शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

वन खात्यात बदलीपात्र १२८ वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांच्या यादीतही घोळ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:12 IST

मलईदार जागेसाठी ‘लॉबिंग’, वनविभागात १५ टक्के बदली धोरणाला फाटा अमरावती : राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने १५ टक्के बदली ...

मलईदार जागेसाठी ‘लॉबिंग’, वनविभागात १५ टक्के बदली धोरणाला फाटा

अमरावती : राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने १५ टक्के बदली धोरणाला मंजुरी दिली आहे. त्याअनुषंगाने वन खात्याने १५ जुलै रोजी बदलीपात्र १२८ वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. मात्र, या यादीतही बदली धोरण, कार्यरत पदांमुळे मोठा घोळ असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे विनंती बदलीस पात्र आरएफओंवर अन्याय होण्याची दाट शक्यता आहे.

शासनाच्या बदली धाेरणानुसार दर तीन वर्षांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांची बदली करावी लागते. कारण ज्या ठिकाणी अधिकारी, कर्मचारी कार्यरत असतात तेथे सामाजिक हितसंबंध जोपासणे, अपहाराला बळ मिळणे, पदाचे दुरुपयाेग होऊ नये, यासाठी बदली धोरण शासकीय कर्मचाऱ्यांसाठी लागू करण्यात आले आहे. मात्र, वनखात्यात बहुतांश आरएफओंनी प्रादेशिक वनविभागात कार्यरत असताना काही मलईदार जागेवर नियुक्ती करून घेतली. आता शासनाच्या १५ टक्के धोरणानुसार कार्यरत पदावर असताना तेथील आढावा लक्षात घेऊन यादी तयार करण्यात आली आहे. खरे तर प्रादेशिकमध्ये एक किंवा दोन वर्षे असताना दुसरीकडे काही आरएफओंनी मलईदार जागा बळकावली. आता हेच आरएफओ १५ टक्के बदलीस पात्र असतानासुद्धा कार्यरत पदांमुळे त्यांची नावे बदलीच्या यादीत समाविष्ट झाली आहे. त्यामुळे हे आरएफओ चार ते पाच वर्षे मलईदार जागेवर कब्जा करुन राहतील, असा सुवर्णमध्य वरिष्ठांनी काढला आहे.

राज्यात ११ वन सर्कलमध्ये पुणे येथील नरसापूर, औरंगाबाद येथील नांदेड, नागपूर झोन अंतर्गत आरमोरी गडचिरोली येथील अल्लापल्ली ही जागा मिळविण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी चालविली आहे. वनखात्याच्या वरिष्ठांनी आरएफओंचे जुने नियुक्ती आदेश तपासल्यास किती वर्षांपासून ते मलईदार जागा काबीज करून आहेत, हे स्पष्ट होईल. बदलीसाठी तीन वर्ष अटी, निकषाचे पालन करावे, अशी अपेक्षा अन्यायकारक आरएफओंची आहे.

----------------------

मंत्रालयात पुणे, औरंगाबाद पोस्टींगसाठी शिफारशी

राज्यात ११ वन सर्कलपैकी औरंगाबाद, पुणे, अलापल्ली येथे नियुक्ती मिळावी, यासाठी सीएमओ ऑफिसमध्ये मंत्री, आमदार, सभापतींच्या शिफारस पत्राचा खच जमा झाला आहे. त्यामुळे आरएफओ हे पद वन खात्यात किती महत्वाचे आहे, हे दिसून येते. वनराज्यमंत्र्यांच्या शिफारस पत्राने सीएमओ ऑफिस हैराण झाल्याची विश्वसनीय माहिती आहे.