शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

नगरपंचायतींची स्थापना पूर्ण, आता प्रतीक्षा प्रभाग रचनेची

By admin | Updated: June 3, 2015 00:28 IST

जिल्ह्यातील चार तालुका मुख्यालयी असलेल्या ग्रामपंचायतींचे रूपांतर नगर पंचायतीमध्ये करण्यात आले.

जितेंद्र दखने अमरावतीजिल्ह्यातील चार तालुका मुख्यालयी असलेल्या ग्रामपंचायतींचे रूपांतर नगर पंचायतीमध्ये करण्यात आले. त्यामुळे नगरपंचायतीची स्थापना झाली. मात्र आता या ठिकाणी प्रभाग रचनेची प्रतीक्षा पुढाऱ्यांना लागली आहे. जिल्ह्यातील धारणी, तिवसा, नांदगाव खंडेश्वर व भातकुली या चार तालुक्यांच्या ठिकाणी आतापर्यंत ग्रामपंचायती अस्तित्वात होत्या. मात्र काही महिन्यांपूर्वी या चार तालुक्यांच्या ठिकाणी असलेल्या ग्रामपंचायतीचे रूपांतर नगर पंचायतीत करण्यात आले. त्यामुळे नुकत्याच पार पडलेल्या या सर्वात मोठ्या ग्रामपंचायतींचे निवडणूक नगरपंचायतीमुळे होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे आता विद्यमान सदस्य असलेल्या या ग्रामपंचायतींच्या पुढाऱ्यांना प्रभागरचनेची उत्सुकता लागली आहे. या ग्रामपंचायतींच्या माध्यमातून स्थानिक नेत्यांनी आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. ग्रामपंचायत असून शहर व तालुक्यांचे मुख्यालय असल्याने येथील सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा मान मोठा होता. अशातच राज्य शासनाने जिल्ह्यातील चार ग्रामपंचायती बरखास्त करून याठिकाणी नगरपंचायती स्थापन करण्याचा निर्णय घेऊन या नव्याने अस्तित्वात आलेल्या नगरपंचायतींवर प्रशासक म्हणून अधिकाऱ्यांच्या नियुक्त्याही केल्या आहेत. त्यामुळे सध्या या नगरपंचायतींचा कारभार प्रशासक असलेले अधिकारी सांभाळत आहेत. परंतु नगरपंचायत अस्तित्वात आल्याने काही दिवसांत निवडणुका लागणार असून या निवडणुकीसाठी प्रभागरचना व अन्य प्रक्रिया त्यापूर्वी होणे गरजेचे आहे. ग्रामपंचायत बरखास्त करून नगरपंचायत अस्तित्वात आल्याने अनेक प्रकारचे बदल यात होणार आहेत. त्यादृष्टीने शासन व प्रशासन स्तरावर नगरपंचायत स्थापनेनंतर करावयाच्या उपाययोजनाबाबत हालचाली सुरू नसल्याने येथील पुढाऱ्यांना मात्र प्रभाग रचना व अन्य उपाययोजनांची उत्सुकता लागली आहे. या आहेत नवीन नगरपंचायती जिल्ह्यातील चार ग्रामपंचायती बरखास्त करण्यात आल्या आहेत. त्यामुळे धारणी, तिवसा, भातकुली, नांदगाव खंडेश्र्वर या चार तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी नव्याने नगरपंचायती अस्तित्वात आल्या आहेत.नव्याने ज्या चार नगरपंचायती अस्तित्वात आल्यात, त्या ठिकाणी प्रशासनाने प्राथमिक स्तरावर सध्या असलेल्या वॉर्ड, लोकसंख्या, याची माहिती संकलित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र प्रभाग रचनेबाबत अद्याप कार्यक्रम प्राप्त झाला नाही.- राम सिध्दभट्टी,प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी अमरावती.