शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

निधीसाठी ‘डीपीसी’त काँग्रेस सदस्यांनी रेटला मुद्दा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2016 00:24 IST

जिल्हा परिषदेसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांना विकास कामासांठी भरीव निधी द्यावा आणि सर्वांना विश्वासात घेऊनच कामे करावीत, ....

वीरेंद्र जगताप यांची माहिती : काँग्रेसचे सदस्य आक्रमकअमरावती : जिल्हा परिषदेसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांना विकास कामासांठी भरीव निधी द्यावा आणि सर्वांना विश्वासात घेऊनच कामे करावीत, अशी मागणी शुक्रवारी जिल्हा नियोजन समितीच्या सभेत जिल्हा परिषदेतील काँग्रेसच्या सदस्यांनी पालकमंत्र्यांकडे रेटून धरले, अशी माहिती आ. वीरेंद्र जगताप यांनी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दालनात पार पडलेल्या पत्रपरिषदेत दिली. यावेळी आ.जगताप म्हणाले, जिल्हा नियोजन समितीत सर्वाधिक सदस्य काँग्रेस पक्षाचे आहेत. यामध्ये जिल्हा परिषदेचे २२, महापालिका व नगरपरिषद सदस्यांचा समावेश आहे. जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कार्यकाळात जिल्हा नियोजन समितीने जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी, प्रहार, भाजप, बसपाची सत्ता असतानाही ३०-५४ व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ५०-५४ या रस्ते विकासाच्या लेखाशिर्षास अनुक्रमे जिल्हा परिषदेला सुमारे २२ कोटी तर सार्वजनिक बांधकाम विभागाला ४३ कोटी रूपये उपलब्ध करून दिले होते. मात्र, आता राज्यात भाजपची सत्ता असताना जिल्हा परिषदेला १७ कोटी व बांधकाम विभागाला केवळ २२ कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. मिनीमंत्रालयाला भरीव निधी देण्यात यावी.- तर पालकमंत्र्यांचा सत्कार करूअमरावती : त्यामुळे या निधीत कपात झाली आहे. त्यामुळे शुक्रवारी पार पडलेल्या जिल्हा नियोजन सभेत मांडण्यात आलेल्या सुमारे १७४.९४ कोटीच्या प्रारूप आराखडयास, आणि जिल्हा वार्षिक योजना सन २०१५-१६ अंतर्गत सर्वसाधारण योजना जलयुक्त शिवारसह आदिवासी उपाय योजना विशेष घटक योजना मधील प्रात तुरतुदींना प्रशासकीय मान्यता देताना जिल्हा नियोजन समितीची मान्यता घेण्यात यावी व यासाठी सदस्यांना विश्वासात घेऊनच निधी व नियोजन व्हावे, अशी मागणी जिल्हा नियोजन समितीमधील काँग्रेस सदस्यांनी जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव किरण गित्ते यांच्याकडे केली असल्याची माहितीसुध्दा जिल्हा परिषद पदाधिकारी व आमदार जगताप यांनी दिली.पालकमंत्री यांच्याकडे निधी बाबत आम्ही आग्रह धरला त्यांनी याबाबत सहानभूती दाखविली. त्यांनी दिलेल्या सभागृहातील माहितीनुसार वित्तमंत्री यांनी ५० कोटी रूपये देण्याचे मान्य केले आहे. जर हा निधी वाढवून मिळत असेल तर पालकमंत्री प्रवीण पोटे यांचा जिल्हा परिषद व काँग्रेस पक्षाचेवतीने सत्कार करून असेही जगताप म्हणालेत. परंतु आता पर्यतच्या अनुभवातून आखड्यात ५ ते १० कोटीपेक्षा वाढ क धीही झाली नसल्याचेही आ. वीरेंद्र जगताप यांनी स्पष्ट केले.यावेळी पत्रपरिषदेला जिल्हापरिषद अध्यक्ष सतीश उईके, उपाध्यक्ष सतीश हाडोळे, सभापती गिरीश कराळे, वृषाली विघे, सदस्य महेंद्रसिंग गैलवार, मोहन सिंगवी, मोहन पाटील, विनोद डांगे, उमेश केने, बापुराव गायकवाड, ममता भांबुरकर, मंदा गवई, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)