शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वाघाच्या सुरक्षिततेसाठी गावकऱ्यांसोबत संवाद

By admin | Updated: February 3, 2017 00:19 IST

नजीकच्या पोहरा, चिरोडी राखीव जंगलात वाघाचे अस्तित्व सिद्ध झाले आहे. त्यामुळे वाघाच्या सुरक्षिततेची महत्त्वपूर्ण जबाबदारी

उपवनसंरक्षकांचा पुढाकार : पोहरा, चिरोडी जंगलात ‘नवाब’चे अस्तित्वअमरावती : नजीकच्या पोहरा, चिरोडी राखीव जंगलात वाघाचे अस्तित्व सिद्ध झाले आहे. त्यामुळे वाघाच्या सुरक्षिततेची महत्त्वपूर्ण जबाबदारी गावकऱ्यांवरही सोपविण्याचा निर्णय वनविभागाने घेतला आहे. त्याअनुषंगाने बुधवारी उपवनसंरक्षकांनी जंगल शेजारील गावकऱ्यांसोबत संवाद साधून वाघाचे अस्तित्व आणि गावकऱ्यांचे प्रश्न, समस्या जाणून घेतल्यात.पोहरा, चिरोडी, मालखेडच्या राखीव जंगलात वाघ, बिबट, मोर, हरिण आदी वन्यप्राणी, पशुंचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. एकेकाळी हे जंगल नष्ट होणार की काय, अशी भीती निर्माण झाली होती. वनविभागाने हे जंगल समृद्ध करण्यासाठी जीवाचे रान केले. परिणामी आता वाघाच्या अस्तित्वाने पोहरा, चिरोडी जंगल राज्याच्या नकाशावर झळकत आहे. आता या जंगलाची समृद्धी कायम ठेवताना पाहुणा म्हणून आलेल्या नवाब नामक वाघाच्या सुरक्षिततेची मोठी जबाबदारी उपवनसंरक्षक हेमंत मीणा यांच्याकडे आली आहे. परिणामी वने आणि वन्यप्राण्यांवर प्रेम करणाऱ्या गावकऱ्यांसोबत थेट संवाद साधण्यासाठी आयएफएस असलेले उपवनसंरक्षक हेमंत मीणा यांनी पुढाकार घेतला आहे. पोहरा, चिरोडी, कारला, इंदला, कस्तुरा, हातला, बोडणा, पिंपळखुटा, परसोडा, भानखेडा, दिवाणखेडा, घातखेडा ही गावे जंगलावर निर्भर आहेत. इंधन, चारा, पाणी, तेंदू या गरजा पूर्ण करण्यासाठी ग्रामस्थांना पर्याय नाही. पोहरा, चिरोडीत असलेल्या वाघ, बिबट अन्य वन्यप्राण्यांचे संरक्षण तसेच जंगलाचे संवर्धन करण्यासाठी गावकऱ्यांना विश्वासात घेण्यासाठी वनविभाग सरसावला आहे. या गावांमध्ये संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे बळकटीकरण करताना गावात प्रत्येक कुटुंबीयांना घरगुती गॅस सिलिंडर वाटप, चारा तयार करण्यासाठी साहित्य व निसर्ग पर्यटन बाबीवर भर दिला जात आहे. त्याकरिता गावागावांत बैठकी घेऊन उपवनसंरक्षक मीणा हे ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेत आहेत. वने, वन्यप्राण्यांच्या संरक्षणासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. पोहरा येथील गावकऱ्यांसोबत संवाद साधताना हेमंत मीणा यांनी जंगलात वाघ असल्याचे स्पष्ट केले. गावकऱ्यांनादेखील आता जंगलात भीती वाटत आहे. हे जंगल बहरले असून गुरे चराईसाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर असून ते त्वरेने सोडवाव्यात, अशी मागणी करण्यात आली. बैठकीला सरपंच वनिता राऊत, वनपरिक्षेत्राधिकारी अनंत गावंडे, वनपाल विनोद कोहळे, वन्यजीवप्रेमी यादव तरटे, माजी सरपंच सुभाष राठोड, पोलीस पाटील पवार आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)