शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
3
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
4
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
5
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
6
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
7
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
8
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
9
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
10
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
11
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
12
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
13
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
14
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
15
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

शाळा-महाविद्यालये बंदला संमिश्र प्रतिसाद

By admin | Updated: December 8, 2014 22:29 IST

खर्च कमी करण्याच्या उद्देशाने ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती बंद करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने शासनाकडे पाठविला आहे. त्यामुळे २५ लाख विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

अमरावती : खर्च कमी करण्याच्या उद्देशाने ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती बंद करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने शासनाकडे पाठविला आहे. त्यामुळे २५ लाख विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. विदर्भातील ओबीसी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याला तडा जाऊ नये, याकरिता अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने सोमवारी सकाळपासून शहरातील शाळा-महाविद्यालये बंद आंदोलन पुकारले. या आंदोलनाला शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. माहितीनुसार, संविधान कलम ३४० नुसार एससी, एसटी प्रमाणेच ओबीसी वर्गवारीला समान अधिकार देण्याची घोषणा झाली होती. आतापर्यंत ओबीसींना विविध क्षेत्रात आरक्षण व शिक्षण सुविधांचा लाभ मिळत होता. मात्र सत्ता परिवर्तन होताच राज्य सरकारने ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. दरवर्षी शिष्यवृत्तीसाठी ३८० कोटींचा खर्च शासनाकडून केला जात होता. मात्र हा खर्च वाचविण्यासाठी ओबीसीची शिष्यवृत्ती बंद करण्याचा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठविण्यात आला आहे. त्यावर बांठिया समिती गठित करण्यात आली आहे. ही समिती स्थगित करुन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात यावी, विद्यार्थ्यांना २०११ पासूनची ११०० कोटींची थकबाकी परत द्यावी, पालकांना आयकरमध्ये सहा लाखांपर्यंतची सूट द्यावी, अशा विविध मागण्यांसाठी सोमवारी (८ डिसेंंबर) शाळा-महाविद्यालये बंदचे आंदोलन करण्यात आले. सोमवारी सकाळापासून अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेकडून आंदोलन सुरु करण्यात आले. मात्र शाळा-महाविद्यालयांचा संमिश्र प्रतिसाद दिसून आला. समता परिषेदच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शाळा-महाविद्यालयांना भेट देऊन विनंती केली. आंदोलनात विभागीय अध्यक्ष बाबुराव बेलसरे, गणेश खारकर, संजय मापले, भूषण गवई, प्रवीण मेटकर, अंबाडकर, नितीन इंगोले, मीना बखाडे, सुनील वासनकर आदी उपस्थित होते.