शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
3
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
4
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
5
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
6
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
7
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
8
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
9
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
10
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
11
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
12
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
13
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
14
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
15
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
16
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
17
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
18
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
19
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
20
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'

उत्पादकतेसाठी ‘एक गाव एक वाण’ संकल्पना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:14 IST

बियाणे उपलब्धतेसाठी काटेकोर नियोजन करा - कृषिमंत्री अमरावती : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, यासाठी यंदा उत्पादकता वर्ष म्हणून उपक्रम ...

बियाणे उपलब्धतेसाठी काटेकोर नियोजन करा - कृषिमंत्री

अमरावती : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, यासाठी यंदा उत्पादकता वर्ष म्हणून उपक्रम हाती घेण्यात आला आहे. सर्व पातळीवर उत्पादनाचा आढावा घेण्यासाठी ‘एक गाव एक वाण’ ही संकल्पना राबविण्यात येईल. यामुळे शेतकऱ्यांना जादाचे उत्पन्न मिळण्यास मदत होईल. ‘विकेल ते पिकेल’ यानुसार काही नावीन्यपूर्ण पिके घेण्याकडे शेतकऱ्यांना वळविल्यास पाच टक्क्यांपर्यंत पीक बदल होण्यास मदत मिळेल, असे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी सोमवारी सांगितले.

विभागस्तरीय खरीप हंगाम आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी ना. यशोमती ठाकूर, आमदार बळवंत वानखेडे, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, विभागीय कृषी सहसंचालक शंकर तोटावार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चव्हाळे, नवनाथ कोळपकर, डॉ. के. बी. खोत, नरेंद्र नाईक उपस्थित होते.

शेतकऱ्यांना बियाण्यांची उपलब्धता होण्यासाठी कृषी विभागाने काटेकोरपणे नियोजन करावे, यासाठी गाव आणि शेतकरी पातळीवर बियाणे उपलब्धतेचे नियोजन करावे, शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध होण्यासाठी दररोज आढावा घेण्यात यावा, असे निर्देश त्यांनी दिले.

दरवर्षीच्या खरीप हंगामात बियाणे आणि खतांचा प्रश्न अधिक जाणवतो. त्यामुळे या दोन्हीचे नियोजन करणे आवश्यक आहे. बियाणे उपलब्ध करण्यासाठी शासकीय जमिनी तसेच उपलब्ध जागेवर बियाणांसाठी लागवड झाल्यास उपयुक्त ठरेल, असे ना. भुसे म्हणाले.

बॉक्स

पीककर्ज वेळेत मिळण्यासाठी नियोजन

शेतकऱ्यांना पीककर्ज वेळेत मिळण्यासाठी नियोजन करावे. खरीप हंगामात पीककर्ज मिळण्यासाठी पारदर्शक पद्धती राबविण्यात यावी. शासनाने ३१ लाख शेतकऱ्यांच्या कर्जाची रक्कम बँकांना उपलब्ध करून दिलेली आहे. येत्या काळात उर्वरित शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळणार असल्याने शेतकऱ्यांना वेळेत कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी कार्यवाहीचे निर्देश कृषिमंत्र्यांनी दिले.

बॉक्स

गावपातळीवर कृषी विकास समिती

शेतकऱ्यांसाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ तातडीने मिळावा, यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून ३३ हजार हेक्टरवर फळबागांची लागवड करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना पिकांची लागवड करण्यासाठी प्रत्येक गावात जमीन सुपिकता फलक लावण्यात येणार आहे. शेतीचा गावपातळीवर विकास होण्यासाठी ग्राम कृषी विकास समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.