शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
3
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
4
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
5
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
6
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
7
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
8
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
9
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
10
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
11
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
12
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
13
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
14
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
15
'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
16
बंदुकीच्या धाकावर अल्पवयीन मुला-मुलीला शारीरिक संबंधास पाडले भाग; MMS बनवून पैसे उकळले
17
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
18
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
19
गुडन्यूज! 'लाफ्टर क्वीन' भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, 'गोला'नंतर आता मुलगा की मुलगी?
20
"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
Daily Top 2Weekly Top 5

थंडीची लाट; शाळेच्या वेळा बदलल्या

By admin | Updated: January 14, 2017 00:08 IST

सध्या हिमालयात बर्फवृष्टी तसेच मध्यप्रदेशात थंडीची लाट आहे. त्यामुळे तेथील थंड वारे विदर्भासह राज्यभरात वाहत आहेत.

निर्णय : प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांचे आदेशअमरावती : सध्या हिमालयात बर्फवृष्टी तसेच मध्यप्रदेशात थंडीची लाट आहे. त्यामुळे तेथील थंड वारे विदर्भासह राज्यभरात वाहत आहेत. परिणामी शहरासह जिल्ह्यात कडाक्याची थंडीची लाट पसरली असल्याने जिल्हा परिषदेच्या सकाळच्या सत्रात भरणाऱ्या सर्व शाळांच्या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय प्राथमिक शिक्षणाधिकारी एस.एम.पानझाडे यांनी शुक्रवारी घेतला आहे. दोन दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात थंडीचा जोर वाढला आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य जपण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेतल्याचे आदेशात म्हटले आहे. त्यामुळे एरवी सकाळी ६.४५ वाजता भरणाऱ्या शाळा आता सकाळी ८.३० वाजता भरणार आहेत. वाताचा, दम्याचा त्रास वाढला! अमरावती : आरटीई कायद्यानुसार अभ्यास तासिकेचा वेळ पूर्ण होईपर्यंत शालेय कामकाज करावे, असे निर्देश सुद्धा सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे. शिक्षण विभागाच्या यानिर्णयामुळे कडाक्याच्या थंडीतही शाळेत जाणाऱ्या लहान मुलांना मोठा दिलासा मिळणार आहे.जिल्हा गारठल्याने वृद्धांना संधीवाताचा त्रास वाढतो. दम्याने बाधित रूग्णांचा दमाही यादिवसांत उफाळून येतो. अर्धांगवायूचा धोकाही या दिवसांत काळजी घेणे गरजेचे आहे.दोन वर्षांत यंदा तापमानाचा निचांकजम्मू-कश्मिरसह हिमालयावर बर्फवृष्टी होत असून तेथील शीतवारे महाराष्ट्राच्या दिशेने येत आहेत. परिणामी या थंड वाऱ्यामुळे विदर्भात थंडीची लाट परसली आहे. मागील दोन वर्षांतील जानेवारी महिन्यातील तापमानाचा आढावा घेतला असता यंदा तापमानाने निचांक गाठला आहे. पुढील दोन ते तीन दिवस ही थंडीची लाट कायम राहण्याचे संकेत हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी दिले आहे. शुक्रवारी श्रीशिवाजी कृषी महाविद्यालातील हवामान विभागाने घेतलेल्या नोंदींमध्ये शहरात किमान २७ तर कमाल ७.५ डिग्री सेल्सीअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. मागील दोन वर्षांत जानेवारी महिन्यातील तापमानाचा अंदाजात यंदाचे तापमानाने निचांक गाठल्याचे निदर्शनास येत आहे. सर्वात कमी तापमानात २९ जानेवारी २०१४ रोजी कमाल तापमान ७.५ असल्याची नोंद झाली होती. त्यानंतर २०१५ मध्ये ९ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून यंदा किमान तापमान ८.५ पर्यत घसरले आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळी होऊ लागले आहे.