शहरं
Join us  
Trending Stories
1
Pooja Khedkar Mother: नवी मुंबईतून ट्रक चालकाचं अपहरण, पुण्यातील घरात ठेवले डांबून; पूजा खेडकरच्या आईचा प्रताप
2
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
3
रशिया युक्रेन युद्ध संपूर्ण युरोपात पसरणार, NATO देशांचं सैन्य सज्ज; झेलेन्स्कींचा जगाला मोठा इशारा
4
हृदयद्रावक! BMW ने घेतला भारत सरकारच्या मोठ्या अधिकाऱ्याचा जीव; नेमकं काय घडलं?
5
UPI Rule Change: आजपासून मोठा बदल, मोठा दिलासा; आता UPI मधून एका दिवसात करू शकता 'इतक्या' लाखांचं ट्रान्झॅक्शन
6
Navratri 2025: आई तुळजाभवानीची घोर मंचकी निद्रा प्रारंभ; आता दर्शन थेट घटस्थापनेला!
7
पुढील ३ तासांसाठी मुंबईला 'रेड अलर्ट'; विजांच्या कडकडाट अन् जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा
8
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
9
Stock Markets Today: आठवड्याची सुस्त सुरुवात, ६० अंकांनी वधारला सेन्सेक्स; रियल्टी, मेटल शेअर्समध्ये खरेदी
10
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात केलेली ती चूक भोवणार? टीम इंडियावर कारवाई होणार?
11
PPF Investment: पती पत्नीसाठी डबल नफ्याची ट्रिक! टॅक्सही शून्य, व्याजही जास्त; कसा घ्याल फायदा?
12
युद्ध स्फोटक वळणावर, रशियन ड्रोन्स रोमानियात; युक्रेनचा रशियातील सर्वात मोठ्या तेल प्रकल्पावर भीषण हल्ला
13
राहुल गांधींवर आरोप करण्याऐवजी त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करा
14
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
15
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
16
ट्रम्प अन् निर्बंधांमुळे रशियन तेल मिळवण्यात भारताला अडचणी; जहाज कंपन्यांनी दिला नकार
17
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
18
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
19
‘एआय सायकोसिस’ ही स्थिती नेमकी काय आहे? Ai विचारांवर किंवा भावनांवर नियंत्रण ठेवत
20
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक

संत्रा उत्पादकांवर चिंतेचे सावट

By admin | Updated: July 26, 2015 00:46 IST

मागील दीड महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने नर्सरीधारकांवर चिंतेचे सावट पसरले होते.

संजय खासबागे/जयप्रकाश भोंडेकर शेंदूरजनाघाटमागील दीड महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने नर्सरीधारकांवर चिंतेचे सावट पसरले होते. परिसरात ३० ते ४० कोटींचा व्यवसाय होऊन हजारो मजुरांच्या हातांना काम देणारी बाजारपेठ होती. परंतु यावर्षी दुष्काळी परिस्थिती असल्याने केवळ १० ते १५ रुपये प्रतिकलम विकण्याची पाळी शेतकऱ्यांवर आली आहे. त्यामुळे उत्पादन खर्चदेखील काढणे कठीण झाले आहे. यामुळे संत्रा कलमांना उतरती कळा लागली आहे. संत्रा आणि संत्रा कलमांकरिता प्रसिध्द असलेल्या वरुड तालुक्याला विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हटले जाते. ६० ते ७० वर्षांपासून शेंदूरजनाघाट परिसरातील शेतकरी ईडलिंबपासून काढलेल्या बियांतून तयार केलेल्या जंभेरी नावाच्या रोपट्यावर कलमा चढवून त्यापासून संत्रा मोसंबी, लिंंबूची रोपटी (कलमा) तयार करतात. या कलमा उत्पादनाकरिता आॅक्टोबर-नोव्हेंबरपासून सुरुवात केल्या जाते. ईडलिंंबू नावाच्या झाडाला येणाऱ्या फळातून बी काढून ते सावलीमध्ये वाळविले जाते. नंतर वाफा पद्धतीने त्याची पेरणी करून त्यापासून रोपटे तयार करतात. रोपट्यांची लागवड जुलै ते आॅगस्टमध्ये सुरु केली जाते. नोव्हेंबर ते जानेवारीमध्ये डोळे बांधणी केली जाते. पारंपरिक व्यवसाय असलेल्या संत्रा कलमा उत्पादक नवनवीन प्रयोग करुन रंगपूर लाईम, मोसंबीकरिता न्यूसेलर हैदराबादी, गावरानी अशा जातीचे कलम चढविले जाते. पोटच्या गोळयाप्रमाणे जोपासना केली जाते. संत्रा कलम तयार करण्यात १२ ते १५ रुपयापर्रुंत खर्च येतो. १८ महिन्यांनंतर विक्रीस उपलब्ध होणाऱ्या संत्रा कलमांना यावर्षी पावसाने दडी मारल्याने ग्राहक फिरकत नाही. यावर्षी दीड ते दोन कोटी संत्रा कलमांचे उत्पादन असून कलमांच्या खरेदीकरिता राजस्थान, मध्य प्रदेशासह देशाच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी येतात. विविध राज्यांच्या कृषी विभागाच्यावतीनेसुध्दा येथून परवान्यावर खरेदी केली जाते. यातून जून ते सप्टेंबरपर्यंत ३० ते ४० कोटी रुपयांची उलाढाल होत असते. तालुक्यात ३०० चे वर परवानाधारक नर्सरी तर तेवढेच विनापरवाना संत्रा कलमा निर्मिती करणारे आहेत. विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून नावलौकिक मिळविलेल्या वरुड तालुक्यावर नैसर्गिक ते कृत्रिम असे संकट सातत्याने येत आहेत. पावसाने दडी मारल्यामुळे परप्रांतीय ग्राहकांसह प्रांतीय ग्राहकसुध्दा कलमांच्या खरेदीकरिता फिरकले नसल्यामुळे नर्सरीधारकांची चिंता वाढली आहे. यामुळे व्यवसायावर अवकळा येऊन कोट्यवधींचे नुकसान शेतकऱ्यांना सोसावे लागत आहे. दलालांच्या पळवपळवीच्या धोरणामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. फलोत्पादन योजनेंतर्गत कृषी विभागाकडून शासकीय परवानासुध्दा अद्यापही मिळाले नाही.