शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

महालेखा नियंत्रकांच्या अहवालात विदर्भाच्या निर्मितीला समर्थन

By admin | Updated: August 31, 2014 23:29 IST

राज्यसभेत स्वतंत्र विदर्भ राज्य स्थापनेच्या खासगी प्रस्तावावर चर्चेदरम्यान मार्च २००६ मध्ये पंतप्रधानांनीच विदर्भाच्या गंभीर प्रश्नांवर योजना आयोगाची विशेष समिती नियुक्त केली होती.

सुरेश सवळे - चांदूरबाजारराज्यसभेत स्वतंत्र विदर्भ राज्य स्थापनेच्या खासगी प्रस्तावावर चर्चेदरम्यान मार्च २००६ मध्ये पंतप्रधानांनीच विदर्भाच्या गंभीर प्रश्नांवर योजना आयोगाची विशेष समिती नियुक्त केली होती. या समितीच्या विशेष अभ्यासगटाने विदर्भाच्या वेगवेगळ्या भागांना भेटी देऊन नागरिक, कार्यकर्ते, राजकीय नेते, मंत्री व शासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करुन महालेखा नियंत्रक व परीक्षकांच्या सहकार्याने २२५ पानांचा अहवाल सादर केला होता. सन २००६-०७ च्या या अहवालात विदर्भावर झालेल्या अन्यायाचे वास्तव असून स्वतंत्र विदर्भाचे समर्थन करणारा आहे.विदर्भाचा आर्थिक समतोल लक्षात घेता महाराष्ट्रात विदर्भाचा विकास अशक्यप्राय असल्याची बाब अहवालात स्पष्ट करण्यात आली आहे. विदर्भ विकासाकरिता महाराष्ट्र सरकारमध्ये राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्याचेही सरकारची उदासीनता, विदर्भाचा निधी इतरत्र पळविण्याचे कारस्थान, वीज निर्मिती व वीज वितरणातील प्रचंड भेदभाव याकडेही या अहवालात लक्ष वेधण्यात आले. राज्यपालांनी २००२ ते २००५ दरम्यान मंजूर केलेल्या निधीमधून २५०० कोटी रुपये विदर्भाला कमी देण्यात आले आणि त्याचवेळी पश्चिम महाराष्ट्राला मंजुरीपेक्षा १६०० कोटी अधिक देण्यात आले. ही योजना आयोगानेच उघड केली आहे.बछवत लवादाप्रमाणे सिंचन प्रकल्पासाठी विदर्भाला निधी देण्यामध्ये राज्य सरकारने कुचराई केली. त्यावेळी पश्चिम महाराष्ट्रातील प्रकल्पासाठी विदर्भाचा पैसाही वळविला. आयोगाने यासंबंधी विचारले असता विदर्भातील सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आमच्याकडे निधी नाही. केंद्राने निधी उपलब्ध करुन द्यावा, असे राज्य शासनाने त्यावेळी म्हटले होते. त्यामुळे विदर्भाचे स्वतंत्र राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात रुपांतर का करण्यात येऊ नये, असा मुद्दा त्यावेळी योजना आयोगाने उपस्थित केला होता.