शहरं
Join us  
Trending Stories
1
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
2
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
3
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७८ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
4
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
5
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
6
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
7
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
8
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
9
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
10
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
11
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
12
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
13
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
14
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
15
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
16
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
17
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
18
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
19
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
20
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...

संत्रा उत्पादकांवर चिंतेचे सावट

By admin | Updated: July 26, 2015 00:46 IST

मागील दीड महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने नर्सरीधारकांवर चिंतेचे सावट पसरले होते.

संजय खासबागे/जयप्रकाश भोंडेकर शेंदूरजनाघाटमागील दीड महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने नर्सरीधारकांवर चिंतेचे सावट पसरले होते. परिसरात ३० ते ४० कोटींचा व्यवसाय होऊन हजारो मजुरांच्या हातांना काम देणारी बाजारपेठ होती. परंतु यावर्षी दुष्काळी परिस्थिती असल्याने केवळ १० ते १५ रुपये प्रतिकलम विकण्याची पाळी शेतकऱ्यांवर आली आहे. त्यामुळे उत्पादन खर्चदेखील काढणे कठीण झाले आहे. यामुळे संत्रा कलमांना उतरती कळा लागली आहे. संत्रा आणि संत्रा कलमांकरिता प्रसिध्द असलेल्या वरुड तालुक्याला विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हटले जाते. ६० ते ७० वर्षांपासून शेंदूरजनाघाट परिसरातील शेतकरी ईडलिंबपासून काढलेल्या बियांतून तयार केलेल्या जंभेरी नावाच्या रोपट्यावर कलमा चढवून त्यापासून संत्रा मोसंबी, लिंंबूची रोपटी (कलमा) तयार करतात. या कलमा उत्पादनाकरिता आॅक्टोबर-नोव्हेंबरपासून सुरुवात केल्या जाते. ईडलिंंबू नावाच्या झाडाला येणाऱ्या फळातून बी काढून ते सावलीमध्ये वाळविले जाते. नंतर वाफा पद्धतीने त्याची पेरणी करून त्यापासून रोपटे तयार करतात. रोपट्यांची लागवड जुलै ते आॅगस्टमध्ये सुरु केली जाते. नोव्हेंबर ते जानेवारीमध्ये डोळे बांधणी केली जाते. पारंपरिक व्यवसाय असलेल्या संत्रा कलमा उत्पादक नवनवीन प्रयोग करुन रंगपूर लाईम, मोसंबीकरिता न्यूसेलर हैदराबादी, गावरानी अशा जातीचे कलम चढविले जाते. पोटच्या गोळयाप्रमाणे जोपासना केली जाते. संत्रा कलम तयार करण्यात १२ ते १५ रुपयापर्रुंत खर्च येतो. १८ महिन्यांनंतर विक्रीस उपलब्ध होणाऱ्या संत्रा कलमांना यावर्षी पावसाने दडी मारल्याने ग्राहक फिरकत नाही. यावर्षी दीड ते दोन कोटी संत्रा कलमांचे उत्पादन असून कलमांच्या खरेदीकरिता राजस्थान, मध्य प्रदेशासह देशाच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी येतात. विविध राज्यांच्या कृषी विभागाच्यावतीनेसुध्दा येथून परवान्यावर खरेदी केली जाते. यातून जून ते सप्टेंबरपर्यंत ३० ते ४० कोटी रुपयांची उलाढाल होत असते. तालुक्यात ३०० चे वर परवानाधारक नर्सरी तर तेवढेच विनापरवाना संत्रा कलमा निर्मिती करणारे आहेत. विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून नावलौकिक मिळविलेल्या वरुड तालुक्यावर नैसर्गिक ते कृत्रिम असे संकट सातत्याने येत आहेत. पावसाने दडी मारल्यामुळे परप्रांतीय ग्राहकांसह प्रांतीय ग्राहकसुध्दा कलमांच्या खरेदीकरिता फिरकले नसल्यामुळे नर्सरीधारकांची चिंता वाढली आहे. यामुळे व्यवसायावर अवकळा येऊन कोट्यवधींचे नुकसान शेतकऱ्यांना सोसावे लागत आहे. दलालांच्या पळवपळवीच्या धोरणामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. फलोत्पादन योजनेंतर्गत कृषी विभागाकडून शासकीय परवानासुध्दा अद्यापही मिळाले नाही.