शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

अस्वस्थ पदाधिकाऱ्यांकडून पक्ष बदलाची चाचपणी

By admin | Updated: September 8, 2016 00:18 IST

महापालिका निवडणूक जवळ येवून लागल्याने सर्वच राजकीय पक्षांमध्ये घडामोडींना वेग येवू लागला आहे.

अंतर्गत वाद धुमसत : निवडणुकीचे वारेअमरावती : महापालिका निवडणूक जवळ येवून लागल्याने सर्वच राजकीय पक्षांमध्ये घडामोडींना वेग येवू लागला आहे. सर्वात मोठा पक्ष म्हणून लैकिक असलेल्या काँग्रेसमध्ये मात्र अस्वस्थता पसरली आहे. संघटनात्मक पातळीवर सर्व आॅलवेल असल्याचा दावा काँग्रेसजनकरीत असले तरी कोण कोणाच्या गोटात हे सर्वविदित झाले आहे. शहराध्यक्षपदाच्या वादावरुन काँग्रेसमधील नगरसेवक आणि इच्छुकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. ती दूर करण्यासाठी थेट प्रदेशाध्यक्षांनी कानपिचक्याही घेतल्या. मात्र अंतर्गत वादाचे धुमारे अजुनही तप्त आहेत. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेली अस्वस्थता दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू असले तरी त्यात कितपत यश येते, यावर महापालिका निवडणुकीत काँग्रेसची वाटचाल अवलंबून असेल. सभागृहात सर्वाधिक २५ नगरसेवक असलेल्या काँग्रेसला फुटाफुटीचे राजकारणाचीही भीती लागून राहयली आहे. एका ज्येष्ठ नगरसेवकाची स्थानिक आमदाराशी वाढलेली जवळीक पाहता काँग्रेसला त्यांच्यासह अन्य काही जण सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असल्याची खास सुत्रांची माहिती आहे. तर काही आपल्या जुन्या नेत्यांकडे जावून तिकीटाचे चाचपणी करीत आहेत. एकंदरीत शहर काँग्रेसमध्ये पडलेले तीन फाड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचंड उलथापालथीचे राहणार आहे. माजी आमदार शेखावत यांच्या वाढदिवसाला दांडी मारणारे चव्हाणांच्या बैठकीला आवर्जून उपस्थित होते. सगळे काही आॅलवेल दाखविण्याचा तो खटाटोप होता. सभागृह नेते बबलू शेखावत तर असा कुठला वादच मानत नाहीत. आम्ही काँग्रेसशी बांधिल आहोत. अकर्तेच सध्या शहराध्यक्ष आहेत. त्यामुळे शहराध्यक्ष पदाचा वाद असण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे सांगत आता मिशन महापालिकाच असल्याचे ते ठासून सांगतात. दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण येवून गेल्यावर शहराध्यक्षपदाच्या वादावर पडदा पडला असला तरी कोण कुणाच्या मागे, हे केव्हाचेच स्पष्ट झाले आहे. महापालिका निवडणुकीत मोठी झेप घेण्याची उमेद बाळगून असलेल्या काँग्रेसमधील ही अस्वस्थता दूर करण्याचे आव्हान माजी आमदार शेखावतांसह प्रदेश महासचिव संजय खोडके यांच्यापुढे आहे. विद्यमान शहराध्यक्ष अलिकडे वाड्याऐवजी बरेचदा बबलू शेखावतांच्या दालनात दिसतात. त्यामुळे ते बबलू शेखावत गटाकडे झुकल्याचे बोलले जाते. या प्रचंड अस्वस्थतेने तीन नगरसेवक काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहेत. प्रत्येक राजकीय पक्षात गट तर असतातच. मोठा पक्ष म्हणून काँग्रेसही त्याला अपवाद नाही. आगामी महापालिका निवडणुकीचा विचार करता अकर्तेच शहराध्यक्ष, अशी ठाम भूमिका प्रदेशाध्यक्षांनी घेतली. मात्र शहराध्यक्ष कुणीही होवो, वादंगाचे रुपांतर पक्ष बदलात होण्याचे स्पष्ट संकेत आहेत. (प्रतिनिधी)अकर्तेंना संधी मुळात शहराच्या राजकारणाचा विचार केला तर अजुनही प्रत्येक वॉर्डात कार्यकर्ते असलेला काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे. या पक्षाचे पाळेमुळे तळागाळात रोवली गेली आहेत. परंतु वाद - प्रतिवादामुळे, पक्षातील चैतन्य हरविले आहे. संजय अकर्ते हेच निवडणुकीपर्यंत शहराध्यक्ष असतील तर त्यांना पुन्हा एकदा आश्वासक सुरूवात करायला पुरेशी संधी आहे. निरव शांतता अंतर्गत सुदोपसुंदीमुळे शहर काँग्रेसमध्ये निरव शांतता पसरली आहे. चौबळवाड्यात तर चर्चा करतानाही कुणी दिसत नाही. बबलू शेखावतांचे दालनात काँग्रेसी नगरसेवकांची ये-जा तेवढी दिसते तर महापालिका निवडणुकीची ज्वर हळूहळू तापू लागला असताना काँग्रेसमधील निरव शांतता अस्वस्थतेला खतपाणी घालणारी ठरु लागली आहे.