शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

आमदारांच्या मुंबई जनता दरबारात तक्रारींचा पाऊस

By admin | Updated: April 23, 2016 00:01 IST

आ. बच्चू कडू यांनी मुंबईस्थित मनोरा आमदार निवासात आयोजित केलेल्या जनता दरबाराला राज्यातील नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला.

५०० तक्रारींचा निपटारा : महिनाभरात समस्या सोडवा अन्यथा आंदोलनचांदूरबाजार : आ. बच्चू कडू यांनी मुंबईस्थित मनोरा आमदार निवासात आयोजित केलेल्या जनता दरबाराला राज्यातील नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. या जनता दरबारात मंत्रालयातील अधिकाऱ्यांविरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्यात. यापैकी ५०० तक्रारींचा निपटारा आ. बच्चू कडू यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क करून ‘आॅन दी स्पॉट केला’. उर्वरित प्रलंबित तक्रारींचा निर्णय महिनाभराच्या आत घ्या, अन्यथा मंत्रालयात पुन्हा आंदोलन करण्याचाखणखणीत इशारा प्रहार संघटनेच्यावतीने आ. बच्चू कडू यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना दिला. या सर्व समस्यांचे लेखी निवेदन प्रहार संघटनेच्यावतीने आ. बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. मंत्रालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे वेतन जनतेकडून वसूल केला जाणाऱ्या करातून होते. मात्र, याची जाणीव त्यांना नसल्याने ते मंत्रालयाचे मालक असल्यासारखे वागू लागतात. महाराष्ट्र लोकसेवा हमी कायदा असून यानुसार आठवड्याच्या आत तक्रारींचे निवारण होणे आवश्यक आहे. परंतु मंत्रालयातील अधिकारी दाखल झालेल्या कोणत्याच अर्जाची वर्षानुवर्षे दखलच घेत नाहीत. यापुढे असे झाल्यास मंत्रालयातील त्या अधिकाऱ्याच्या खुर्चीचा लिलाव करून गोळा झालेला पैसा शासकीय तिजोरीत जमा करण्याचा इशाराही याप्रसंगी प्रहारकडून देण्यात आला आहे. जनता दरबारात राज्यभरातून स्वातंत्र्य संग्राम सैनिक, ज्येष्ठ नागरिक, अपंग महिला, तरुण, विद्यार्थी, वकील, शेतकरी, शासकीय कर्मचारी, विधवा व नक्षलग्रस्त भागातील नागरिकांसह सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी, शिवरत्न शेटे, नीलेश ओझा, जनविकास प्रबोधिनीचे संतोष गवस, जनता दल मुंबईच्या अध्यक्ष ज्योती बेडेकर, सिटीजन फोरम, प्राध्यापक संघटना, माहिती अधिकार कायदा संरक्षक इत्यादी समाजसेवी संस्थाही सहभागी झाल्या होत्या. (तालुका प्रतिनिधी) बच्चू कडूंचा मंत्रालयाच्या दारावरच ठिय्या जनता दरबारात प्राप्त झालेली शेकडो प्रकरणे घेऊन आमदार बच्चू कडू मंत्रालयात निघाले असता त्यांना पोलिसांनी मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावरच अडविले. आमदारांसोबत फक्त एकाच व्यक्तिला आत सोडण्याचे आदेश असल्याचे पोलिसांनी त्यांना सांगितले. यावर बच्चू कडूंनी मंत्रालयाच्या दारातच ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर अवघ्या १० मिनिटांतच पोलीस यंत्रणा हादरली व त्यांनी सर्व कार्यकर्त्यांसह आमदारांनाही आत सोडले. मुख्य सचिवांकडे शुक्रवारी दाखल झालेली सर्व प्रकरणे अधिकाऱ्यांकडे सोपवून या प्रकरणांची दखल घ्या अन्यथा परिणाम भोगायला तयार रहा, असा इशारा मुख्य सचिवांना देण्यास आ. बच्चू कडू विसरले नाहीत.