शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट: श्रेयस अय्यर ड्रेसिंग रुममध्येच बेशुद्ध पडलेला; वैद्यकीय पथकाने लागलीच धोका ओळखला, नाहीतर...
2
"तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं
3
पेटीएम, जीपे, फोनपेवरील ऑटो पे कसे बंद कराल? आपोआप जातायत सबस्क्रीप्शन, पेमेंटचे पैसे... 
4
Aadhaar Card New Rules 1st Nov: महत्त्वाची बातमी! १ नोव्हेंबरपासून बदलणार आधार कार्डाशी निगडीत ३ मोठे नियम, जाणून घ्या
5
वनप्लस १५ येतोय...! पण १४ क्रमांक का वगळला? चिनी संस्कृतीत असे काय आहे...
6
Bank Holidays November 2025: नोव्हेंबरमध्ये किती दिवस बँका राहणार बंद? पाहा RBI ची हॉलिडे लिस्ट, पटापट आटपा काम
7
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
8
शंकर महाराज प्रकट दिन: म्हणा अकरा कवनांचे स्तोत्र, विजयी होईल सर्वत्र; कामना होतील पूर्ण
9
Tulasi Vivah 2025: विष्णू हे लक्ष्मीपती असूनही दरवर्षी तुळशीशी का लावला जातो विवाह?
10
LIC ची ‘ही’ स्कीम गुंतवणूकदारांना बनवेल कोट्यधीश!; ४ वर्षापर्यंत भरा प्रीमिअम, मिळतील १ कोटी
11
१०० वर्षांनी महालक्ष्मीसह ४ राजयोग: ७ राशींना सुबत्ता, कल्याण; बक्कळ लाभ, यशाचा मंगलमय काळ!
12
"मी तुला कच्च खाऊन टाकेन"; बायकोने नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडलं, चपलेने धू-धू धुतलं
13
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२५: ‘मौनं सर्वार्थ साधनम्’, येणी वसूल होतील; सरकारी लाभ
14
तेव्हा गरजेपेक्षा जास्त कर्मचारी भरले, आता त्यांना बेरोजगार करणार; ॲमेझॉनमध्ये ३०,००० नोकऱ्या धोक्यात
15
चिनी हँडलर, टेलिग्राम ट्रॅप, लाखोंची लूट... ४७ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, तिघांना अटक
16
तुमचे अधिकारी वृत्तपत्र वाचत नाहीत का? देशाची प्रतिमा मलिन होतेय; भटक्या कुत्र्यांवरून भडकले कोर्ट
17
Shani Gochar 2025: शनिचा फेरा आपल्या राशीसाठी नेहमीच तापदायक ठरतो का? पाहूया भावानुसार फळ
18
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
19
मतदाराचे आणि त्याच्या वडिलाचे आडनाव वेगवेगळे, २० हजार मतदारांची नावे संशयास्पद: आदित्य ठाकरे
20
शाळेची नव्हे, धोक्याची घंटा! सरकारी अनास्था आणि 'विनाअनुदानित' इंग्रजी शाळांचा वाढता बाजार

ओला-सुका कचऱ्याची विल्हेवाट एकत्रच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 22:58 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : ओला व सुका कचरा वेगवेगळा ठेवा, अशी ध्वनिक्षेपकाद्वारे जनजागृती करणाऱ्या महापालिकेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला ...

ठळक मुद्देमहापालिकेचा भोंगळ कारभार : नागरिक सुधारले, प्रशासन झोपेतच

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ओला व सुका कचरा वेगवेगळा ठेवा, अशी ध्वनिक्षेपकाद्वारे जनजागृती करणाऱ्या महापालिकेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. ‘लोका सांगे ब्रम्हज्ञान...’ असा महापालिकेचा कारभार सद्यस्थितीत शहरात सुरू आहे. नागरिक ओला व सुका कचरा वेगवेगळा टाकतात. मात्र, महापालिकेची वाहने पुन्हा दोन्ही कचरा एकत्रित घेऊन जात असल्याचा धक्कादायक प्रकार सुरू आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान सुरू केले. स्वच्छतेवर विशेष भर देण्यासाठी देशभरात जनजागृती केली जात आहे. इंटरनेवर अ‍ॅप तयार करून अस्वच्छतेच्या तक्रारीची सोय केली. स्वच्छतेविषयी शासन गांभीर्याने विचार करीत असतानाही ही महापालिका मात्र दुर्लक्ष करीत आहे. शहरात रोगराईचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. शहरात डेंग्यूने उच्छाद याशिवाय डासांच्या प्रकोपाने अमरावतीकरांची झोप उडाली आहे. जिकडे-तिकडे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. इतके मोठे संकट अमरावतीकरांसमोर असताना महापालिका प्रशासन झोपेचे सोंग घेत आहे. शहराच्या स्वच्छतेचे कामकाज पाहणाºया महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून प्रत्येक प्रभाग व वॉर्डात स्वच्छता कर्मचारी कार्यरत आहेत. कचरा गोळा करण्यासाठी घंटीकटला भिरभिरत आहेत. ध्वनिक्षेपकाद्वारे सुका व ओला कचरा वेगवेगळा गोळा करण्याचे नागरिकांना सांगण्यात येते. त्या अनुषंगाने नागरिक वेगळेवेगळ्या खोक्यात कचरा टाकतात. मात्र, महापालिकेच्या घंटीकटल्यात सुका व ओला कचरा वेगळे ठेवण्याची सोयच नसल्याने तो एकत्रच वाहून नेला जातो. परिणामी नागरिकांचे परिश्रम व शासनाची जनजागृती व्यर्थ ठरत संताप शहरात उफाळून आला आहे.सातुर्णा, नवाथेनगरात हाच प्रकारसातुर्णा स्थित प्रसादनगर, मेहेरबाबा कॉलनी, सिद्धिविनायक कॉलनीत घंटीकटल्याद्वारे कचरा गोळा केला जातो. मात्र, ओला व सुका कचरा एकत्रित घंटीकटल्यात टाकला जात आहे. याशिवाय नवाथेनगरात घंटीकटला नियमित येतच नाही. येथेसुद्धा घंटीकटल्यात ओला व सुका कचरा एकत्रितच टाकला जात आहे. कित्येक दिवसांपासून हा प्रकार सुरू आहे.ओला व सुका कचरा वेगवेगळा ठेवण्यासंबंधी महापालिका घंटीकटल्यातील ध्वनिक्षेपकाद्वारे सांगितले जाते. मात्र, दोन्ही कचरा घंटीकटल्यात एकत्र नेला जातो. महापालिकेने हा काय प्रकार चालविला आहे?पी.आर.पाटील, नागरिक.स्वच्छ भारत अभियान राबविणारी महापालिकेचेच स्वच्छतेकडे दुर्लक्ष आहे. नाल्या तुंबल्या आहेत. खुल्या प्लॉटमध्ये झाडे वाढली आहेत. कचरा उचलताना योग्य पद्धत नाही.- राजेश जगताप, नागरिक.