शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

सिंचन प्रकल्प तात्काळ पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:12 IST

बळवंत वानखडे : दर्यापूर : तालुका हा खारपाणपट्ट्याचा भाग असल्याने येथील शेतकऱ्यांना पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे शेतकऱ्यांना ...

बळवंत वानखडे :

दर्यापूर : तालुका हा खारपाणपट्ट्याचा भाग असल्याने येथील शेतकऱ्यांना पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त पिके घेता यावीत, त्यादृष्टीने तालुक्यातील सिंचन प्रकल्प तातडीने पूर्ण करावेत, असे निर्देश आमदार बळवंत वानखडे यांनी दिले.

शेतकऱ्यांना सिंचनाचे पाणी उपलब्ध व्हावे म्हणून २ एप्रिल रोजी आ. वानखडे यांनी तालुक्यातील सिंचन प्रकल्पावर जाऊन आढावा घेतला. तालुक्यातील सामदा लघु प्रकल्प, वाघाडी बॅरेज, चंद्रभागा बॅरेज या प्रकल्पांना पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत भेटी देऊन प्रलंबित विषयांचा आढावा घेतला. प्रकल्पामुळे शेतकऱ्यांची शेती व वहिवाटीचे रस्ते मोठ्या प्रमाणात बाधित झाले असून, पावसाळ्यापूर्वी तात्काळ वहिवाटीचे रस्ते पूर्ण करण्याचे आदेश आमदारांनी दिले. याशिवाय सामदा प्रकल्प अंतर्गत पाणी पूर्ण क्षमतेने अडवण्याचे निर्देश दिले. वाघाडी बॅरेज अंतर्गत यंदा पाणी अडवण्याबाबत सूचना केल्या तसेच तेथील प्रकल्पबाधित शेतीच्या वहिवाटीचे रस्ते तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. यावेळी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राशनकर, उपविभागीय अभियंता गिरी, कनिष्ठ अभियंता गुल्हाने, गोपाळ तराळ, प्रभाकर तराळ, गजाननराव देवतळे, गुड्डू गावंडे, राजू कराळे, बंडू दाभाडे उपस्थित होते.

--------------