शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
5
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
7
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
8
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
9
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
10
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
13
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
14
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
15
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
16
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
17
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
18
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
19
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
20
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

‘पंतप्रधान आवास’च्या लाभार्थी यादीमध्ये गोंधळ

By admin | Updated: August 31, 2016 00:11 IST

पंतप्रधान आवास योजनेसाठी १५ आॅगस्टला झालेल्या ग्रामसभेत लाभार्थ्यांची यादी करण्यात आली.

फेरसर्वेक्षणाची मागणी : खरे लाभार्थी ग्रामसभेत वंचिततिवसा : पंतप्रधान आवास योजनेसाठी १५ आॅगस्टला झालेल्या ग्रामसभेत लाभार्थ्यांची यादी करण्यात आली. यामध्ये बेघरांना डावलून घरे असलेल्या अनेक नागरिकांची यादीत नावे आहेत. यामुळे फेरसर्वेक्षण करून पुन: यादी तयार करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. जिल्ह्यातील बहुतांश गावांत सध्या बेघरांना हक्काचे घरकूल देणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेच्या याद्यांवरून घोळ सुरू झाला आहे. २०११ ची आर्थिक व जातनिहाय जनगणना गृहित धरून लाभार्थी निवडल्या गेले आहेत. मुळात या जनगणनेवर आक्षेप असल्याने खरे लाभार्थी वंचित राहिले आहे. त्याचीच पुनरावृत्ती आवास योजनेत होत असल्याने या यादीवरुन गावागावांत वादाला तोंड फुटले आहे. दरम्यान आॅगस्टअखेर याद्यांना अंतिम रुप दिले जाईल. त्यानंतर हरकतींचा निपटारा करताना यंत्रणेला घाम फुटणार आहे. ‘पंतप्रधान आवास’ योजना यावर्षीपासून सुरू करण्यात आली. यामध्ये २०११ च्या जातनिहाय जगणनेनुसार घर नसलेल्यांना प्राधान्यक्रमाने या योजनेचा लाभ दिल्या जाणार आहे. जिल्ह्यात घर नसलेल्या नागरिकांची संख्या ४० हजारांचे आसपास आहे. यामध्ये अ, ब, क, ड अशी वर्गवारी करून बेघरांना घराचा लाभ दिला जाणार आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत लाभार्थी निवडीची प्रक्रिया सुरू झाली असली तरी या यादीसाठी ज्या जनगणना यादीचा आधार घेतला गेला त्याच आर्थिक व जातनिहाय जनगणनेवर नागरिकांचे आक्षेप आहेत. त्यामुळे खऱ्या गरजुंपेक्षा श्रीमंत लोकांनाच दाद्र्यिरेषेखाली यादी समाविष्ट करण्यात आले आहे. या यादीवरून गावागावांत घमासान सुरू आहे व याच याद्या गृहित धरून आवास योजनेचे लाभार्थी निश्चित केले जात असल्याने खरे गरजू लाभापासून वंचित राहणार आहेत. एक लाख २५ हजार असे अनुदान असणाऱ्या या आवास योजनेसाठी १५ आॅगस्टच्या ग्रामसभेत याद्यांना मान्यता द्यावी, असे ग्रामविकासच्या आदेशात नमुद आहे. मात्र बहुतांश गावांत ग्रामसभा रखडल्या गेल्याने आता आॅगस्टअखेर या याद्यांचे काम पूर्णत्वास जाणार आहे. (तालुका प्रतिनिधी)याद्यांमध्ये ओबीसींना डावललेआवास योजनेचा लाभ देण्यासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व धार्मिक अल्पसंख्याक कुटुंबाच्या याद्या तयार करण्याचे केंद्र सरकारने आदेश दिले आहेत. यामध्ये इतर मागासवर्गीयांचा समावेश करण्यात आलेला नाही. जिल्ह्यातील एकूण ४० हजार लाभार्थीपैकी अनुसूचित जाती, जमाती बेघर कुटुंबांचे फक्त १० हजार लाभार्थी आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिक वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे. याद्यांची फेतपासणी केव्हा ? शासन निकषातील १ ते १४ मार्गदर्शक सूचनांना बहुतांश ग्रामसभांमध्ये केराची टोपली दाखविण्यात आली आहे. बेघर कुटुंबांऐवजी पुन्हा श्रीमंत नागरिकांनाच घरकुलाचा लाभ देण्यात येणार आहे. त्यामुळे या याद्यांची आणि जनगणनेचीच शासनस्तरावर फेतरपासणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.