शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

तूर खरेदीच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 22:08 IST

शासनाने बंद केलेली तूर खरेदी केंद्र दोन दिवसांत सुरू न केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा शुक्रवारी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांना दिलेल्या निवेदनातून जिल्हा काँग्रेसने दिला आहे.

ठळक मुद्देजिल्हा कचेरीवर धडक : केंद्र सुरू न केल्यास आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शासनाने बंद केलेली तूर खरेदी केंद्र दोन दिवसांत सुरू न केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा शुक्रवारी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांना दिलेल्या निवेदनातून जिल्हा काँग्रेसने दिला आहे.जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख, आ. वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तूर खरेदीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी भेट घेतली. जिल्हाभरात अद्यापही ३४ हजार शेतकऱ्यांच्या घरात तूर पडून असल्याचे बबलू देशमुख यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. याशिवाय शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणांमुळे तूर उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. अशातच जिल्ह्यातील ७० हजार १९७ शेतकऱ्यांची आॅनलाइन नोंदणी झाली असताना, अद्यापही ३४ हजार ६८५ टोकनधारक शेतकरी आहे. याशिवाय इतरही शेतकऱ्यांची नोंदणी बाकी आहे. असे असताना जिल्हाभरातील १२ ठिकाणचेही शासकीय तूर खरेदी केंद्र शासनाने १५ मेपासूृन बंद केली आहे. त्यामुळे या वंचित शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी बंद असलेली तूर खरेदी केंद्र त्वरित सुरू करण्यासंदर्भात दोन दिवसांत निर्णय घ्यावा, अन्यथा जिल्हाभर काँग्रेस पक्षाच्यावतीने तीव्र आंदोलनाचा इशारा जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, आ. वीरेंद्र जगताप, माजी आमदार केवलराम काळे, जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे, सभापती जयंत देशमुख, बाळासाहेब हिंगणीकर, सुधाकर भारसाकळे व पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.तुरीची खरेदी पूर्ण न करताच ही खरेदी केंद्र बंद केली. भाजप सरकार हे शेतकरीविरोधी व थापाडे असल्याचा आरोप आ. वीरेंद्र जगताप यांनी केला. याप्रसंगी शिवाजी हरणे, बाळासाहेब टोळे, किशोर देशमुख, रत्नाकर करुले, श्रीपाल पाल आदी उपस्थित होते.