शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
5
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
6
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
7
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
8
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
9
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
10
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
11
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
12
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
13
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
14
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
15
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
16
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
17
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
18
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
19
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
20
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?

शेतकऱ्यांसह जनसामान्यांच्या हितासाठी काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 22:21 IST

केंद्र व राज्यातील भाजप सरकारने सर्वसामान्यांची फसवणूक केली आहे. शेती व्यवसाय डबघाईस आला आहे. मात्र, सरकारने या गंभीर समस्येकडे पाठ फिरवली आहे. ती दूर करण्यासाठी काँग्रेस जनसंघर्ष यात्रेद्वारे थेट जनतेशी संवाद साधणार असल्याची माहिती अ.भा. काँग्रेस कमेटीच्या सचिव, आमदार यशोमती ठाकूर यांनी पत्रपरिषदेत दिली.

ठळक मुद्देपत्रपरिषद : यशोमती ठाकूर यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : केंद्र व राज्यातील भाजप सरकारने सर्वसामान्यांची फसवणूक केली आहे. शेती व्यवसाय डबघाईस आला आहे. मात्र, सरकारने या गंभीर समस्येकडे पाठ फिरवली आहे. ती दूर करण्यासाठी काँग्रेस जनसंघर्ष यात्रेद्वारे थेट जनतेशी संवाद साधणार असल्याची माहिती अ.भा. काँग्रेस कमेटीच्या सचिव, आमदार यशोमती ठाकूर यांनी पत्रपरिषदेत दिली.शेतकरी हित व सर्वसामान्यांच्या हक्कासाठी निघालेली जनसंघर्ष यात्रा ही ५ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता वलगाव येथील एस.एल. हायस्कूलच्या प्रांगणात जाहीर सभा होणार असल्याचे त्या म्हणाल्या. जनसंघर्ष यात्रेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष चारुलता टोकस, राज्य प्रभारी आशिष दुवा, माजीमंत्री आरिफ नसीम खान, हर्षवर्धन पाटील, बाळासाहेब थोरात, माणिकराव ठाकरे आदी उपस्थित राहतील. आ. यशोमाती ठाकूर यांच्या आरोपानुसार, साडेचार वर्षांत केवळ आश्वासनाची खैरात भाजपकडून वाटली जात आहे. महागाईमुळे सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे. असे असताना सरकार मात्र कुंभकर्णी झोपेचे सोंग घेत आहे. झोपेत असलेल्या या सरकारला जागे करण्यासाठी काँग्रेसची जनसंघर्र्ष यात्रा विदर्भात दाखल झाली आहे. शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार ठाकूर यांनी केले आहे. यावेळी झेडपीचे सभापती जयंत देशमुख, राजीव ठाकूर, हरीश मोरे, आबीद हुसेन उपस्थित होते.लोकसभेच्या जागेसाठी आग्रहीलोकसभा मतदार संघाची जागा ही सध्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. आगामी लोकसभा निवडणूका सुध्दा कॉग्रेस- राष्ट्रवादी आघाडीचे संकेत आहे. जिल्ह्यात जनाधार हा काँग्रेस पक्षाचे बाजूने राहीला असून तो सध्याही कायम आहे. झेडपीसह स्थानिक स्वराज्य संस्थावर काँग्रेसची सत्ता आहे. त्यामुळे लोकसभा मतदार संघाची जागा काँग्रेस पक्षाने लढवावी, असा आग्रह पक्षश्रेष्ठींकडे केला जाईल, असेही आ. ठाकूर म्हणाल्या.आरक्षण आर्थिक निकषावर असावेराज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. परंतु आरक्षण देताना आरक्षण हे आर्थिक निकषावर असावे, असे मत आ. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केले. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी काँग्रेसच्या नेतृत्वातील आघाडी सरकारने नियोजन केले होते. तेच नियोजन सध्याच्या सरकारने आखून आरक्षण दिले आहे. यासोबतच धनगर, मुस्लिम समाजालाही आरक्षण मिळावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.