शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
2
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
3
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
4
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
5
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
6
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
7
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
8
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
9
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
10
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
11
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
12
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."
13
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
14
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
15
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
16
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
17
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
18
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
19
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
20
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!

‘ट्रायबल’ वसतिगृहात विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:11 IST

वसतिगृहे केव्हा सुरू होणार? आदिवासी विद्यार्थ्यांचा सवाल, कोरोनात शिक्षणापासून वंचित असल्याचे शल्य अमरावती : राज्याच्या आदिवासी विकास विभागाने सन ...

वसतिगृहे केव्हा सुरू होणार? आदिवासी विद्यार्थ्यांचा सवाल, कोरोनात शिक्षणापासून वंचित असल्याचे शल्य

अमरावती : राज्याच्या आदिवासी विकास विभागाने सन २०२०-२०२१ या शैक्षणिक वर्षासाठी आदिवासी विद्यार्थ्यांचे वसतिगृहात प्रवेशासाठी ऑनलाईन प्रक्रिया राबविली आहे. मात्र, वसतिगृह बंद असल्याने विद्यार्थी घरीच ‘लॉक’ आहेत. दुसरीकडे ऑनलाईन शिक्षणाने विद्यार्थी वैतागले असून शाळा-महाविद्यालये सुरू होऊन ऑफलाईन शिक्षण मिळावे, अशी आदिवासी विद्यार्थ्यांची मागणी आहे.

कोरोनामुळे राज्य शिक्षण मंडळाने दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे परीक्षाविना पुढील वर्गात प्रवेश होणार असल्याने अभ्यासू विद्यार्थ्यांचे यात मोठे शैक्षणिक नुकसान मानले जात आहे. दहावी, बारावीचे मूल्यांकन झाल्यानंतरच निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे निकालानंतरच उत्तीर्ण होणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना अकरावी अथवा पदवी प्रथम वर्षाच्या प्रवेशानंतर वसतिगृहात ऑनलाईन प्रवेश मिळवावा लागेल. अमरावती विभागांतर्गत धारणी, पांढरकवडा, पुसद, अकोला, किनवट, कळमनुरी व औरंगाबाद या सातही एकात्मिक प्रकल्प कार्यालय अधिनस्थ १०४ शासकीय वसतिगृहांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेश निश्चित केला आहे.

-----------------------

सात प्रकल्पांतील वसतिगृहाच्या प्रवेशावर एक नजर

शासकीय वसतिगृहाची संख्या : १०४

वसतिगृह मंजूर प्रवेश क्षमता : १३२१५

ईमारत मंज़ूर प्रवेश क्षमता : १३१२४

जुने प्रवेशित विद्यार्थिसंख्या : ६३३१

नवीन प्रवेशित विद्यार्थी संख्या : ५०१४

एकूण प्रवेशित विद्यार्थी संख्या :११३४५

मंजूर प्रवेश क्षमतेनुसार रिक्त जागा : १८७०

इमारत क्षमतेनुसार रिक्त जागा : १७७९

-------------------

दहावी, बारावीच्या निकालाची प्रतीक्षा

कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षण घेतले. मात्र, शालेय शिक्षण विभागाने परीक्षाच रद्द केल्या आहेत. त्यामुळे आता परीक्षाविना दहावी, बारावीचा निकाल हा पहिल्यांदाच विद्यार्थ्यांना अनुभव येणार आहे. मात्र, दऱ्याखोऱ्यात, वस्ती, वाड्यावर वास्तव्यास असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांना दहावी, बारावीच्या निकालाची प्रतीक्षा आहे. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतल्यानंतर वसतिगृहात प्रवेश घेता येईल, असे चित्र आहे.

--------------------

कोट

अमरावती ‘ट्रायबल’ विभागातंर्गत सातही एकात्मिक प्रकल्पात वसतिगृहात सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी ५०१४ आदिवासी विद्यार्थ्यांचे वसतिगृहात ऑनलाईन प्रवेश निश्चित करण्यात आले आहे. दहावी, बारावीच्या निकालानंतर पुन्हा वसतिगृहात प्रवेश दिला जाईल.

- विनोद पाटील, अपर आयुक्त, आदिवासी विकास विभाग, अमरावती.