शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

जिल्हाधिकाऱ्यांची जलयुक्त शिवारच्या कामावर स्पॉट व्हिजिट

By जितेंद्र दखने | Updated: May 22, 2024 21:04 IST

अचलपूर तालुक्यातील निजामपूर गावात कामांची पाहणी

अमरावती : जिल्हा परिषद जलसंधारण विभागामार्फत ग्रामीण भागात जलयुक्त शिवाय योजनेंतर्गत विविध प्रकारची कामे सुरू आहेत. या कामांची मंगळवारी जिल्हाधिकारी सौरभ कटियार, सीईओ संतोष जोशी यांनी अचलपूर तालुक्यात काही गावांना ऑन दी स्पॉट व्हिजिट देऊन कामांची प्रत्यक्ष पाहणी केली.

जलयुक्त शिवार अभियान २.० हे राज्य शासनाचे महत्त्वाकांक्षी अभियान आहे. या अभियानांतर्गत कामे वेगाने पूर्ण करण्यासाठी हा कालावधी अनुकूल आहे. या अभियानातील कामांना गती वाढविण्यावर प्रशासनाचा भर आहे. जलयुक्त शिवार अभियानाच्या पहिल्या टप्प्यातील यश लक्षात घेता, राज्य शासनाने ‘ जलयुक्त शिवार अभियान २.०’ चा दुसरा टप्पा सुरू केला आहे. ज्यामध्ये पाणलोट विकास उपक्रमांच्या विविध कामांचा समावेश आहे. यामुळे पावसावर आधारित शेतीच्या समस्या कमी होण्यास मदत होऊन शाश्वत विकासाचे ध्येय साध्य करण्यास मदत होणार आहे. जलयुक्त शिवार योजनेंतर्गत जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागामार्फत ग्रामीण भागात सध्या विविध प्रकारची कामे केली जात आहेत. दरम्यान, मंगळवार, २१ मे रोजी जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी अचलपूर तालुक्यातील निजामपूर येथे सुरू असलेल्या जलयुक्त शिवारच्या कामांची ऑन दी स्पॉट पाहणी केली. यावेळी झेडपीचे सीईओ संतोष जोशी, जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील जाधव, उपअभियंता विजय राठोड, अचलपूर एसडीओ बळवंत अरखराव, तहसीलदार डॉ.संजय गरकल आदींची उपस्थिती होती. 

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी पावसाळ्याचे दिवस जवळ आले असल्यामुळे जलयुक्त शिवारची कामे येत्या ३१ मेपर्यंत शंभर टक्के पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित सर्व यंत्रणांना दिले आहेत. जलयुक्त शिवारची कामे मुदतीत केल्यास पावसाळ्यात जलसंधारणाच्या कामांमुळे पाणी साठ्यात वाढ होऊन याचा फायदा शेतकऱ्यांना होऊ शकतो. त्यामुळे जलयुक्त शिवारच्या कामांची गती वाढण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

टॅग्स :Amravatiअमरावती