शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

भाजप शासनाविरोधात काँग्रसेचे नेते एकवटले

By admin | Updated: February 19, 2016 00:38 IST

भाजप सरकारने दुष्काळी परीस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकरी व सामान्यांच्या जिव्हाळयाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले

अमरावती : भाजप सरकारने दुष्काळी परीस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकरी व सामान्यांच्या जिव्हाळयाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले आहे. आकसबुध्दीतून काँग्रेस नेत्यांवर कारवाई करण्याचा एकछत्री कार्यक्रम भाजपा सरकारने सुरू केला आहे. शासनाच्या या पक्षपाती धोरणाचा निषेध करण्यासाठी गुरूवारी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या नेतृत्त्वात काँग्रेसचे आजी-माजी आमदार व कार्यकर्ते एकवटले. जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमेटीच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. राज्यातील भाजप सरकारने काँग्रेसच्या कार्यकाळातील अनेक जनहिताच्या योजना बंद करण्याचा सपाटा लावला आहे. यामध्ये प्रामुख्याने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाचे उदाहरण देता येईल. आघाडी सरकारने सुरू केलेले आणि अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या या अभियानातून अनेक गावांचा कायापालट झाला आहे. मात्र, या लोकल्याणकारी अभियानास भाजप शासनाने गुंडाळण्याचा निर्णय घेतला. अंबानगरीचे आराध्य दैवत कर्मयोगी श्रीसंत गाडगेबाबांंनी निष्काम कर्मयोग व स्वच्छतेचा संदेश दिला. अशा कर्मयोगाच्या नावे सुरू असलेले यशस्वी अभियान गुंडाळण्याची या सरकारची भूमिका अतिशय निंदनीय असल्याच्या भावना काँग्रेसच्या आजी-माजी लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या समोर व्यक्त केल्यात.भाजप सरकारने विकासाची कामे न करता काँग्रेस नेत्यांवर सुडभावनेतून कारवाईचा सपाटा सुरू केला आहे. हे चूक आहे. लोकसमस्या न सोडविल्यास आता काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरेल. -यशोमती ठाकूर, आमदार तिवसाकाँग्रेसची सत्ता असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर अन्याय करून त्यांना वेठीस धरण्याचे प्रकार शासनाने थांबवावेत आणि जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे.- बबलू देशमुख, जिल्हाध्यक्ष, काँग्रेसभाजप सरकार केवळ सूडाचे राजकारण करीत आहे. याचा मी निषेध करतो, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. शासनाने संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान त्वरीत सुरू करावे,- वीरेंद्र जगतापआमदार, धामणगांव रेल्वेसरकारने दुष्काळाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलावा. काँग्रेस नेत्यांवर केली जाणार कारवाई थांबवावी. शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी अधिक प्रयत्न करावेत.- नरेशचंद्र ठाकरे, माजी आमदार मोर्शी