शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठाच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करेन

By admin | Updated: November 25, 2015 00:49 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या शासन दरबारी प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन,

रणजित पाटील : पाण्याच्या टाकीच्या बांधकामाचा शुभारंभअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या शासन दरबारी प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन, असे आश्वासन राज्याचे गृह, शहरी विकास, सामान्य प्रशासन, विधी व न्याय आणि सांसदीय कार्य राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री रणजित पाटील यांनी केले. विद्यापीठातील पाण्याच्या टाकीच्या बांधकामाच्या शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते. विद्यापीठ परिसरातील अ‍ॅथेलेटीक ट्रॅकजवळ हा कार्यक्रम सोमवारी पार पडला. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी कुलगुरू मोहन खेडकर, महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य श्रीकांत देशपांडे, प्र-कुलगुरू जयकिरण तिडके, कुलसचिव अजय देशमुख, बीसीयुडी संचालक आर.एस. सपकाळ, परीक्षा नियंत्रक जे.डी. वडते, वित्त व लेखाधिकारी शशिकांत आस्वले, जनसंपर्क अधिकारी विलास नांदुरकर व कार्यकारी अभियंता शशिकांत रोडे उपस्थित होते. रणजित पाटील पुढे म्हणाले, यावर्षी पाण्याची समस्या बिकट आहे. त्यामुळे पाणी वापराचे नियोजन सर्वांना करावयाचे आहे. विद्यापीठाने २०-२५ वर्षांचे नियोजन डोळ्यासमोर ठेवून जलकुंभ निर्मितीचे कार्य हाती घेतले, ही बाब अभिनंदनीय आहे. विद्यापीठात संत गाडगेबाबांच्या नावाने अध्यासनाची परिपूर्ण इमारत बांधण्याकरिता ५.५० कोटी रूपयांची आवश्यकता आहे. गाडगेबाबा आमचे दैवत आहेत. त्यासाठी निधी देण्याचा प्रयत्न करू, उच्चशिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे हा मुद्दा लावून धरू, असे आश्वासन त्यांनी दिले. श्रीकांत देशपांडे यांनी मनोगत व्यक्त केले.चार लक्ष लीटर क्षमता असलेली पाण्याच्या टाकीचे काम लवकरच पूर्ण होणार आहे. प्रास्ताविक भाषणातून कुलसचिव अजय देशमुख यांनी कार्यक्रमा विषयी माहिती दिली. संचालन जनसंपर्क अधिकारी विलास नांदुरकर यांनी केले. आभार प्रदर्शन विद्यार्थी कल्याण संचालक गणेश मालटे यांनी केले. कार्यक्रमाला दिनेश सूर्यवंशी, एम.टी. देशमुख, डी.जी. भंडागे, अमरसिंह राठोड, रवी वैद्य, अधिष्ठाता मार्कस लाकडे, विद्यापीठाचे विभाग प्रमुख, अधिकारी आणि कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)