शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

झेडपी, महापालिकेत आचारसंहिता

By admin | Updated: October 19, 2016 00:10 IST

जिल्ह्यात नऊ नगरपरिषदांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. यानगरपरिषदांच्या कार्यक्षेत्रासह संपूर्ण जिल्ह्यात ...

निवडणुका नगरपरिषदेच्या कामांना ब्रेक : पदाधिकाऱ्यांची राजकीय अडचणअमरावती : जिल्ह्यात नऊ नगरपरिषदांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. यानगरपरिषदांच्या कार्यक्षेत्रासह संपूर्ण जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. मात्र, ही आचारसंहिता जिल्हा परिषद आणि महापालिका क्षेत्रात लागू झाल्याने निवडणूक नगरपरिषदेची आणि ब्रेक मात्र जिल्हा परिषद, महापालिकेतील कामांना, अशी स्थिती निर्माण झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाने २७ आॅक्टोबरला नगरपरिषद, नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक आणि नगराध्यक्षाच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला. तत्क्षणी आचारसंहिता लागू झाली. ज्या जिल्ह्यामध्ये चारपेक्षा जास्त नगरपरिषदा, नगरपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक आहे, त्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये आचारसंहिता लागू असेल. ज्या जिल्ह्यात चारपेक्षा कमी नगरपरिषदा, नगरपंचायती असतील तेथे संबंधित क्षेत्रापुरतीच आचारसंहिता लागू राहिल, असे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. राजकीय पदाधिकाऱ्यांची कोंडीअमरावती : त्या पार्श्वभूमिवर जिल्ह्यातील अमरावती महापालिका अणि जिल्हा परिषदेला सुध्दा आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करणे अनिवार्य झाले आहे. दरम्यान जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने गण-गट आणि प्रभागाच्या आरक्षण सोडती काढण्यात आल्या आहेत. त्यामुळे आॅक्टोबरच्या शेवटच्या आठवडयात या दोन्ही तारखा घोषित होण्याची शक्यता आहे. मात्र, तत्पूर्वीच नगरपरिषदेच्या निवडणुकीची घोषणा झाल्याने जिल्हा परिषद आणि महापालिकेवर आचारसंहितेचा प्रभाव राहणार आहे.कामांना लागणार ब्रेक पुढे जिल्हा परिषद, महापालिकेच्या निवडणुका आहेत. त्यामुळे रखडलेली कामे होणे आवश्यक आहे. नोव्हेंबरपर्यंत ही आचारसंहिता व त्यानंतर पुन्हा जानेवारी महिन्यात आचारसंहिता लागू होईल. त्यामुळे डिसेंबर या एकाच महिन्यात कामे कशी होतील, हा प्रश्न असून आचारसंहितेचा विकासकामांवर परिणाम होईल, असे मत जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश उईके, उपाध्यक्ष सतीश हाडोळे, सदस्य मोहन सिंघवी आदींनी व्यक्त केले.पदाधिकाऱ्यांची वाहनेही होणार जमा नगपरिषद निवडणूकीसाठी ज्या जिल्ह्यात चारपेक्षा अधिक नगपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. अशा ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्यामुळे विविध स्थानिक स्वराज्य संस्थांवर पदाधिकारी असलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांची शासकीय वाहने जमा केली जाणार आहेत.राजकीय पदाधिकाऱ्यांची धावपळ सार्वत्रिक निवडणूकीला सामोरे जात असतांना आचारसंहितेपूर्वी विकास कामे करण्याची धावपळ राजकीय पदाधिकाऱ्यांनी चालविली होती. मतदारांना सामोरे जातांना ठोस असे काम दाखविण्याची फाईलचा प्रवास सुरू होता. मात्र या धडपडीला आदर्श आचार संहितेने ब्रेक लागला आहे.