शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
3
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
4
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
5
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
6
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
7
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
8
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
9
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
10
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
11
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
12
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
13
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
14
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
15
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
16
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
17
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
18
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
19
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात

आयुक्तांच्या ‘सोशल पोलिसिंग’ला तडा

By admin | Updated: November 29, 2015 00:59 IST

शहर पोलीस दलातील महत्त्वाचा घटक असणाऱ्या गुन्हे शाखेत माजलेल्या अंतर्गत बेदिलीवर लवकरच ‘रामबाण’ उपाय शोधण्याचे संकेत पोलीस आयुक्तांनी दिले आहेत.

गुन्हे शाखेत फेरबदलाचे संकेत : ‘गोपाल’काल्याला ब्रेक मिळणारअमरावती : शहर पोलीस दलातील महत्त्वाचा घटक असणाऱ्या गुन्हे शाखेत माजलेल्या अंतर्गत बेदिलीवर लवकरच ‘रामबाण’ उपाय शोधण्याचे संकेत पोलीस आयुक्तांनी दिले आहेत. बंडफितुरीमुळे गुन्हे शाखेतील काहींनी ‘टीप’ प्रकरणाचा ‘गोपाल’काला केल्याचा आरोप होत असताना आयुक्तांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. या प्रकरणाचा तपास स्वत:कडे घेत संभाव्य दगा फटक्याला त्यांनी दूर सारल्याचे पोलीस वर्तुळात बोलले जाते. ट्रकसंदर्भातील टीप प्रकरण आणि त्यापाठोपाठ देशी कट्टा प्रकरणात गुन्हे शाखा आणि पोलीस ठाणे प्रमुखांमधील परस्पर असमन्वय चव्हाट्यावर आल्याने आयुक्त गंभीर बनले आहेत. त्यातल्या त्यात ‘टीप’ प्रकरणामध्ये प्राथमिक चौकशीदरम्यान अधिकारी दर्जाच्या व्यक्तींविरोधात ‘आरोप’ झाल्याने ठोस कारवाईनंतर पुढे ‘मॅट’मध्ये त्याला कसे सामोरे जायचे, याबाबतही आयुक्त विचारपूर्वक पाऊल टाकत असल्याची चर्चा आहे. ‘जे काही होईल ते ठोस होईल’ या आयुक्तांच्या वक्तव्याला त्यामुळेच विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. लागोपाठ घडलेल्या या प्रकरणाने आयुक्तांच्या सोशल पोलिसिंगला तडा गेला आहे. रियाजोद्दीन देशमुख यांची आयुक्तालयातून बदली झाल्यानंतर हे महत्वाचे पद प्रमेश आत्राम यांच्याकडे सोपविण्यात आले. त्यापूर्वीसुद्धा आत्रामांनी गुन्हे शाखा अनुभवली होती. उपनिरीक्षक ते गुन्हे शाखेचे निरीक्षक असा लांब पल्ला त्यांनी आयुक्तालयातच गाठला. असा अनुभवी अधिकारी असताना गुन्हे शाखेत माजलेली अंतर्गत बेदिली 'अर्थ'पूर्ण संशयाला वाव देणारी ठरते. गुन्हे शाखेतील 'क्रिम पोस्टिंग' मिळविण्यासाठी मोठी लॉबिंग केली जाते, हे सर्वश्रूत आहे. ‘पीआर’ चांगला असणाऱ्या कर्मचारी-अधिकाऱ्यांची गुन्हे शाखेत वर्णी लागते. तथापि गेल्या काही महिन्यांपासून गुन्हे शाखेत असलेल्या कर्मचाऱ्यांचा ‘पीआर’ आणि अनुभव फिल्डमध्ये दिसेनासा झाला आहे. पोलीस मित्र, वाहन चालकांना समुपदेशन, महिलांसाठी आवश्यक असलेली फलक अशी सोशल पोलिसिंग होत असताना गुन्हे शाखेतील दोन प्रकारांनी पोलिसांची प्रतिमा काहीअंशी डागाळली आहे. गुन्हेगाराला पाठीशी न घालता त्याचेवर थेट कारवाई करण्याचा दंडक आयुक्तांनी घातला आहे. त्याच पार्श्वभूमिवर आयुक्त गुन्हे शाखेमध्ये कुठला व्यापक फेरबदल करतात, कारवाईची कुऱ्हाड कुणावर कोसळते? याकडे पोलिसांसह अमरावतीकरांचे लक्ष लागले आहे. टीप प्रकरणात ठोस कारवाई करून ‘गोपाल’काल्याला ब्रेक बसू शकेल, अशी अपेक्षा पोलीस विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.(प्रतिनिधी) गुन्हे शाखेत श्रेयाची लढाईवेगवेगळी पथके असल्याने गुन्हे शाखेतच स्पर्धा वाढली आहे. मात्र ती डिटेक्शनपुरती मर्यादित न राहता ती स्पर्धा अंतर्गत हेवेदावे आणि पोलीस खात्याची प्रतिमा बदनाम करणारी ठरू लागली आहे.प्रशासनाचा दांडगा अनुभव असणाऱ्या आयुक्तांच्या नजरेतून गुन्हे शाखेतील ही बेदिली सुटू शकली नाही. त्यामुळेच त्यांनी टिप प्रकरणामध्ये ‘वेळ’ घेतला असला तरी होणारी कारवाई ही मोठीच असेल, असे स्पष्ट संकेत दिले आहेत.