शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

अचलपूर मतदारसंघातील ६०० किलोमीटर पांदण रस्त्याच्या कामाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:13 IST

चांदूर बाजार : ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे. त्यासाठी ग्रामीण भागातील पांदण रस्त्यांना अनन्य साधारण महत्त्व आहे. ...

चांदूर बाजार : ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे. त्यासाठी ग्रामीण भागातील पांदण रस्त्यांना अनन्य साधारण महत्त्व आहे. ही बाब लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी ग्रामीण भागातील पांदण रस्ते विकासाला प्राधान्य दिले आहे. शेत शिवारातील पांदण रस्त्यांच्या पूर्णत्वाने ग्रामीण भागाच्या अर्थकारणाला बळकटी मिळणार आहे. त्या अनुषंगाने अचलपूर मतदारसंघात ६०० किलोमीटर पांदण रस्ते तयार करण्यास सुरुवात झाली आहे.

तीन किलोमीटर रस्ता तयार होणार आहे. याचा संपूर्ण कृती आराखडा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी राज्य सरकारला सादर केला आहे. त्यानुसार नवीन कमी खर्चाच्या कृती आराखड्यानुसार सर्वप्रथम अचलपूर मतदारसंघात ६०० किलोमीटरचे पांदण रस्ते तयार करण्यात येत आहे. या पांदण रस्त्यांसाठी राज्य शासनातर्फे निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. अचलपूर मतदारसंघात हा उपक्रम यशस्वी झाल्यानंतर संपूर्ण राज्यभर पांदण रस्त्यांचे कामाचे नियोजन राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या कृती आराखड्यानुसार होणार आहे.

अचलपूर मतदारसंघातील ६०० किलोमीटर नव्याने होणाऱ्या पांदण रस्त्यांमध्ये चांदूरबाजार तालुक्यातील २४३ किलोमीटर व अचलपूर तालुक्यातील २३७ किलोमीटर रस्ते पूर्ण करण्यात येणार आहे. यामध्ये चांदूरबाजार तालुक्यातील २८६ व अचलपूर तालुक्यातील २७३ पांदण रस्त्यांचा समावेश आहे. तसेच मागील वर्षी अपूर्ण राहिलेली पांदण रस्त्यांची कामे यावर्षी प्राधान्यक्रमाने पूर्ण करण्यात येणार आहे. या पांदण रस्त्यांमुळे शेतालाच नव्हे, तर प्रत्येक गावाला जाणारे अंतर्गत रस्ते तयार होणार आहेत. शिरजगाव बंड येथून सुरुवात करण्यात आली आहे.