शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांसह जनसामान्यांच्या हितासाठी काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 22:21 IST

केंद्र व राज्यातील भाजप सरकारने सर्वसामान्यांची फसवणूक केली आहे. शेती व्यवसाय डबघाईस आला आहे. मात्र, सरकारने या गंभीर समस्येकडे पाठ फिरवली आहे. ती दूर करण्यासाठी काँग्रेस जनसंघर्ष यात्रेद्वारे थेट जनतेशी संवाद साधणार असल्याची माहिती अ.भा. काँग्रेस कमेटीच्या सचिव, आमदार यशोमती ठाकूर यांनी पत्रपरिषदेत दिली.

ठळक मुद्देपत्रपरिषद : यशोमती ठाकूर यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : केंद्र व राज्यातील भाजप सरकारने सर्वसामान्यांची फसवणूक केली आहे. शेती व्यवसाय डबघाईस आला आहे. मात्र, सरकारने या गंभीर समस्येकडे पाठ फिरवली आहे. ती दूर करण्यासाठी काँग्रेस जनसंघर्ष यात्रेद्वारे थेट जनतेशी संवाद साधणार असल्याची माहिती अ.भा. काँग्रेस कमेटीच्या सचिव, आमदार यशोमती ठाकूर यांनी पत्रपरिषदेत दिली.शेतकरी हित व सर्वसामान्यांच्या हक्कासाठी निघालेली जनसंघर्ष यात्रा ही ५ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता वलगाव येथील एस.एल. हायस्कूलच्या प्रांगणात जाहीर सभा होणार असल्याचे त्या म्हणाल्या. जनसंघर्ष यात्रेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष चारुलता टोकस, राज्य प्रभारी आशिष दुवा, माजीमंत्री आरिफ नसीम खान, हर्षवर्धन पाटील, बाळासाहेब थोरात, माणिकराव ठाकरे आदी उपस्थित राहतील. आ. यशोमाती ठाकूर यांच्या आरोपानुसार, साडेचार वर्षांत केवळ आश्वासनाची खैरात भाजपकडून वाटली जात आहे. महागाईमुळे सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे. असे असताना सरकार मात्र कुंभकर्णी झोपेचे सोंग घेत आहे. झोपेत असलेल्या या सरकारला जागे करण्यासाठी काँग्रेसची जनसंघर्र्ष यात्रा विदर्भात दाखल झाली आहे. शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार ठाकूर यांनी केले आहे. यावेळी झेडपीचे सभापती जयंत देशमुख, राजीव ठाकूर, हरीश मोरे, आबीद हुसेन उपस्थित होते.लोकसभेच्या जागेसाठी आग्रहीलोकसभा मतदार संघाची जागा ही सध्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. आगामी लोकसभा निवडणूका सुध्दा कॉग्रेस- राष्ट्रवादी आघाडीचे संकेत आहे. जिल्ह्यात जनाधार हा काँग्रेस पक्षाचे बाजूने राहीला असून तो सध्याही कायम आहे. झेडपीसह स्थानिक स्वराज्य संस्थावर काँग्रेसची सत्ता आहे. त्यामुळे लोकसभा मतदार संघाची जागा काँग्रेस पक्षाने लढवावी, असा आग्रह पक्षश्रेष्ठींकडे केला जाईल, असेही आ. ठाकूर म्हणाल्या.आरक्षण आर्थिक निकषावर असावेराज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. परंतु आरक्षण देताना आरक्षण हे आर्थिक निकषावर असावे, असे मत आ. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केले. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी काँग्रेसच्या नेतृत्वातील आघाडी सरकारने नियोजन केले होते. तेच नियोजन सध्याच्या सरकारने आखून आरक्षण दिले आहे. यासोबतच धनगर, मुस्लिम समाजालाही आरक्षण मिळावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.