शहरं
Join us  
Trending Stories
1
"...महाराष्ट्राच्या इतिहास एवढा मोठा विजय कुणालाच मिळालेला नाही, ही तर...," फडणवीसांनी नगराध्यक्ष, नगरसेवकांचा आकडाच सांगितला
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

आमदारांच्या मुंबई जनता दरबारात तक्रारींचा पाऊस

By admin | Updated: April 23, 2016 00:01 IST

आ. बच्चू कडू यांनी मुंबईस्थित मनोरा आमदार निवासात आयोजित केलेल्या जनता दरबाराला राज्यातील नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला.

५०० तक्रारींचा निपटारा : महिनाभरात समस्या सोडवा अन्यथा आंदोलनचांदूरबाजार : आ. बच्चू कडू यांनी मुंबईस्थित मनोरा आमदार निवासात आयोजित केलेल्या जनता दरबाराला राज्यातील नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. या जनता दरबारात मंत्रालयातील अधिकाऱ्यांविरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्यात. यापैकी ५०० तक्रारींचा निपटारा आ. बच्चू कडू यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क करून ‘आॅन दी स्पॉट केला’. उर्वरित प्रलंबित तक्रारींचा निर्णय महिनाभराच्या आत घ्या, अन्यथा मंत्रालयात पुन्हा आंदोलन करण्याचाखणखणीत इशारा प्रहार संघटनेच्यावतीने आ. बच्चू कडू यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना दिला. या सर्व समस्यांचे लेखी निवेदन प्रहार संघटनेच्यावतीने आ. बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. मंत्रालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे वेतन जनतेकडून वसूल केला जाणाऱ्या करातून होते. मात्र, याची जाणीव त्यांना नसल्याने ते मंत्रालयाचे मालक असल्यासारखे वागू लागतात. महाराष्ट्र लोकसेवा हमी कायदा असून यानुसार आठवड्याच्या आत तक्रारींचे निवारण होणे आवश्यक आहे. परंतु मंत्रालयातील अधिकारी दाखल झालेल्या कोणत्याच अर्जाची वर्षानुवर्षे दखलच घेत नाहीत. यापुढे असे झाल्यास मंत्रालयातील त्या अधिकाऱ्याच्या खुर्चीचा लिलाव करून गोळा झालेला पैसा शासकीय तिजोरीत जमा करण्याचा इशाराही याप्रसंगी प्रहारकडून देण्यात आला आहे. जनता दरबारात राज्यभरातून स्वातंत्र्य संग्राम सैनिक, ज्येष्ठ नागरिक, अपंग महिला, तरुण, विद्यार्थी, वकील, शेतकरी, शासकीय कर्मचारी, विधवा व नक्षलग्रस्त भागातील नागरिकांसह सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी, शिवरत्न शेटे, नीलेश ओझा, जनविकास प्रबोधिनीचे संतोष गवस, जनता दल मुंबईच्या अध्यक्ष ज्योती बेडेकर, सिटीजन फोरम, प्राध्यापक संघटना, माहिती अधिकार कायदा संरक्षक इत्यादी समाजसेवी संस्थाही सहभागी झाल्या होत्या. (तालुका प्रतिनिधी) बच्चू कडूंचा मंत्रालयाच्या दारावरच ठिय्या जनता दरबारात प्राप्त झालेली शेकडो प्रकरणे घेऊन आमदार बच्चू कडू मंत्रालयात निघाले असता त्यांना पोलिसांनी मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावरच अडविले. आमदारांसोबत फक्त एकाच व्यक्तिला आत सोडण्याचे आदेश असल्याचे पोलिसांनी त्यांना सांगितले. यावर बच्चू कडूंनी मंत्रालयाच्या दारातच ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर अवघ्या १० मिनिटांतच पोलीस यंत्रणा हादरली व त्यांनी सर्व कार्यकर्त्यांसह आमदारांनाही आत सोडले. मुख्य सचिवांकडे शुक्रवारी दाखल झालेली सर्व प्रकरणे अधिकाऱ्यांकडे सोपवून या प्रकरणांची दखल घ्या अन्यथा परिणाम भोगायला तयार रहा, असा इशारा मुख्य सचिवांना देण्यास आ. बच्चू कडू विसरले नाहीत.