शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
2
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
3
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
4
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
5
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
6
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
7
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
8
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
9
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
10
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
11
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
12
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
13
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
14
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
15
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
16
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
17
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
18
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
19
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
20
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त

संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र योजनेचा फज्जा

By admin | Updated: January 5, 2015 22:55 IST

राज्यात २०११ पासून लोकांच्या सेवेसाठी जाहीर करण्यात आलेली संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र योजना अद्यापही पूर्णपणे यशस्वी झाली नसल्याचे चित्र समोर येत आहे. मात्र शासन स्तरावरुन योजनेला दिला

अमरावती : राज्यात २०११ पासून लोकांच्या सेवेसाठी जाहीर करण्यात आलेली संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र योजना अद्यापही पूर्णपणे यशस्वी झाली नसल्याचे चित्र समोर येत आहे. मात्र शासन स्तरावरुन योजनेला दिला जाणार निधी अविरत पुरविला जात असल्याने खरा लाभार्थी कोण? हा प्रश्न उपस्थित होत आहे. या योजनेनुसार ग्रामपंचायतीला प्रदान केलेले संगणक संच अनेक ग्रामपंचायतींमध्ये धूळखात पडले आहेत. ग्रामपंचायतींना पुरविलेल्या वस्तू अंत्यत निकृष्ट दर्जाच्या असल्यामुळे संगणक काही दिवसांतच बंद पडले आहेत. यासाठी नियुक्त कंपनी अधिकारी, कर्मचारी संबंधित ग्रामपंचायतींच्या तक्रारींचे निवारण करीत नाही. याबाबत अनेक ग्रामपंचायतींच्या लेखी तक्रारी आहेत. तोंडी तक्रार करुन उपयोग नसल्याची ओरड आहे. मात्र दुरुस्ती व देखभालीसाठी मिळणारा निधी कंपनीच्याच घशात जात असल्याचा आरोप होत आहे. याकरिता प्रती ग्रामपंचायतीकडून प्रतीमाह २ हजार ५०० रुपयांप्रमाणे वर्षाचे १ लाख रुपये निर्विवाद कपात १३ व्या वित्त आयोगाच्या निधीतून केले जातात. यातून ४ हजार १०० ते ३ हजार ८०० एवढे मानधन कुशल कामगाराला दिले जाते. त्यातही वेतन नियमित होत नसल्याच्या तक्रारी आहेत. यानंतर उरलेल्या ४ हजार ५०० रुपयांमध्ये संबंधित पंचायतीला कंपनीकडून पुरविली जाणारी स्टेशनरी व टोनरला शाई तथा देखभालीकरिता कोणतीही तसदी घेतली जात नाही. यासाठी वर्षाकाठी एक हजार ते १५०० रुपयांच्यावर वस्तू दिल्या जात नाहीत. मध्येच लागणारी स्टेशनरी, नेटखर्चाकरिता संबंधित ग्रामपंचायतीला अतिरिक्त खर्च करावा लागतो. योजनेनुसार पंचायतीच्या कामकाजाचे आॅनलाईन दप्तर दाखल करण्यासाठी नेमलेल्या कारागिरांचा अपेक्षाभंग होत आहे. (प्रतिनिधी)