शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

ओला-सुका कचऱ्याची विल्हेवाट एकत्रच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 22:58 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : ओला व सुका कचरा वेगवेगळा ठेवा, अशी ध्वनिक्षेपकाद्वारे जनजागृती करणाऱ्या महापालिकेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला ...

ठळक मुद्देमहापालिकेचा भोंगळ कारभार : नागरिक सुधारले, प्रशासन झोपेतच

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ओला व सुका कचरा वेगवेगळा ठेवा, अशी ध्वनिक्षेपकाद्वारे जनजागृती करणाऱ्या महापालिकेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. ‘लोका सांगे ब्रम्हज्ञान...’ असा महापालिकेचा कारभार सद्यस्थितीत शहरात सुरू आहे. नागरिक ओला व सुका कचरा वेगवेगळा टाकतात. मात्र, महापालिकेची वाहने पुन्हा दोन्ही कचरा एकत्रित घेऊन जात असल्याचा धक्कादायक प्रकार सुरू आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान सुरू केले. स्वच्छतेवर विशेष भर देण्यासाठी देशभरात जनजागृती केली जात आहे. इंटरनेवर अ‍ॅप तयार करून अस्वच्छतेच्या तक्रारीची सोय केली. स्वच्छतेविषयी शासन गांभीर्याने विचार करीत असतानाही ही महापालिका मात्र दुर्लक्ष करीत आहे. शहरात रोगराईचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. शहरात डेंग्यूने उच्छाद याशिवाय डासांच्या प्रकोपाने अमरावतीकरांची झोप उडाली आहे. जिकडे-तिकडे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. इतके मोठे संकट अमरावतीकरांसमोर असताना महापालिका प्रशासन झोपेचे सोंग घेत आहे. शहराच्या स्वच्छतेचे कामकाज पाहणाºया महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून प्रत्येक प्रभाग व वॉर्डात स्वच्छता कर्मचारी कार्यरत आहेत. कचरा गोळा करण्यासाठी घंटीकटला भिरभिरत आहेत. ध्वनिक्षेपकाद्वारे सुका व ओला कचरा वेगवेगळा गोळा करण्याचे नागरिकांना सांगण्यात येते. त्या अनुषंगाने नागरिक वेगळेवेगळ्या खोक्यात कचरा टाकतात. मात्र, महापालिकेच्या घंटीकटल्यात सुका व ओला कचरा वेगळे ठेवण्याची सोयच नसल्याने तो एकत्रच वाहून नेला जातो. परिणामी नागरिकांचे परिश्रम व शासनाची जनजागृती व्यर्थ ठरत संताप शहरात उफाळून आला आहे.सातुर्णा, नवाथेनगरात हाच प्रकारसातुर्णा स्थित प्रसादनगर, मेहेरबाबा कॉलनी, सिद्धिविनायक कॉलनीत घंटीकटल्याद्वारे कचरा गोळा केला जातो. मात्र, ओला व सुका कचरा एकत्रित घंटीकटल्यात टाकला जात आहे. याशिवाय नवाथेनगरात घंटीकटला नियमित येतच नाही. येथेसुद्धा घंटीकटल्यात ओला व सुका कचरा एकत्रितच टाकला जात आहे. कित्येक दिवसांपासून हा प्रकार सुरू आहे.ओला व सुका कचरा वेगवेगळा ठेवण्यासंबंधी महापालिका घंटीकटल्यातील ध्वनिक्षेपकाद्वारे सांगितले जाते. मात्र, दोन्ही कचरा घंटीकटल्यात एकत्र नेला जातो. महापालिकेने हा काय प्रकार चालविला आहे?पी.आर.पाटील, नागरिक.स्वच्छ भारत अभियान राबविणारी महापालिकेचेच स्वच्छतेकडे दुर्लक्ष आहे. नाल्या तुंबल्या आहेत. खुल्या प्लॉटमध्ये झाडे वाढली आहेत. कचरा उचलताना योग्य पद्धत नाही.- राजेश जगताप, नागरिक.