शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

रबीच्या हंगामाने वाढविली चिंता

By admin | Updated: December 7, 2014 22:44 IST

खरीप हंगामाने दगा दिल्यानंतर शेतकरी रबी पिकाची आस लावून होता. परंतु दीड महिना उशिरा खरिपाचा हंगाम, सोयाबीन पिकाचा फटका, जमिनीत नसणारी आर्द्रता यामुळे यंदाच्या रबी

अमरावती : खरीप हंगामाने दगा दिल्यानंतर शेतकरी रबी पिकाची आस लावून होता. परंतु दीड महिना उशिरा खरिपाचा हंगाम, सोयाबीन पिकाचा फटका, जमिनीत नसणारी आर्द्रता यामुळे यंदाच्या रबी हंगामात कृषी विभागाने नियोजन केलेल्या क्षेत्रापेक्षा अर्ध्याच क्षेत्रात रबीची पेरणी झाली आहे. आधीच कर्जबाजारी झालेला शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडला आहे. खरीप २०१४ च्या हंगामात पेरणीच्या जून महिन्यापासून दीड महिना पावसाने दडी मारली. त्यानंतर पावसात खंड यामुळे जिल्ह्यात खरिपाचे ५० टक्के क्षेत्र असणाऱ्या सोयाबीन पिकावर याचा परिणाम झाला. सोयाबीन पिकाला वाढीसाठी कालावधी मिळाला नाही. रोगाचा प्रादुर्भाव, सोयाबीन फुलोऱ्यावर व शेंगा भरण्याच्या स्थितीत पाऊस नाही यामुळे शेंगा पोचट राहिल्या. शेंगामधील दाणा बारीक पडला. परिणामी सरासरी उत्पन्नात ५० ते ७० टक्क्यांनी घट झाली. उत्पादन खर्चाच्या तुलनेत अर्धेही उत्पन्न झाले नाही. यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले. या परिस्थितीत किमान कपाशी व तुरीचा भरवसा शेतकऱ्यांना होता. परंतु कपाशीवर आलेला लाल्या, जमिनीत आर्द्रता कमी असल्याने कपाशीची न फुटणारी बोंडे, फुटलेच तर अर्धवट स्थितीत. यामुळे खालावलेला कापसाचा दर्जा शेतकऱ्यांच्या अडचणीत भर टाकत आहे. जमिनीत आर्द्रता नसल्यामुळे तुरीची झालेली बहरगळ, शेंगा भरण्याच्या स्थितीत शेंगा पोखरणाऱ्या अळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्यामुळे कपाशी व तुरीच्या सरासरी उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शासनाने खरिपाची ४६ पैसेवारी घोषित करून जिल्ह्याच्या या विदारक चित्रावर शिक्कामोर्तब केले आहे.खरिपाच्या पिकाची दैना झाल्यावर रबीचा सहारा मिळेल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. परंतु खरीपाचा हंगामच दीड महिना माघारल्याने रबीची पेरणीदेखील उशिरा सुरू झाली. जमिनीत आर्द्रता नसल्यामुळे हरभरा पिकाची उगवणशक्ती कमी झाली आहे. हरभरा पेरणीचा अंतिम कालावधी साधारणपणे १५ नोव्हेंबर समजण्यात येतो. परंतु सद्यस्थितीत जिल्ह्यात रबीची केवळ ४३ टक्केच पेरणी झाली आहे. या रबीच्या हंगामाने शेतकऱ्यांची चिंता वाढविली आहेत. खरिपात पूर्वीच कर्जबाजारी झालेला शेतकरी रबीमुळे आणखी आर्थिक संकटात सापडला आहे. (प्रतिनिधी)