शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

झेडपी, महापालिकेत आचारसंहिता

By admin | Updated: October 19, 2016 00:10 IST

जिल्ह्यात नऊ नगरपरिषदांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. यानगरपरिषदांच्या कार्यक्षेत्रासह संपूर्ण जिल्ह्यात ...

निवडणुका नगरपरिषदेच्या कामांना ब्रेक : पदाधिकाऱ्यांची राजकीय अडचणअमरावती : जिल्ह्यात नऊ नगरपरिषदांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. यानगरपरिषदांच्या कार्यक्षेत्रासह संपूर्ण जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. मात्र, ही आचारसंहिता जिल्हा परिषद आणि महापालिका क्षेत्रात लागू झाल्याने निवडणूक नगरपरिषदेची आणि ब्रेक मात्र जिल्हा परिषद, महापालिकेतील कामांना, अशी स्थिती निर्माण झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाने २७ आॅक्टोबरला नगरपरिषद, नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक आणि नगराध्यक्षाच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला. तत्क्षणी आचारसंहिता लागू झाली. ज्या जिल्ह्यामध्ये चारपेक्षा जास्त नगरपरिषदा, नगरपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक आहे, त्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये आचारसंहिता लागू असेल. ज्या जिल्ह्यात चारपेक्षा कमी नगरपरिषदा, नगरपंचायती असतील तेथे संबंधित क्षेत्रापुरतीच आचारसंहिता लागू राहिल, असे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. राजकीय पदाधिकाऱ्यांची कोंडीअमरावती : त्या पार्श्वभूमिवर जिल्ह्यातील अमरावती महापालिका अणि जिल्हा परिषदेला सुध्दा आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करणे अनिवार्य झाले आहे. दरम्यान जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने गण-गट आणि प्रभागाच्या आरक्षण सोडती काढण्यात आल्या आहेत. त्यामुळे आॅक्टोबरच्या शेवटच्या आठवडयात या दोन्ही तारखा घोषित होण्याची शक्यता आहे. मात्र, तत्पूर्वीच नगरपरिषदेच्या निवडणुकीची घोषणा झाल्याने जिल्हा परिषद आणि महापालिकेवर आचारसंहितेचा प्रभाव राहणार आहे.कामांना लागणार ब्रेक पुढे जिल्हा परिषद, महापालिकेच्या निवडणुका आहेत. त्यामुळे रखडलेली कामे होणे आवश्यक आहे. नोव्हेंबरपर्यंत ही आचारसंहिता व त्यानंतर पुन्हा जानेवारी महिन्यात आचारसंहिता लागू होईल. त्यामुळे डिसेंबर या एकाच महिन्यात कामे कशी होतील, हा प्रश्न असून आचारसंहितेचा विकासकामांवर परिणाम होईल, असे मत जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश उईके, उपाध्यक्ष सतीश हाडोळे, सदस्य मोहन सिंघवी आदींनी व्यक्त केले.पदाधिकाऱ्यांची वाहनेही होणार जमा नगपरिषद निवडणूकीसाठी ज्या जिल्ह्यात चारपेक्षा अधिक नगपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. अशा ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्यामुळे विविध स्थानिक स्वराज्य संस्थांवर पदाधिकारी असलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांची शासकीय वाहने जमा केली जाणार आहेत.राजकीय पदाधिकाऱ्यांची धावपळ सार्वत्रिक निवडणूकीला सामोरे जात असतांना आचारसंहितेपूर्वी विकास कामे करण्याची धावपळ राजकीय पदाधिकाऱ्यांनी चालविली होती. मतदारांना सामोरे जातांना ठोस असे काम दाखविण्याची फाईलचा प्रवास सुरू होता. मात्र या धडपडीला आदर्श आचार संहितेने ब्रेक लागला आहे.