होता. मात्र केंद्रातील मोदी सरकारने आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्चा तेलाच्या किमती व भारतातील पेट्रोल पदार्थाची तुलना करणारे तक्ते पाहिले असता सध्या पेट्रोलिंग कंपन्या सामान्य ग्राहकांची लूट करीत आहेत. त्यामुळे हा काळाबाजार थांबवावा, मोदी शासनाने नवीन केंद्रीय भूमी अधिग्रहण अध्यादेश हा कायदा लादून शेतकरीविरोधी षड्यंत्र रचले आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांना विश्वासात न घेता थेट मोठमोठ्या उद्योगपतींना देण्याचा घाट रचला आहे. त्यामुळे हा कायदा त्वरित रद्द करण्यात यावा, मुस्लिम समाजाला काँग्रेस सरकारने पाच टक्के आरक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. मात्र भाजप सरकारने तो रद्द करुन मुस्लिम समाजावर अन्याय केला आहे. त्यामुळे हा अन्याय दूर करण्यात यावा, अशा विविध मागण्या यावेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने करण्यात आले. यावेळी कमिटीचे अध्यक्ष संजय अकर्ते, पक्षनेते बबलू शेखावत, विलास इंगोले, नगरसेविका वंदना कंगाले, दिव्या सिसोदे, मालती दाभाडे, कांचन ग्रेसपुंजे, दीपक गुल्हाने, नूतन भुजाडे, मतीन अहमद, मजर अली उपस्थित होते. (प्रतिनिधी)