शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
3
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
4
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
5
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
6
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
7
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
8
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
9
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
10
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
11
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
12
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
13
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
14
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
15
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
16
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
17
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
18
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
19
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
20
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं

‘दहावी पास’ची अट, भावी सरपंच हैराण

By admin | Updated: June 8, 2017 00:13 IST

आता गावचा सरपंच होण्यासाठी किमान दहावी उत्तीर्ण असण्याची अट घालण्यात येणार आहे.

अनेकांची झोप उडाली : राजकारण बदलाचे संकेतचेतन घोगरे । लोकमत न्यूज नेटवर्कअंजनगाव सुर्जी : आता गावचा सरपंच होण्यासाठी किमान दहावी उत्तीर्ण असण्याची अट घालण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव ग्रामविकास विभागाने तयार करून तो विधी व न्याय विभागाला पाठविल्याच्याृ वृत्ताने आगामी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या अनेक भावी सरपंचांची झोप उडाल्याचे चित्र आहे. सरपंचाच्या निवडीसाठी दहावी उत्तीर्ण असण्याची अट लागू झाली तर आपले कसे होणार, या विचाराने ग्रामीण भागातील राजकारण्यांची झोप उडाली आहे. जिल्ह्यातील काही तालुक्यांमधील ग्रामपंचायतींची मुदत येत्या आॅक्टोबर-नोव्हेंबर तसेच २०१८ च्या जानेवारी महिन्यात २३ ग्रामपंचायतींची मुदत संपुष्टात येत आहे. त्यामुळे या निवडणुकीचा कार्यक्रमही निवडणूक विभागाच्यावतीने तयार करण्यात येत आहे. ग्रामीण भागात सरपंचाला मिनी आमदार समजले जाते.अत्यंत प्रतिष्ठेचे हे पद आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील राजकीय मंडळी यानिवडणुकीसाठी प्रतिष्ठा पणाला लावतात. होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी काही तालुक्यांतील गावांमध्ये अनेक राजकारण्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. परंतु, ग्रामीण भागातील जुनी जाणकार राजकारणी मंडळी अल्पशिक्षित आहेत. त्यामुळे ते दहावी पासची अट पूर्ण करू शकत नाहीत. दिग्गजांचाच ग्रामीण भागात वरचष्मा असल्याने अद्यापही येथे तरूणांना प्राधान्य मिळत नाही, हे वास्तव आहे. परंतु, येणाऱ्या निवडणुकीत सरपंचपदासाठी किमान दहावी उत्तीर्णचा नियम ग्रामविकास विभागाकडून लागू करण्यात येत असल्यामुळे अनेक दिग्गजांना या निर्णयाचा फटका बसू शकतो आणि आपोआपच शिक्षित तरूणांना प्रतिनिधित्व मिळू शकते. त्यामुळे ग्रामीण भागातील राजकारणालाच वेगळी दिशा मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, शैक्षणिक अटीमुळे निवडणुकीस मुकाव्या लागणाऱ्या भावी सरपंचांचे मात्र धाबे दणाणले आहेत. हा नियम अनेक दिग्गजांचे राजकारण संपुष्टात आणणारा ठरू शकतो, अशी जोरदार चर्चा सुरू आहे. २३ ग्रामपंचायतींची सन २०१८ मध्ये संपणार मुदतअमरावती जिल्ह्यातील काही तालुक्यांतील २६९ ग्रामपंचायतींची मुदत आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये संपुष्टात येणार आहे. तसेच २०१८ च्या जानेवारी महिन्यामध्ये २३ ग्रामपंचायतींची मुदत संपुष्टात येणार असून निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे.