शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

सीमोल्लंघनापूर्वी हवी संपूर्ण कर्जमुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 23:25 IST

सततची नापिकी, आणि अस्मानी संकटाने गारद झालेल्या शेतकºयांना संपूर्ण कर्जमुक्ती द्यावी,....

ठळक मुद्देशिवसेनेचा हल्लाबोल : शासनविरोधी घोषणांसह कलेक्ट्रेटवर धडक

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सततची नापिकी, आणि अस्मानी संकटाने गारद झालेल्या शेतकºयांना संपूर्ण कर्जमुक्ती द्यावी, यामागणीसाठी सोमवारी शिवसेनेने जिल्हाकचेरीवर हल्लाबोल केला. जिल्हाधिकाºयांना मागण्यांचे निवेदन देऊन दसºयापूर्वी अन्नदात्याला कर्जमुक्त न केल्यास शिवसेना रस्त्यावर उतरेल, असा निर्वाणीचा इशारा देण्यात आला.खा. आनंदराव अडसूळ यांच्या नेतृत्वात स्थानिक इर्विन चौक ते कलेक्ट्रेट दरम्यान शेतकरी कर्जमुक्तीच्या प्रमुख मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला. यामोर्चात जिल्हाभरातून शेतकºयांसह शिवसैनिकांचा मोठा सहभाग होता. २४ जून २०१७ रोजी शासनाने कर्जमुक्तीची घोषणा केली. मात्र, कर्जमुक्तीचा केवळ ‘फार्स’ झाला आहे. कागदोपत्री कर्जमुक्तीचा देखावा करण्यात आल्याचा आरोप खा. आनंदराव अडसूळ यांनी यावेळी केला. भाजप सरकार शेतकºयांची बोळवण करीत असून कर्जमुक्तीसाठी तांत्रिक निकष पूर्ण करताना शेतकºयांचा अक्षरश: अंत पाहिला जात असल्याचा आरोपही करण्यात आला. खरीप हंगाम शेतकºयांच्या हातून गेला किमान रबी हंगामासाठी शेतकºयांना दिलासा मिळावा, यासाठी दसºयापूर्वीच त्यांना कर्जमुक्त करणे गरजेचे आहे, अशी मागणी निवेदनातून जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांना करण्यात आली.कर्जमुक्तीचा फास, सेनेचा आरोपमोर्चादरम्यान शासनविरोधी नारेबाजी करण्यात आली. मोर्चात खा. अडसूळ यांच्यासह जिल्हाप्रमुख संजय बंड, नगरसेवक प्रशांत वानखडे, राजेश वानखडे, सुनील खराटे, शोभा लोखंडे, वर्षा भोयर, मनीषा टेंभरे, पराग गुडधे, प्रकाश मारोटकर, ललीत झंझाड, बाळासाहेब राणे, किशोर माहोरे, शाम देशमुख, प्रवीण अब्रुक, विकास येवले, दयाराम सोनी, गोपाळ राणे, नरेंद्र पडोळे, आशिष धर्माळे, प्रदीप गौरखेडे, नाना नागमोते, अमोल निस्ताने, नीलेश जामठे, बंडू साऊत, विनोद डहाके, राजू निंबर्ते, बाबा ठाकूर, सुभाष मुळे, गोपाल अरबट, कपिल देशमुख, टिल्लू तिवारी, अर्चना धामणे, महेश खारोळे, दत्ता ढोमणे, दीपक मदनेकर, सुनील राऊत, राहुल माटोडेसह पदाधिकारी उपस्थित होते.