शहरं
Join us  
Trending Stories
1
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
2
जम्मू-काश्मीर पोलिसांनी मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
3
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
4
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
5
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
6
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
7
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
8
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
9
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
10
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
11
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
12
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
13
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
14
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
15
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
16
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
17
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
18
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
19
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
20
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!

शेतकऱ्यांसह जनसामान्यांच्या हितासाठी काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 22:21 IST

केंद्र व राज्यातील भाजप सरकारने सर्वसामान्यांची फसवणूक केली आहे. शेती व्यवसाय डबघाईस आला आहे. मात्र, सरकारने या गंभीर समस्येकडे पाठ फिरवली आहे. ती दूर करण्यासाठी काँग्रेस जनसंघर्ष यात्रेद्वारे थेट जनतेशी संवाद साधणार असल्याची माहिती अ.भा. काँग्रेस कमेटीच्या सचिव, आमदार यशोमती ठाकूर यांनी पत्रपरिषदेत दिली.

ठळक मुद्देपत्रपरिषद : यशोमती ठाकूर यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : केंद्र व राज्यातील भाजप सरकारने सर्वसामान्यांची फसवणूक केली आहे. शेती व्यवसाय डबघाईस आला आहे. मात्र, सरकारने या गंभीर समस्येकडे पाठ फिरवली आहे. ती दूर करण्यासाठी काँग्रेस जनसंघर्ष यात्रेद्वारे थेट जनतेशी संवाद साधणार असल्याची माहिती अ.भा. काँग्रेस कमेटीच्या सचिव, आमदार यशोमती ठाकूर यांनी पत्रपरिषदेत दिली.शेतकरी हित व सर्वसामान्यांच्या हक्कासाठी निघालेली जनसंघर्ष यात्रा ही ५ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता वलगाव येथील एस.एल. हायस्कूलच्या प्रांगणात जाहीर सभा होणार असल्याचे त्या म्हणाल्या. जनसंघर्ष यात्रेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष चारुलता टोकस, राज्य प्रभारी आशिष दुवा, माजीमंत्री आरिफ नसीम खान, हर्षवर्धन पाटील, बाळासाहेब थोरात, माणिकराव ठाकरे आदी उपस्थित राहतील. आ. यशोमाती ठाकूर यांच्या आरोपानुसार, साडेचार वर्षांत केवळ आश्वासनाची खैरात भाजपकडून वाटली जात आहे. महागाईमुळे सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे. असे असताना सरकार मात्र कुंभकर्णी झोपेचे सोंग घेत आहे. झोपेत असलेल्या या सरकारला जागे करण्यासाठी काँग्रेसची जनसंघर्र्ष यात्रा विदर्भात दाखल झाली आहे. शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार ठाकूर यांनी केले आहे. यावेळी झेडपीचे सभापती जयंत देशमुख, राजीव ठाकूर, हरीश मोरे, आबीद हुसेन उपस्थित होते.लोकसभेच्या जागेसाठी आग्रहीलोकसभा मतदार संघाची जागा ही सध्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. आगामी लोकसभा निवडणूका सुध्दा कॉग्रेस- राष्ट्रवादी आघाडीचे संकेत आहे. जिल्ह्यात जनाधार हा काँग्रेस पक्षाचे बाजूने राहीला असून तो सध्याही कायम आहे. झेडपीसह स्थानिक स्वराज्य संस्थावर काँग्रेसची सत्ता आहे. त्यामुळे लोकसभा मतदार संघाची जागा काँग्रेस पक्षाने लढवावी, असा आग्रह पक्षश्रेष्ठींकडे केला जाईल, असेही आ. ठाकूर म्हणाल्या.आरक्षण आर्थिक निकषावर असावेराज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. परंतु आरक्षण देताना आरक्षण हे आर्थिक निकषावर असावे, असे मत आ. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केले. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी काँग्रेसच्या नेतृत्वातील आघाडी सरकारने नियोजन केले होते. तेच नियोजन सध्याच्या सरकारने आखून आरक्षण दिले आहे. यासोबतच धनगर, मुस्लिम समाजालाही आरक्षण मिळावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.