शहरं
Join us  
Trending Stories
1
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
2
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
3
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
4
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
5
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
6
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी
7
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
8
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
9
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
10
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
11
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
12
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?
13
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
14
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
15
एरोड्रोम परवान्याने अडविले नवी मुंबईतील विमानोड्डाण; सप्टेंबरचा मुहूर्तही हुकणार?
16
जन्मभर विसरणार नाही असा धडा भारतास शिकवू; सिंधू जल करार स्थगितीमुळे पाकच्या धमक्या वाढल्या
17
'झुरळे गोपीनाथ' मंदिर ! ३०० वर्षांपूर्वीच्या मंदिरात झुरळांच्या रूपात गोपिकांचा वास
18
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
19
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
20
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी

काँग्रेस आमदारांचे मंत्रीपदाचे स्वप्न विरले

By admin | Updated: June 5, 2014 23:39 IST

महापालिका, नगरपरिषद, जिल्हा परिषद काँग्रेसच्या ताब्यात असून व चार आमदारही काँग्रेसचे असताना या विधानसभा सत्रात जिल्ह्यात एकाही आमदाराला मंत्रीपद मिळाले नाही.

अंतर्गत कलह : राज्याचा शेवटचा अर्थसंकल्प सादरअमरावती : महापालिका, नगरपरिषद, जिल्हा परिषद काँग्रेसच्या ताब्यात असून व चार आमदारही काँग्रेसचे असताना या विधानसभा सत्रात जिल्ह्यात एकाही आमदाराला मंत्रीपद मिळाले नाही. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात जिल्ह्याला मंत्रीपद मिळेल, अशी आशा होती; मात्र, तसे काहीही झाले नाही. विभागीय स्तरावर मंत्रीपद न मिळणे हे जिल्ह्यातील काँग्रेस आमदारांचे अपयश मानले जात आहे. जिल्ह्यात काँग्रेसचे वीरेंद्र जगताप, यशोमती ठाकूर, रावसाहेब शेखावत व केवलराम काळे हे विधानसभा सदस्य आहेत. विधानसभेचा कार्यकाळ संपण्यास काहीच महिने शिल्लक राहिल्याने काँग्रेस आमदारांना मंत्रीपद मिळण्याचे स्वप्न आता विरले आहे. आठ विधानसभा सदस्य संख्या असलेल्या अमरावती जिल्ह्याला राज्यमंत्रीपद मिळण्याचे संकेत होते. मात्र, अंतर्गत कलहामुळे जिल्ह्यात काँग्रेसच्या आमदारांना मंत्रीपद मिळू शकले नाही. साडेचार वर्षांचा कालावधी लोटला आहे. पावसाळी अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात वीरेंद्र जगताप, यशोमती ठाकूर, रावसाहेब शेखावत यांच्यापैकी एकाची राज्यमंत्री म्हणून वर्णी लागेल, अशी शक्यता होती. मात्र, ही आशा मालवली आहे. मंत्रीमंडळ विस्तारात लातूरचे अमित देशमुख व अब्दूल सत्तार यांना स्थान मिळाले. जिल्ह्यात बहुसंख्येने काँग्रेसचे वर्चस्व असताना काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी अमरावतीला मंत्रिमंडळातून डावलल्याने कार्यकर्ते, पदाधिकार्‍यांचा रोष कायम असल्याचे दिसून येते. १९५२ ते २00९ या कालावधीत विधानसभा निवडणुकांमध्ये जिल्ह्यातील जनतेने काँग्रेसच्या बाजूने कौल दिला. यापूर्वी कॅबिनेट आणि राज्यमंत्रीपद प्रत्येक विधानसभा सत्रात अमरावतीला मिळाले आहे. मात्र २00९ ते २0१४ या कालावधीत काँग्रेसचे बहुसंख्य आमदार असताना अमरावतीला मंत्रीपदापासून वंचित राहावे लागले. सध्या कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर अमरावतीच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यांनी आपला गृहजिल्हा सांभाळत ही जबाबदारी पार पाडली. मात्र, पालकमंत्री म्हणून काँग्रेसच्या बांधणीसाठी या मंत्र्यांचा जिल्ह्याला फारसा लाभ झाला नाही, हे काँग्रेस कार्यकर्ते आता बोलू लागले आहेत. मेळघाटला केवलराम काळे यांच्या रुपाने राज्यमंत्रीपद मिळण्याची आदिवासींना अपेक्षा होती.