शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र योजनेचा फज्जा

By admin | Updated: January 5, 2015 22:55 IST

राज्यात २०११ पासून लोकांच्या सेवेसाठी जाहीर करण्यात आलेली संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र योजना अद्यापही पूर्णपणे यशस्वी झाली नसल्याचे चित्र समोर येत आहे. मात्र शासन स्तरावरुन योजनेला दिला

अमरावती : राज्यात २०११ पासून लोकांच्या सेवेसाठी जाहीर करण्यात आलेली संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र योजना अद्यापही पूर्णपणे यशस्वी झाली नसल्याचे चित्र समोर येत आहे. मात्र शासन स्तरावरुन योजनेला दिला जाणार निधी अविरत पुरविला जात असल्याने खरा लाभार्थी कोण? हा प्रश्न उपस्थित होत आहे. या योजनेनुसार ग्रामपंचायतीला प्रदान केलेले संगणक संच अनेक ग्रामपंचायतींमध्ये धूळखात पडले आहेत. ग्रामपंचायतींना पुरविलेल्या वस्तू अंत्यत निकृष्ट दर्जाच्या असल्यामुळे संगणक काही दिवसांतच बंद पडले आहेत. यासाठी नियुक्त कंपनी अधिकारी, कर्मचारी संबंधित ग्रामपंचायतींच्या तक्रारींचे निवारण करीत नाही. याबाबत अनेक ग्रामपंचायतींच्या लेखी तक्रारी आहेत. तोंडी तक्रार करुन उपयोग नसल्याची ओरड आहे. मात्र दुरुस्ती व देखभालीसाठी मिळणारा निधी कंपनीच्याच घशात जात असल्याचा आरोप होत आहे. याकरिता प्रती ग्रामपंचायतीकडून प्रतीमाह २ हजार ५०० रुपयांप्रमाणे वर्षाचे १ लाख रुपये निर्विवाद कपात १३ व्या वित्त आयोगाच्या निधीतून केले जातात. यातून ४ हजार १०० ते ३ हजार ८०० एवढे मानधन कुशल कामगाराला दिले जाते. त्यातही वेतन नियमित होत नसल्याच्या तक्रारी आहेत. यानंतर उरलेल्या ४ हजार ५०० रुपयांमध्ये संबंधित पंचायतीला कंपनीकडून पुरविली जाणारी स्टेशनरी व टोनरला शाई तथा देखभालीकरिता कोणतीही तसदी घेतली जात नाही. यासाठी वर्षाकाठी एक हजार ते १५०० रुपयांच्यावर वस्तू दिल्या जात नाहीत. मध्येच लागणारी स्टेशनरी, नेटखर्चाकरिता संबंधित ग्रामपंचायतीला अतिरिक्त खर्च करावा लागतो. योजनेनुसार पंचायतीच्या कामकाजाचे आॅनलाईन दप्तर दाखल करण्यासाठी नेमलेल्या कारागिरांचा अपेक्षाभंग होत आहे. (प्रतिनिधी)