शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

बच्चू कडूंच्या जनता दरबारात तक्रारींचा पाऊस

By admin | Updated: April 19, 2016 00:08 IST

सामान्यांच्या शासन स्तरावरील प्रलंबित प्रकरणांचा न्याय निवाडा करण्यासाठी सोमवारी प्रहार संघटनेच्यावतीने आ. बच्चू कडू यांच्या उपस्थितीत...

प्रहारचा उपक्रम : तहसील ते मंत्रालय स्तरावरील २७० तक्रारी दाखल अमरावती : सामान्यांच्या शासन स्तरावरील प्रलंबित प्रकरणांचा न्याय निवाडा करण्यासाठी सोमवारी प्रहार संघटनेच्यावतीने आ. बच्चू कडू यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृहात पार पडलेल्या जनता दरबारात मंत्रालयातील सर्वच विभागाकडील तब्बल २७० तक्रारी शहर व जिल्ह्यातील नागरिकांनी दाखल केल्या आहेत.सामान्य जनतेला अनेक कामांसाठी त्यांच्या मागण्यांसाठी समस्याकरिता सर्वच शासकीय कार्यालय ते मंत्रालयात वर्षानुवर्र्षे चकरा मारायला लावण्याची वृत्ती दिवसे दिवस वाढत चालली आहे. ही प्रवृत्ती कायमची बंद करण्यासाठी प्रहार संघटनेने १८ एप्रिल रोजी आ. बच्चू कडू यांच्या उपस्थितीत पहिल्यांदा जनतेच्या प्रश्नासाठी जनता दरबार घेतला. यामध्ये शहर व ग्रामीण भागातील अनेक त्रस्त नागरिकांनी मंत्रालयातील जवळपास ४० विभागांत न्याय मागणीचे प्रलंबित असलेल्या दस्तऐवजासह तक्रारी व गऱ्हाणी या जनता दरबारात सादर केल्या आहेत. विशेष म्हणजे यामध्ये तहसील ते मंत्रालय स्तरावरील प्रकरणाचा समावेश आहे. या सर्व तक्रारी प्रहार संघटनेने एका अर्जाच्या नमुन्यात स्वीकारल्या आहेत. यापैकी ५० टक्के तक्रारी ह्या स्थानिक पातळीवरील असल्याने संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून निकाली काढण्यात आल्याचे आ. बच्चू कडू यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले. या जनता दरबारात जिल्हा व शहरातील नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.यावेळी प्रहारचे शहरध्यक्ष धीरज जयस्वाल, जिल्हा प्रमुख छोटू महाराज वसु, चंदू खेडकर, शंभू मालठाणे, जोगेंद्र मोहोड, रोशन देशमुख, गजू घुगुल, भारत उगले, मुकेश घुंडीयाल व पदाधिकारी तसेच तालुकाध्यक्ष उपस्थित होते. (प्रतिनिधी)प्राप्त तक्रारींपैकी अर्ध्या तक्रारींचा निपटारा केला आहे. काही प्रकरणांची छाननी करून दप्तर दिरंगाई, सेवा हमी कायद्याचे उल्लंघन आणि जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले, अशी प्रकरणे निकाली काढण्याबाबत संबंधितांना मुदत दिली जाईल. त्यानंतर दिलेल्या मुदतीत या प्रकरणांचा न्यायनिवाडा न केल्यास अशांना प्रहार स्टाईलने धडा शिकविला जाईल- बच्चू कडू, आमदार, अचलपूर