शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

वाघाच्या सुरक्षिततेसाठी गावकऱ्यांसोबत संवाद

By admin | Updated: February 3, 2017 00:19 IST

नजीकच्या पोहरा, चिरोडी राखीव जंगलात वाघाचे अस्तित्व सिद्ध झाले आहे. त्यामुळे वाघाच्या सुरक्षिततेची महत्त्वपूर्ण जबाबदारी

उपवनसंरक्षकांचा पुढाकार : पोहरा, चिरोडी जंगलात ‘नवाब’चे अस्तित्वअमरावती : नजीकच्या पोहरा, चिरोडी राखीव जंगलात वाघाचे अस्तित्व सिद्ध झाले आहे. त्यामुळे वाघाच्या सुरक्षिततेची महत्त्वपूर्ण जबाबदारी गावकऱ्यांवरही सोपविण्याचा निर्णय वनविभागाने घेतला आहे. त्याअनुषंगाने बुधवारी उपवनसंरक्षकांनी जंगल शेजारील गावकऱ्यांसोबत संवाद साधून वाघाचे अस्तित्व आणि गावकऱ्यांचे प्रश्न, समस्या जाणून घेतल्यात.पोहरा, चिरोडी, मालखेडच्या राखीव जंगलात वाघ, बिबट, मोर, हरिण आदी वन्यप्राणी, पशुंचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. एकेकाळी हे जंगल नष्ट होणार की काय, अशी भीती निर्माण झाली होती. वनविभागाने हे जंगल समृद्ध करण्यासाठी जीवाचे रान केले. परिणामी आता वाघाच्या अस्तित्वाने पोहरा, चिरोडी जंगल राज्याच्या नकाशावर झळकत आहे. आता या जंगलाची समृद्धी कायम ठेवताना पाहुणा म्हणून आलेल्या नवाब नामक वाघाच्या सुरक्षिततेची मोठी जबाबदारी उपवनसंरक्षक हेमंत मीणा यांच्याकडे आली आहे. परिणामी वने आणि वन्यप्राण्यांवर प्रेम करणाऱ्या गावकऱ्यांसोबत थेट संवाद साधण्यासाठी आयएफएस असलेले उपवनसंरक्षक हेमंत मीणा यांनी पुढाकार घेतला आहे. पोहरा, चिरोडी, कारला, इंदला, कस्तुरा, हातला, बोडणा, पिंपळखुटा, परसोडा, भानखेडा, दिवाणखेडा, घातखेडा ही गावे जंगलावर निर्भर आहेत. इंधन, चारा, पाणी, तेंदू या गरजा पूर्ण करण्यासाठी ग्रामस्थांना पर्याय नाही. पोहरा, चिरोडीत असलेल्या वाघ, बिबट अन्य वन्यप्राण्यांचे संरक्षण तसेच जंगलाचे संवर्धन करण्यासाठी गावकऱ्यांना विश्वासात घेण्यासाठी वनविभाग सरसावला आहे. या गावांमध्ये संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे बळकटीकरण करताना गावात प्रत्येक कुटुंबीयांना घरगुती गॅस सिलिंडर वाटप, चारा तयार करण्यासाठी साहित्य व निसर्ग पर्यटन बाबीवर भर दिला जात आहे. त्याकरिता गावागावांत बैठकी घेऊन उपवनसंरक्षक मीणा हे ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेत आहेत. वने, वन्यप्राण्यांच्या संरक्षणासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. पोहरा येथील गावकऱ्यांसोबत संवाद साधताना हेमंत मीणा यांनी जंगलात वाघ असल्याचे स्पष्ट केले. गावकऱ्यांनादेखील आता जंगलात भीती वाटत आहे. हे जंगल बहरले असून गुरे चराईसाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर असून ते त्वरेने सोडवाव्यात, अशी मागणी करण्यात आली. बैठकीला सरपंच वनिता राऊत, वनपरिक्षेत्राधिकारी अनंत गावंडे, वनपाल विनोद कोहळे, वन्यजीवप्रेमी यादव तरटे, माजी सरपंच सुभाष राठोड, पोलीस पाटील पवार आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)