शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

रबीच्या हंगामाने वाढविली चिंता

By admin | Updated: December 7, 2014 22:44 IST

खरीप हंगामाने दगा दिल्यानंतर शेतकरी रबी पिकाची आस लावून होता. परंतु दीड महिना उशिरा खरिपाचा हंगाम, सोयाबीन पिकाचा फटका, जमिनीत नसणारी आर्द्रता यामुळे यंदाच्या रबी

अमरावती : खरीप हंगामाने दगा दिल्यानंतर शेतकरी रबी पिकाची आस लावून होता. परंतु दीड महिना उशिरा खरिपाचा हंगाम, सोयाबीन पिकाचा फटका, जमिनीत नसणारी आर्द्रता यामुळे यंदाच्या रबी हंगामात कृषी विभागाने नियोजन केलेल्या क्षेत्रापेक्षा अर्ध्याच क्षेत्रात रबीची पेरणी झाली आहे. आधीच कर्जबाजारी झालेला शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडला आहे. खरीप २०१४ च्या हंगामात पेरणीच्या जून महिन्यापासून दीड महिना पावसाने दडी मारली. त्यानंतर पावसात खंड यामुळे जिल्ह्यात खरिपाचे ५० टक्के क्षेत्र असणाऱ्या सोयाबीन पिकावर याचा परिणाम झाला. सोयाबीन पिकाला वाढीसाठी कालावधी मिळाला नाही. रोगाचा प्रादुर्भाव, सोयाबीन फुलोऱ्यावर व शेंगा भरण्याच्या स्थितीत पाऊस नाही यामुळे शेंगा पोचट राहिल्या. शेंगामधील दाणा बारीक पडला. परिणामी सरासरी उत्पन्नात ५० ते ७० टक्क्यांनी घट झाली. उत्पादन खर्चाच्या तुलनेत अर्धेही उत्पन्न झाले नाही. यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले. या परिस्थितीत किमान कपाशी व तुरीचा भरवसा शेतकऱ्यांना होता. परंतु कपाशीवर आलेला लाल्या, जमिनीत आर्द्रता कमी असल्याने कपाशीची न फुटणारी बोंडे, फुटलेच तर अर्धवट स्थितीत. यामुळे खालावलेला कापसाचा दर्जा शेतकऱ्यांच्या अडचणीत भर टाकत आहे. जमिनीत आर्द्रता नसल्यामुळे तुरीची झालेली बहरगळ, शेंगा भरण्याच्या स्थितीत शेंगा पोखरणाऱ्या अळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्यामुळे कपाशी व तुरीच्या सरासरी उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शासनाने खरिपाची ४६ पैसेवारी घोषित करून जिल्ह्याच्या या विदारक चित्रावर शिक्कामोर्तब केले आहे.खरिपाच्या पिकाची दैना झाल्यावर रबीचा सहारा मिळेल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. परंतु खरीपाचा हंगामच दीड महिना माघारल्याने रबीची पेरणीदेखील उशिरा सुरू झाली. जमिनीत आर्द्रता नसल्यामुळे हरभरा पिकाची उगवणशक्ती कमी झाली आहे. हरभरा पेरणीचा अंतिम कालावधी साधारणपणे १५ नोव्हेंबर समजण्यात येतो. परंतु सद्यस्थितीत जिल्ह्यात रबीची केवळ ४३ टक्केच पेरणी झाली आहे. या रबीच्या हंगामाने शेतकऱ्यांची चिंता वाढविली आहेत. खरिपात पूर्वीच कर्जबाजारी झालेला शेतकरी रबीमुळे आणखी आर्थिक संकटात सापडला आहे. (प्रतिनिधी)