शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोटातील कारचा मालक सलमान पोलिसांच्या ताब्यात; गाडी दुसऱ्याला विकल्याचा दावा! पोलिसांची चौकशी सुरू
2
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
3
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
4
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
5
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
6
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
7
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
8
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
9
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
10
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
11
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
12
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
13
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
14
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
15
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
16
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
17
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
18
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
19
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
20
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन

काँग्रेस आमदारांचे मंत्रीपदाचे स्वप्न विरले

By admin | Updated: June 5, 2014 23:39 IST

महापालिका, नगरपरिषद, जिल्हा परिषद काँग्रेसच्या ताब्यात असून व चार आमदारही काँग्रेसचे असताना या विधानसभा सत्रात जिल्ह्यात एकाही आमदाराला मंत्रीपद मिळाले नाही.

अंतर्गत कलह : राज्याचा शेवटचा अर्थसंकल्प सादरअमरावती : महापालिका, नगरपरिषद, जिल्हा परिषद काँग्रेसच्या ताब्यात असून व चार आमदारही काँग्रेसचे असताना या विधानसभा सत्रात जिल्ह्यात एकाही आमदाराला मंत्रीपद मिळाले नाही. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात जिल्ह्याला मंत्रीपद मिळेल, अशी आशा होती; मात्र, तसे काहीही झाले नाही. विभागीय स्तरावर मंत्रीपद न मिळणे हे जिल्ह्यातील काँग्रेस आमदारांचे अपयश मानले जात आहे. जिल्ह्यात काँग्रेसचे वीरेंद्र जगताप, यशोमती ठाकूर, रावसाहेब शेखावत व केवलराम काळे हे विधानसभा सदस्य आहेत. विधानसभेचा कार्यकाळ संपण्यास काहीच महिने शिल्लक राहिल्याने काँग्रेस आमदारांना मंत्रीपद मिळण्याचे स्वप्न आता विरले आहे. आठ विधानसभा सदस्य संख्या असलेल्या अमरावती जिल्ह्याला राज्यमंत्रीपद मिळण्याचे संकेत होते. मात्र, अंतर्गत कलहामुळे जिल्ह्यात काँग्रेसच्या आमदारांना मंत्रीपद मिळू शकले नाही. साडेचार वर्षांचा कालावधी लोटला आहे. पावसाळी अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात वीरेंद्र जगताप, यशोमती ठाकूर, रावसाहेब शेखावत यांच्यापैकी एकाची राज्यमंत्री म्हणून वर्णी लागेल, अशी शक्यता होती. मात्र, ही आशा मालवली आहे. मंत्रीमंडळ विस्तारात लातूरचे अमित देशमुख व अब्दूल सत्तार यांना स्थान मिळाले. जिल्ह्यात बहुसंख्येने काँग्रेसचे वर्चस्व असताना काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी अमरावतीला मंत्रिमंडळातून डावलल्याने कार्यकर्ते, पदाधिकार्‍यांचा रोष कायम असल्याचे दिसून येते. १९५२ ते २00९ या कालावधीत विधानसभा निवडणुकांमध्ये जिल्ह्यातील जनतेने काँग्रेसच्या बाजूने कौल दिला. यापूर्वी कॅबिनेट आणि राज्यमंत्रीपद प्रत्येक विधानसभा सत्रात अमरावतीला मिळाले आहे. मात्र २00९ ते २0१४ या कालावधीत काँग्रेसचे बहुसंख्य आमदार असताना अमरावतीला मंत्रीपदापासून वंचित राहावे लागले. सध्या कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर अमरावतीच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यांनी आपला गृहजिल्हा सांभाळत ही जबाबदारी पार पाडली. मात्र, पालकमंत्री म्हणून काँग्रेसच्या बांधणीसाठी या मंत्र्यांचा जिल्ह्याला फारसा लाभ झाला नाही, हे काँग्रेस कार्यकर्ते आता बोलू लागले आहेत. मेळघाटला केवलराम काळे यांच्या रुपाने राज्यमंत्रीपद मिळण्याची आदिवासींना अपेक्षा होती.