शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
2
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
3
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
4
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
5
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
6
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
7
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
8
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
9
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
10
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
11
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
12
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
13
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
14
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
15
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
16
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
17
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
19
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
20
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण

नगरपंचायतींची स्थापना पूर्ण, आता प्रतीक्षा प्रभाग रचनेची

By admin | Updated: June 3, 2015 00:28 IST

जिल्ह्यातील चार तालुका मुख्यालयी असलेल्या ग्रामपंचायतींचे रूपांतर नगर पंचायतीमध्ये करण्यात आले.

जितेंद्र दखने अमरावतीजिल्ह्यातील चार तालुका मुख्यालयी असलेल्या ग्रामपंचायतींचे रूपांतर नगर पंचायतीमध्ये करण्यात आले. त्यामुळे नगरपंचायतीची स्थापना झाली. मात्र आता या ठिकाणी प्रभाग रचनेची प्रतीक्षा पुढाऱ्यांना लागली आहे. जिल्ह्यातील धारणी, तिवसा, नांदगाव खंडेश्वर व भातकुली या चार तालुक्यांच्या ठिकाणी आतापर्यंत ग्रामपंचायती अस्तित्वात होत्या. मात्र काही महिन्यांपूर्वी या चार तालुक्यांच्या ठिकाणी असलेल्या ग्रामपंचायतीचे रूपांतर नगर पंचायतीत करण्यात आले. त्यामुळे नुकत्याच पार पडलेल्या या सर्वात मोठ्या ग्रामपंचायतींचे निवडणूक नगरपंचायतीमुळे होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे आता विद्यमान सदस्य असलेल्या या ग्रामपंचायतींच्या पुढाऱ्यांना प्रभागरचनेची उत्सुकता लागली आहे. या ग्रामपंचायतींच्या माध्यमातून स्थानिक नेत्यांनी आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. ग्रामपंचायत असून शहर व तालुक्यांचे मुख्यालय असल्याने येथील सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा मान मोठा होता. अशातच राज्य शासनाने जिल्ह्यातील चार ग्रामपंचायती बरखास्त करून याठिकाणी नगरपंचायती स्थापन करण्याचा निर्णय घेऊन या नव्याने अस्तित्वात आलेल्या नगरपंचायतींवर प्रशासक म्हणून अधिकाऱ्यांच्या नियुक्त्याही केल्या आहेत. त्यामुळे सध्या या नगरपंचायतींचा कारभार प्रशासक असलेले अधिकारी सांभाळत आहेत. परंतु नगरपंचायत अस्तित्वात आल्याने काही दिवसांत निवडणुका लागणार असून या निवडणुकीसाठी प्रभागरचना व अन्य प्रक्रिया त्यापूर्वी होणे गरजेचे आहे. ग्रामपंचायत बरखास्त करून नगरपंचायत अस्तित्वात आल्याने अनेक प्रकारचे बदल यात होणार आहेत. त्यादृष्टीने शासन व प्रशासन स्तरावर नगरपंचायत स्थापनेनंतर करावयाच्या उपाययोजनाबाबत हालचाली सुरू नसल्याने येथील पुढाऱ्यांना मात्र प्रभाग रचना व अन्य उपाययोजनांची उत्सुकता लागली आहे. या आहेत नवीन नगरपंचायती जिल्ह्यातील चार ग्रामपंचायती बरखास्त करण्यात आल्या आहेत. त्यामुळे धारणी, तिवसा, भातकुली, नांदगाव खंडेश्र्वर या चार तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी नव्याने नगरपंचायती अस्तित्वात आल्या आहेत.नव्याने ज्या चार नगरपंचायती अस्तित्वात आल्यात, त्या ठिकाणी प्रशासनाने प्राथमिक स्तरावर सध्या असलेल्या वॉर्ड, लोकसंख्या, याची माहिती संकलित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र प्रभाग रचनेबाबत अद्याप कार्यक्रम प्राप्त झाला नाही.- राम सिध्दभट्टी,प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी अमरावती.