शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

भाजप शासनाविरोधात काँग्रसेचे नेते एकवटले

By admin | Updated: February 19, 2016 00:38 IST

भाजप सरकारने दुष्काळी परीस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकरी व सामान्यांच्या जिव्हाळयाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले

अमरावती : भाजप सरकारने दुष्काळी परीस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकरी व सामान्यांच्या जिव्हाळयाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले आहे. आकसबुध्दीतून काँग्रेस नेत्यांवर कारवाई करण्याचा एकछत्री कार्यक्रम भाजपा सरकारने सुरू केला आहे. शासनाच्या या पक्षपाती धोरणाचा निषेध करण्यासाठी गुरूवारी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या नेतृत्त्वात काँग्रेसचे आजी-माजी आमदार व कार्यकर्ते एकवटले. जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमेटीच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. राज्यातील भाजप सरकारने काँग्रेसच्या कार्यकाळातील अनेक जनहिताच्या योजना बंद करण्याचा सपाटा लावला आहे. यामध्ये प्रामुख्याने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाचे उदाहरण देता येईल. आघाडी सरकारने सुरू केलेले आणि अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या या अभियानातून अनेक गावांचा कायापालट झाला आहे. मात्र, या लोकल्याणकारी अभियानास भाजप शासनाने गुंडाळण्याचा निर्णय घेतला. अंबानगरीचे आराध्य दैवत कर्मयोगी श्रीसंत गाडगेबाबांंनी निष्काम कर्मयोग व स्वच्छतेचा संदेश दिला. अशा कर्मयोगाच्या नावे सुरू असलेले यशस्वी अभियान गुंडाळण्याची या सरकारची भूमिका अतिशय निंदनीय असल्याच्या भावना काँग्रेसच्या आजी-माजी लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या समोर व्यक्त केल्यात.भाजप सरकारने विकासाची कामे न करता काँग्रेस नेत्यांवर सुडभावनेतून कारवाईचा सपाटा सुरू केला आहे. हे चूक आहे. लोकसमस्या न सोडविल्यास आता काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरेल. -यशोमती ठाकूर, आमदार तिवसाकाँग्रेसची सत्ता असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर अन्याय करून त्यांना वेठीस धरण्याचे प्रकार शासनाने थांबवावेत आणि जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे.- बबलू देशमुख, जिल्हाध्यक्ष, काँग्रेसभाजप सरकार केवळ सूडाचे राजकारण करीत आहे. याचा मी निषेध करतो, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. शासनाने संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान त्वरीत सुरू करावे,- वीरेंद्र जगतापआमदार, धामणगांव रेल्वेसरकारने दुष्काळाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलावा. काँग्रेस नेत्यांवर केली जाणार कारवाई थांबवावी. शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी अधिक प्रयत्न करावेत.- नरेशचंद्र ठाकरे, माजी आमदार मोर्शी