शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

आत्महत्याग्रस्त नऊ कुटुंबांची काँग्रेसने केली कर्जातून मुक्ती

By admin | Updated: June 21, 2015 00:37 IST

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उपाध्यध्य राहुल गांधी यांनी ३० एप्रिल २०१५ रोजी अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे ..

दिलासा : कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र वाटप, वर्षभराकरिता कुटुंब दत्तकअमरावती : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उपाध्यध्य राहुल गांधी यांनी ३० एप्रिल २०१५ रोजी अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे आणि चांदूररेल्वे या दोन तालुक्यांतील शेतकरी आत्महत्याग्रस्त नऊ कुटुंबांची भेट घेऊन त्यांच्या भावना प्रत्यक्ष जाणून घेतल्या होत्या. या कुटुंबांनी मदतीची अपेक्षा व्यक्त केली होती. त्यानुसार काँग्रेस कमेटीच्या पदाधिकाऱ्यांनी स्वखर्चातून या नऊ कुटुंबांना कर्जातून मुक्ती दिलेली आहे. या कुटुंबांना शनिवारी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू देशमुख, आ. वीरेंद्र जगताप, महापौर चरणजितकौर नंदा, प्रदेश सरचिटणीस संजय खोडके, माजी आमदार केवराम काळे, जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश उईके, मनपा पक्षनेता बबलू शेखावत, विलास महल्ले, किशोर बोरकर, शहरध्यक्ष संजय अकर्ते, प्रल्हाद ठाकरे, अविनाश मार्डीकर, उषा उताणे, आदींच्या उपस्थितीत आत्महत्याग्रस्त कुटुंबांतील शेतकऱ्यांच्या वारसाना कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र वितरित करून एका वर्षाकरिता ही कुटुंबे दत्तक घेतली आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी एप्रिल महिन्यात वाढत्या तापमानातही धामणगाव रेल्वे आणि चांदूररेल्वे या दोन तालुक्यांतील नऊ शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. त्यावेळी राहुल गांधी तसेच प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी मदत करण्याची सूचना केली होती. त्यानुसार काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला दिलासा दिल्याचे बबलू देशमुख यांनी सांगितले. याप्रसंगी आमदार वीरेंद्र जगताप, प्रदेश सरचिटणीस संजय खोडके यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे सभापती गिरीश कराळे, सदस्य प्रवीण घुईखेडकर, उमेश केने वनमाला खडके, संगीता सवई, मंदा गवई, प्रवीण सवाई, बिटू मंगराळे, भागवत खांडे, सुरेश आळे, दयाराम काळे, बबलू बोबडे, समीर देशमुख, अमोल इंगळे, पकंज मोरे व काँग्रेसचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बबलू देशमुख यांनी तर आभार प्रदर्शन किशोर बोरकर यांनी केले.या शेतकऱ्यांना केले कर्जमुक्तधामणगाव रेल्वे तालुक्यातील गुंजी येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी नीलेश वहिले, अंबादास वहिले, शहापूर येथील किशोर कांबळे, रामगाव येथील कचरू तुपसुंदरे, आणि चांदूररेल्वे तालुक्यातील राजना येथील मारोती नेवारे, टोंगलाबाद येथील माणिक ठवकर, रामदास अडिकणे, शंकर अडिकणे, अशोक सातपैसे या शेतकऱ्यांच्या कुटुंबांतील वारसाना कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र बहाल करण्यात आले.या पदाधिकाऱ्यांनी घेतले कुटुंब दत्तकआत्महत्याग्रस्त नऊ कुटुंबांना वर्षभरासाठी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दत्तक घेतले आहे. यामध्ये टोंगलाबाद येथील माणिक ठवकर, रामदास अडिकणे, शंकर अडिकणे, अशोक सातपैसे या चार कुटुंबांना आमदार वीरेंद्र जगताप, माजी आमदार रावसाहेब शेखावत, प्रदेश सरचिटणीस संजय खोडके, माजी आमदार सुलभा खोडके यांनी तर मारोती नेवारे, कचरू तुपसुंदरे या दोन कुटुंबांना वीरेंद्र जगताप यांनी व आर्वीचे अमर काळे यांनी दत्तक घेतले. किशोर कांबळे यांच्या कुटुंबाची जबाबदारी आमदार यशोमती ठाकूर यांनी स्वीकारली. तसेच नीलेश वाळके, अंबादास वहिले या दोन शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला जिल्हा ग्रामीण कॉग्रेस कमेटीचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी दत्तक घेतले आहेत.