शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

गुरूकुंज उपसा सिंचन योजना पूर्ण करा

By admin | Updated: April 23, 2016 00:08 IST

तालुक्यातील अंदाजे १५ गावांतील सिंचनाचे ७ हजार १०९ हेक्टर क्षमता असलेल्या महत्त्वाकांक्षी गुरुकुंज उपसा सिंचन योजनेचे काम जलदगतीने पूर्ण करण्यात यावे,

मागणी : यशोमती ठाकूर यांनी मांडला मुद्दातिवसा : तालुक्यातील अंदाजे १५ गावांतील सिंचनाचे ७ हजार १०९ हेक्टर क्षमता असलेल्या महत्त्वाकांक्षी गुरुकुंज उपसा सिंचन योजनेचे काम जलदगतीने पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी आमदार यशोमती ठाकूर यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षात नुकत्याच पार पडलेल्या आढावा बैठकीत केली.लहरी निसर्गामुळे जमिनीतील जलस्तर घटल्यामुळे सिंचनाचा प्रश्न गंभीर झाला होता. अप्पर वर्धा धरणाचा उजवा मुख्य कालवा तालुक्यातून गेला असताना आम्हाला मात्र सिंचनाकरिता याचा फारसा लाभ होत नाही. या पृष्ठभूमिवर तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनाकरिता पाणी मिळावे, यासाठी आ. यशोमती ठाकूर यांनी शासन, प्रशासन पातळीवर सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या या प्रयत्नांची फलश्रृती म्हणून अखेर विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळामार्फत १३ जुलै २००८ नुसार प्रशासकीय मान्यता देण्यात आली. त्यानुसार उजव्या मुख्य कालव्याच्या मीटरवरून पाणी उचल करण्याचे यामध्ये प्रस्तावित आहे. २१२.६३ कोटी रुपये खर्च असलेल्या या योजनेंतर्गत तालुक्यातील १५ गावातील ७ हजार १०९ हेक्टर लाभक्षेत्र राहणार आहे. त्यानंतर काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे योजनेचे काम संथगतीने सुरू होते. त्यामुळे महत्वपूर्ण योजना जलदगतीने पूर्ण व्हावी, याकरिता आ. यशोमती ठाकूर यांनी पुन्हा एकदा यासाठी शासन पातळीवर पाठपुरावा केल्यामुळे पाईपलाईनचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. (प्रतिनिधी)