शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
2
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
3
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
4
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
5
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
6
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
7
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
8
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
9
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
10
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
11
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
12
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
13
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
14
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
15
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
16
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
17
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
18
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
19
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
20
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?

थंडीची लाट; शाळेच्या वेळा बदलल्या

By admin | Updated: January 14, 2017 00:08 IST

सध्या हिमालयात बर्फवृष्टी तसेच मध्यप्रदेशात थंडीची लाट आहे. त्यामुळे तेथील थंड वारे विदर्भासह राज्यभरात वाहत आहेत.

निर्णय : प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांचे आदेशअमरावती : सध्या हिमालयात बर्फवृष्टी तसेच मध्यप्रदेशात थंडीची लाट आहे. त्यामुळे तेथील थंड वारे विदर्भासह राज्यभरात वाहत आहेत. परिणामी शहरासह जिल्ह्यात कडाक्याची थंडीची लाट पसरली असल्याने जिल्हा परिषदेच्या सकाळच्या सत्रात भरणाऱ्या सर्व शाळांच्या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय प्राथमिक शिक्षणाधिकारी एस.एम.पानझाडे यांनी शुक्रवारी घेतला आहे. दोन दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात थंडीचा जोर वाढला आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य जपण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेतल्याचे आदेशात म्हटले आहे. त्यामुळे एरवी सकाळी ६.४५ वाजता भरणाऱ्या शाळा आता सकाळी ८.३० वाजता भरणार आहेत. वाताचा, दम्याचा त्रास वाढला! अमरावती : आरटीई कायद्यानुसार अभ्यास तासिकेचा वेळ पूर्ण होईपर्यंत शालेय कामकाज करावे, असे निर्देश सुद्धा सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे. शिक्षण विभागाच्या यानिर्णयामुळे कडाक्याच्या थंडीतही शाळेत जाणाऱ्या लहान मुलांना मोठा दिलासा मिळणार आहे.जिल्हा गारठल्याने वृद्धांना संधीवाताचा त्रास वाढतो. दम्याने बाधित रूग्णांचा दमाही यादिवसांत उफाळून येतो. अर्धांगवायूचा धोकाही या दिवसांत काळजी घेणे गरजेचे आहे.दोन वर्षांत यंदा तापमानाचा निचांकजम्मू-कश्मिरसह हिमालयावर बर्फवृष्टी होत असून तेथील शीतवारे महाराष्ट्राच्या दिशेने येत आहेत. परिणामी या थंड वाऱ्यामुळे विदर्भात थंडीची लाट परसली आहे. मागील दोन वर्षांतील जानेवारी महिन्यातील तापमानाचा आढावा घेतला असता यंदा तापमानाने निचांक गाठला आहे. पुढील दोन ते तीन दिवस ही थंडीची लाट कायम राहण्याचे संकेत हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी दिले आहे. शुक्रवारी श्रीशिवाजी कृषी महाविद्यालातील हवामान विभागाने घेतलेल्या नोंदींमध्ये शहरात किमान २७ तर कमाल ७.५ डिग्री सेल्सीअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. मागील दोन वर्षांत जानेवारी महिन्यातील तापमानाचा अंदाजात यंदाचे तापमानाने निचांक गाठल्याचे निदर्शनास येत आहे. सर्वात कमी तापमानात २९ जानेवारी २०१४ रोजी कमाल तापमान ७.५ असल्याची नोंद झाली होती. त्यानंतर २०१५ मध्ये ९ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून यंदा किमान तापमान ८.५ पर्यत घसरले आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळी होऊ लागले आहे.