शहरं
Join us  
Trending Stories
1
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
2
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
3
'मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’, आजारी संजय राऊत यांच्यासाठी सुषमा अंधारे यांची खास पोस्ट
4
Mumbai Hostage Case: ‘त्याने फटाके वाजवले आणि बाहेर गोळीबार सुरू असल्याचे सांगितले’; रोहित आर्या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी वृद्ध महिलेचा खुलासा
5
ट्रम्प यांनी अण्वस्त्र टेस्टिंगचा आदेश देताच रशियाची थेट प्रतिक्रिया, दिला अल्टीमेटम!
6
मित्रांचा आग्रह जीवावर बेतला, पार्टीत बॅक टूक बॅक पाजले पेग; २६ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू
7
पवईतील आरोपी रोहित आर्यला दीपक केसरकरांनी इतकी मोठी रक्कम का दिली?; सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल
8
मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडली दोन सिल्वर गिबन; कस्टम अधिकारीही झाले अवाक्
9
वाघ अगदी जवळून पाहायचाय? मग, भारतातील 'या' ६ व्याघ्र प्रकल्पांना नक्की भेट द्या!
10
गोळीबार, आग आणि धमकीचं पत्र, फरार कैद्याने आणले पोलिसांच्या नाकी नऊ, नेमकं प्रकरण काय?
11
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले; सर्वात जास्त कुठे?
12
Extra Marital Affairs:मुलाचं लग्न ठरलं आणि होणाऱ्या सूनेच्या बापावरच जडला महिलेचा जीव; लग्नाआधीच दोघे गेले पळून
13
Rain Alert: कमी दाबाचे क्षेत्र कायम, या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; महाराष्ट्रात कुठे-कुठे पाऊस पडणार?
14
शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमाफी करा; उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी
15
धोनीची गुंतवणूक असलेली कंपनी बाजारात! ६ नोव्हेंबरला उघडणार IPO; प्राइस बँडसह तपशील जाणून घ्या
16
खात्यात ८ लाख जमा केले अन् प्राप्तिकर विभागाची 'टॅक्स' नोटीस; ६ वर्षांच्या लढ्यानंतर करदात्याचा विजय!
17
Viral Video: हत्तीला पाहून सिंह मंडळींची 'हवा टाइट'... झाडाखाली बसले असताना काय घडलं, पाहा
18
थेट मंत्र्यांच्या ताफ्यालाच पाठलाग करून अडवले, वादावादी, कारची तोडफोड करण्याचा प्रयत्न, कारण काय?
19
Powai Hostage: रोहित आर्या प्रकरणातील नवी माहिती, मुलांसोबत ऑडिशनसाठी गेलेले पालक म्हणाले...
20
Abhishek Sharma Record Breaking Fifty : जिथं सगळ्यांनी नांगी टाकली, तिथं अभिषेक शर्माची विक्रमी खेळी

बच्चू कडूंच्या जनता दरबारात तक्रारींचा पाऊस

By admin | Updated: April 19, 2016 00:08 IST

सामान्यांच्या शासन स्तरावरील प्रलंबित प्रकरणांचा न्याय निवाडा करण्यासाठी सोमवारी प्रहार संघटनेच्यावतीने आ. बच्चू कडू यांच्या उपस्थितीत...

प्रहारचा उपक्रम : तहसील ते मंत्रालय स्तरावरील २७० तक्रारी दाखल अमरावती : सामान्यांच्या शासन स्तरावरील प्रलंबित प्रकरणांचा न्याय निवाडा करण्यासाठी सोमवारी प्रहार संघटनेच्यावतीने आ. बच्चू कडू यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृहात पार पडलेल्या जनता दरबारात मंत्रालयातील सर्वच विभागाकडील तब्बल २७० तक्रारी शहर व जिल्ह्यातील नागरिकांनी दाखल केल्या आहेत.सामान्य जनतेला अनेक कामांसाठी त्यांच्या मागण्यांसाठी समस्याकरिता सर्वच शासकीय कार्यालय ते मंत्रालयात वर्षानुवर्र्षे चकरा मारायला लावण्याची वृत्ती दिवसे दिवस वाढत चालली आहे. ही प्रवृत्ती कायमची बंद करण्यासाठी प्रहार संघटनेने १८ एप्रिल रोजी आ. बच्चू कडू यांच्या उपस्थितीत पहिल्यांदा जनतेच्या प्रश्नासाठी जनता दरबार घेतला. यामध्ये शहर व ग्रामीण भागातील अनेक त्रस्त नागरिकांनी मंत्रालयातील जवळपास ४० विभागांत न्याय मागणीचे प्रलंबित असलेल्या दस्तऐवजासह तक्रारी व गऱ्हाणी या जनता दरबारात सादर केल्या आहेत. विशेष म्हणजे यामध्ये तहसील ते मंत्रालय स्तरावरील प्रकरणाचा समावेश आहे. या सर्व तक्रारी प्रहार संघटनेने एका अर्जाच्या नमुन्यात स्वीकारल्या आहेत. यापैकी ५० टक्के तक्रारी ह्या स्थानिक पातळीवरील असल्याने संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून निकाली काढण्यात आल्याचे आ. बच्चू कडू यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले. या जनता दरबारात जिल्हा व शहरातील नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.यावेळी प्रहारचे शहरध्यक्ष धीरज जयस्वाल, जिल्हा प्रमुख छोटू महाराज वसु, चंदू खेडकर, शंभू मालठाणे, जोगेंद्र मोहोड, रोशन देशमुख, गजू घुगुल, भारत उगले, मुकेश घुंडीयाल व पदाधिकारी तसेच तालुकाध्यक्ष उपस्थित होते. (प्रतिनिधी)प्राप्त तक्रारींपैकी अर्ध्या तक्रारींचा निपटारा केला आहे. काही प्रकरणांची छाननी करून दप्तर दिरंगाई, सेवा हमी कायद्याचे उल्लंघन आणि जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले, अशी प्रकरणे निकाली काढण्याबाबत संबंधितांना मुदत दिली जाईल. त्यानंतर दिलेल्या मुदतीत या प्रकरणांचा न्यायनिवाडा न केल्यास अशांना प्रहार स्टाईलने धडा शिकविला जाईल- बच्चू कडू, आमदार, अचलपूर