शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
4
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
5
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
9
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
10
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
11
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
12
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
13
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
14
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
15
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
16
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
17
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
18
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
19
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
20
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

बोंडअळी मदतीसाठी कॉग्रेस आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 22:18 IST

जिल्ह्यात कपाशीचे सर्वाधिक क्षेत्र असणारे व गुलाबी बोंडअळीने बाधित चार तालुक्यांना मदतीतून डावलण्याचा प्रकार निषेधार्ह आहे. या तालुक्यांचा यादीत समावेश करावा, अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमेटीने सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाव्दारे केली आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : ‘त्या’ चार तालुक्यांचा समावेश करण्याची मागणी

आॅनलाईन लोकमतअमरावती : जिल्ह्यात कपाशीचे सर्वाधिक क्षेत्र असणारे व गुलाबी बोंडअळीने बाधित चार तालुक्यांना मदतीतून डावलण्याचा प्रकार निषेधार्ह आहे. या तालुक्यांचा यादीत समावेश करावा, अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमेटीने सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाव्दारे केली आहे.जिल्ह्यातील दर्यापूर, अमरावती, भातकुली व चांदूररेल्वे या चार तालुक्यांत कपाशीचा सर्वाधिक पेरा आहे. याच तालुक्यात गुलाबी बोंडअळीचे सर्वाधिक नुकसान असताना या तालुक्यांना बोंडअळीच्या बाधित क्षेत्रातून वगळले आहे. दर्यापूर तालुक्यात ८० टक्क्यांवर बोंडअळीचे नुकसान असल्याचा नित्कर्ष पीकेव्हीने काढला. या सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे. त्यामुळे वगळलेल्या या तालुक्यांना पुन्हा यादीमध्ये समाविष्ट करावे, अन्यथा होणाऱ्या शेतकरी आत्महत्यांना शासन जाबबदार राहील, अशा इशारा निवेदनाव्दारे देण्यात आला. यावेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नितीन गोंडाणे, सभापती बळवंत वानखडे, बाळासाहेब हिंगणीकर, दिलीप चव्हाण, राजेश्वर कोल्हे, दिवाकर देशमुख, शाम देशमुख, सागर देशमुख, गजानन देशमुख, अभिजित देवके, राजेश खेडकर, व्ही.के. देशमुख, सुरेश ढेंगळे, संजीव चव्हाण, दुर्योधन रायबोले, गजानन गावंडे, प्रदीप देशमुख, अविनाश देशमुख, पुरूषोत्तम देशमुख, प्रभाकर कोरपे, चंदू शेवणे, रमेश गावंडे, बाळासाहेब गावंडे, प्रकाश चव्हाण, अनिकेत टाले, सूरज देशमुख, विक्रम देशमुख आदींची उपस्थिती होती.शेतकऱ्यांसाठी निर्णय घातक; शिवसेनेचा आरोपअमरावती : जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात गुलाबी बोंडअळीचे नुकसान असताना पाच तालुक्यांना डावलण्याचा प्रकार निषेधार्ह व शेतकऱ्यांसाठी अत्यंत घातक निर्णय असल्याचा आरोप शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुनील खराटे यांनी केला. सरसकट शेतकऱ्यांना मदत न देता अटी, शर्तीमध्ये डावलून वंचित ठेवण्यात येत आहे. जिल्ह्यात बोंडअळीच्या नुकसानीची पहिली तक्रार भातकुली तालुक्यातील पूर्णानगर येथील असताना त्या तालुक्याला डावलण्यात आले आहे. या बाधित तालुक्यांना यादीत समाविष्ट करण्याची मागणी बुधवारी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांना निवेदनाव्दारे करण्यात आली.