शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांचा घटस्फोट, ७ वर्षांनी लग्न तुटले!
2
Wimbledon 2025 Final : अल्काराझची हॅटट्रिक हुकली! नंबर वन यानिक सिनरनं विम्बल्डन जेतेपद जिंकत रचला इतिहास
3
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
4
मैत्रिणीला सोडायला गेलेली स्नेहा परत आलीच नाही; थेट यमुना नदीत सापडला मृतदेह; नेमकं काय घडलं?
5
अमरावती: पोलिसांनी उधळली तरुणाईची मद्य पार्टी ! अल्पवयीन मुला-मुलींसह १००-१५० जण ताब्यात
6
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
7
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
8
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
9
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
10
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
11
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
12
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
13
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
14
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
15
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
16
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
17
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
18
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
19
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
20
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं

रबीच्या हंगामाने वाढविली चिंता

By admin | Updated: December 7, 2014 22:44 IST

खरीप हंगामाने दगा दिल्यानंतर शेतकरी रबी पिकाची आस लावून होता. परंतु दीड महिना उशिरा खरिपाचा हंगाम, सोयाबीन पिकाचा फटका, जमिनीत नसणारी आर्द्रता यामुळे यंदाच्या रबी

अमरावती : खरीप हंगामाने दगा दिल्यानंतर शेतकरी रबी पिकाची आस लावून होता. परंतु दीड महिना उशिरा खरिपाचा हंगाम, सोयाबीन पिकाचा फटका, जमिनीत नसणारी आर्द्रता यामुळे यंदाच्या रबी हंगामात कृषी विभागाने नियोजन केलेल्या क्षेत्रापेक्षा अर्ध्याच क्षेत्रात रबीची पेरणी झाली आहे. आधीच कर्जबाजारी झालेला शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडला आहे. खरीप २०१४ च्या हंगामात पेरणीच्या जून महिन्यापासून दीड महिना पावसाने दडी मारली. त्यानंतर पावसात खंड यामुळे जिल्ह्यात खरिपाचे ५० टक्के क्षेत्र असणाऱ्या सोयाबीन पिकावर याचा परिणाम झाला. सोयाबीन पिकाला वाढीसाठी कालावधी मिळाला नाही. रोगाचा प्रादुर्भाव, सोयाबीन फुलोऱ्यावर व शेंगा भरण्याच्या स्थितीत पाऊस नाही यामुळे शेंगा पोचट राहिल्या. शेंगामधील दाणा बारीक पडला. परिणामी सरासरी उत्पन्नात ५० ते ७० टक्क्यांनी घट झाली. उत्पादन खर्चाच्या तुलनेत अर्धेही उत्पन्न झाले नाही. यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले. या परिस्थितीत किमान कपाशी व तुरीचा भरवसा शेतकऱ्यांना होता. परंतु कपाशीवर आलेला लाल्या, जमिनीत आर्द्रता कमी असल्याने कपाशीची न फुटणारी बोंडे, फुटलेच तर अर्धवट स्थितीत. यामुळे खालावलेला कापसाचा दर्जा शेतकऱ्यांच्या अडचणीत भर टाकत आहे. जमिनीत आर्द्रता नसल्यामुळे तुरीची झालेली बहरगळ, शेंगा भरण्याच्या स्थितीत शेंगा पोखरणाऱ्या अळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्यामुळे कपाशी व तुरीच्या सरासरी उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शासनाने खरिपाची ४६ पैसेवारी घोषित करून जिल्ह्याच्या या विदारक चित्रावर शिक्कामोर्तब केले आहे.खरिपाच्या पिकाची दैना झाल्यावर रबीचा सहारा मिळेल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. परंतु खरीपाचा हंगामच दीड महिना माघारल्याने रबीची पेरणीदेखील उशिरा सुरू झाली. जमिनीत आर्द्रता नसल्यामुळे हरभरा पिकाची उगवणशक्ती कमी झाली आहे. हरभरा पेरणीचा अंतिम कालावधी साधारणपणे १५ नोव्हेंबर समजण्यात येतो. परंतु सद्यस्थितीत जिल्ह्यात रबीची केवळ ४३ टक्केच पेरणी झाली आहे. या रबीच्या हंगामाने शेतकऱ्यांची चिंता वाढविली आहेत. खरिपात पूर्वीच कर्जबाजारी झालेला शेतकरी रबीमुळे आणखी आर्थिक संकटात सापडला आहे. (प्रतिनिधी)