शहरं
Join us  
Trending Stories
1
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
2
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
3
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा
4
IPL 2025: लखनौच्या अडचणीत वाढ, दुखापतीमुळं मयांक यादव आयपीएलमधून बाहेर!
5
Shiv Sena: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयितांची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस
6
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
7
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
8
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
9
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
10
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
11
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
12
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
13
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
14
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
15
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
16
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
17
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
18
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
19
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
20
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग

शेतकऱ्यांसह जनसामान्यांच्या हितासाठी काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 22:21 IST

केंद्र व राज्यातील भाजप सरकारने सर्वसामान्यांची फसवणूक केली आहे. शेती व्यवसाय डबघाईस आला आहे. मात्र, सरकारने या गंभीर समस्येकडे पाठ फिरवली आहे. ती दूर करण्यासाठी काँग्रेस जनसंघर्ष यात्रेद्वारे थेट जनतेशी संवाद साधणार असल्याची माहिती अ.भा. काँग्रेस कमेटीच्या सचिव, आमदार यशोमती ठाकूर यांनी पत्रपरिषदेत दिली.

ठळक मुद्देपत्रपरिषद : यशोमती ठाकूर यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : केंद्र व राज्यातील भाजप सरकारने सर्वसामान्यांची फसवणूक केली आहे. शेती व्यवसाय डबघाईस आला आहे. मात्र, सरकारने या गंभीर समस्येकडे पाठ फिरवली आहे. ती दूर करण्यासाठी काँग्रेस जनसंघर्ष यात्रेद्वारे थेट जनतेशी संवाद साधणार असल्याची माहिती अ.भा. काँग्रेस कमेटीच्या सचिव, आमदार यशोमती ठाकूर यांनी पत्रपरिषदेत दिली.शेतकरी हित व सर्वसामान्यांच्या हक्कासाठी निघालेली जनसंघर्ष यात्रा ही ५ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता वलगाव येथील एस.एल. हायस्कूलच्या प्रांगणात जाहीर सभा होणार असल्याचे त्या म्हणाल्या. जनसंघर्ष यात्रेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष चारुलता टोकस, राज्य प्रभारी आशिष दुवा, माजीमंत्री आरिफ नसीम खान, हर्षवर्धन पाटील, बाळासाहेब थोरात, माणिकराव ठाकरे आदी उपस्थित राहतील. आ. यशोमाती ठाकूर यांच्या आरोपानुसार, साडेचार वर्षांत केवळ आश्वासनाची खैरात भाजपकडून वाटली जात आहे. महागाईमुळे सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे. असे असताना सरकार मात्र कुंभकर्णी झोपेचे सोंग घेत आहे. झोपेत असलेल्या या सरकारला जागे करण्यासाठी काँग्रेसची जनसंघर्र्ष यात्रा विदर्भात दाखल झाली आहे. शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार ठाकूर यांनी केले आहे. यावेळी झेडपीचे सभापती जयंत देशमुख, राजीव ठाकूर, हरीश मोरे, आबीद हुसेन उपस्थित होते.लोकसभेच्या जागेसाठी आग्रहीलोकसभा मतदार संघाची जागा ही सध्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. आगामी लोकसभा निवडणूका सुध्दा कॉग्रेस- राष्ट्रवादी आघाडीचे संकेत आहे. जिल्ह्यात जनाधार हा काँग्रेस पक्षाचे बाजूने राहीला असून तो सध्याही कायम आहे. झेडपीसह स्थानिक स्वराज्य संस्थावर काँग्रेसची सत्ता आहे. त्यामुळे लोकसभा मतदार संघाची जागा काँग्रेस पक्षाने लढवावी, असा आग्रह पक्षश्रेष्ठींकडे केला जाईल, असेही आ. ठाकूर म्हणाल्या.आरक्षण आर्थिक निकषावर असावेराज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. परंतु आरक्षण देताना आरक्षण हे आर्थिक निकषावर असावे, असे मत आ. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केले. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी काँग्रेसच्या नेतृत्वातील आघाडी सरकारने नियोजन केले होते. तेच नियोजन सध्याच्या सरकारने आखून आरक्षण दिले आहे. यासोबतच धनगर, मुस्लिम समाजालाही आरक्षण मिळावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.