शहरं
Join us  
Trending Stories
1
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
2
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
3
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
4
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
5
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
6
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
7
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
9
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
10
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
11
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
12
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
13
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
14
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
15
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
16
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
17
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
18
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
19
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

‘पंतप्रधान आवास’च्या लाभार्थी यादीमध्ये गोंधळ

By admin | Updated: August 31, 2016 00:11 IST

पंतप्रधान आवास योजनेसाठी १५ आॅगस्टला झालेल्या ग्रामसभेत लाभार्थ्यांची यादी करण्यात आली.

फेरसर्वेक्षणाची मागणी : खरे लाभार्थी ग्रामसभेत वंचिततिवसा : पंतप्रधान आवास योजनेसाठी १५ आॅगस्टला झालेल्या ग्रामसभेत लाभार्थ्यांची यादी करण्यात आली. यामध्ये बेघरांना डावलून घरे असलेल्या अनेक नागरिकांची यादीत नावे आहेत. यामुळे फेरसर्वेक्षण करून पुन: यादी तयार करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. जिल्ह्यातील बहुतांश गावांत सध्या बेघरांना हक्काचे घरकूल देणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेच्या याद्यांवरून घोळ सुरू झाला आहे. २०११ ची आर्थिक व जातनिहाय जनगणना गृहित धरून लाभार्थी निवडल्या गेले आहेत. मुळात या जनगणनेवर आक्षेप असल्याने खरे लाभार्थी वंचित राहिले आहे. त्याचीच पुनरावृत्ती आवास योजनेत होत असल्याने या यादीवरुन गावागावांत वादाला तोंड फुटले आहे. दरम्यान आॅगस्टअखेर याद्यांना अंतिम रुप दिले जाईल. त्यानंतर हरकतींचा निपटारा करताना यंत्रणेला घाम फुटणार आहे. ‘पंतप्रधान आवास’ योजना यावर्षीपासून सुरू करण्यात आली. यामध्ये २०११ च्या जातनिहाय जगणनेनुसार घर नसलेल्यांना प्राधान्यक्रमाने या योजनेचा लाभ दिल्या जाणार आहे. जिल्ह्यात घर नसलेल्या नागरिकांची संख्या ४० हजारांचे आसपास आहे. यामध्ये अ, ब, क, ड अशी वर्गवारी करून बेघरांना घराचा लाभ दिला जाणार आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत लाभार्थी निवडीची प्रक्रिया सुरू झाली असली तरी या यादीसाठी ज्या जनगणना यादीचा आधार घेतला गेला त्याच आर्थिक व जातनिहाय जनगणनेवर नागरिकांचे आक्षेप आहेत. त्यामुळे खऱ्या गरजुंपेक्षा श्रीमंत लोकांनाच दाद्र्यिरेषेखाली यादी समाविष्ट करण्यात आले आहे. या यादीवरून गावागावांत घमासान सुरू आहे व याच याद्या गृहित धरून आवास योजनेचे लाभार्थी निश्चित केले जात असल्याने खरे गरजू लाभापासून वंचित राहणार आहेत. एक लाख २५ हजार असे अनुदान असणाऱ्या या आवास योजनेसाठी १५ आॅगस्टच्या ग्रामसभेत याद्यांना मान्यता द्यावी, असे ग्रामविकासच्या आदेशात नमुद आहे. मात्र बहुतांश गावांत ग्रामसभा रखडल्या गेल्याने आता आॅगस्टअखेर या याद्यांचे काम पूर्णत्वास जाणार आहे. (तालुका प्रतिनिधी)याद्यांमध्ये ओबीसींना डावललेआवास योजनेचा लाभ देण्यासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व धार्मिक अल्पसंख्याक कुटुंबाच्या याद्या तयार करण्याचे केंद्र सरकारने आदेश दिले आहेत. यामध्ये इतर मागासवर्गीयांचा समावेश करण्यात आलेला नाही. जिल्ह्यातील एकूण ४० हजार लाभार्थीपैकी अनुसूचित जाती, जमाती बेघर कुटुंबांचे फक्त १० हजार लाभार्थी आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिक वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे. याद्यांची फेतपासणी केव्हा ? शासन निकषातील १ ते १४ मार्गदर्शक सूचनांना बहुतांश ग्रामसभांमध्ये केराची टोपली दाखविण्यात आली आहे. बेघर कुटुंबांऐवजी पुन्हा श्रीमंत नागरिकांनाच घरकुलाचा लाभ देण्यात येणार आहे. त्यामुळे या याद्यांची आणि जनगणनेचीच शासनस्तरावर फेतरपासणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.