शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

‘दहावी पास’ची अट, भावी सरपंच हैराण

By admin | Updated: June 8, 2017 00:13 IST

आता गावचा सरपंच होण्यासाठी किमान दहावी उत्तीर्ण असण्याची अट घालण्यात येणार आहे.

अनेकांची झोप उडाली : राजकारण बदलाचे संकेतचेतन घोगरे । लोकमत न्यूज नेटवर्कअंजनगाव सुर्जी : आता गावचा सरपंच होण्यासाठी किमान दहावी उत्तीर्ण असण्याची अट घालण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव ग्रामविकास विभागाने तयार करून तो विधी व न्याय विभागाला पाठविल्याच्याृ वृत्ताने आगामी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या अनेक भावी सरपंचांची झोप उडाल्याचे चित्र आहे. सरपंचाच्या निवडीसाठी दहावी उत्तीर्ण असण्याची अट लागू झाली तर आपले कसे होणार, या विचाराने ग्रामीण भागातील राजकारण्यांची झोप उडाली आहे. जिल्ह्यातील काही तालुक्यांमधील ग्रामपंचायतींची मुदत येत्या आॅक्टोबर-नोव्हेंबर तसेच २०१८ च्या जानेवारी महिन्यात २३ ग्रामपंचायतींची मुदत संपुष्टात येत आहे. त्यामुळे या निवडणुकीचा कार्यक्रमही निवडणूक विभागाच्यावतीने तयार करण्यात येत आहे. ग्रामीण भागात सरपंचाला मिनी आमदार समजले जाते.अत्यंत प्रतिष्ठेचे हे पद आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील राजकीय मंडळी यानिवडणुकीसाठी प्रतिष्ठा पणाला लावतात. होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी काही तालुक्यांतील गावांमध्ये अनेक राजकारण्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. परंतु, ग्रामीण भागातील जुनी जाणकार राजकारणी मंडळी अल्पशिक्षित आहेत. त्यामुळे ते दहावी पासची अट पूर्ण करू शकत नाहीत. दिग्गजांचाच ग्रामीण भागात वरचष्मा असल्याने अद्यापही येथे तरूणांना प्राधान्य मिळत नाही, हे वास्तव आहे. परंतु, येणाऱ्या निवडणुकीत सरपंचपदासाठी किमान दहावी उत्तीर्णचा नियम ग्रामविकास विभागाकडून लागू करण्यात येत असल्यामुळे अनेक दिग्गजांना या निर्णयाचा फटका बसू शकतो आणि आपोआपच शिक्षित तरूणांना प्रतिनिधित्व मिळू शकते. त्यामुळे ग्रामीण भागातील राजकारणालाच वेगळी दिशा मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, शैक्षणिक अटीमुळे निवडणुकीस मुकाव्या लागणाऱ्या भावी सरपंचांचे मात्र धाबे दणाणले आहेत. हा नियम अनेक दिग्गजांचे राजकारण संपुष्टात आणणारा ठरू शकतो, अशी जोरदार चर्चा सुरू आहे. २३ ग्रामपंचायतींची सन २०१८ मध्ये संपणार मुदतअमरावती जिल्ह्यातील काही तालुक्यांतील २६९ ग्रामपंचायतींची मुदत आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये संपुष्टात येणार आहे. तसेच २०१८ च्या जानेवारी महिन्यामध्ये २३ ग्रामपंचायतींची मुदत संपुष्टात येणार असून निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे.