शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

सीएमच्या आगमनाने अवघ्या अंबापुरीचे उजळावे भाग्य!

By admin | Updated: November 27, 2014 23:25 IST

अमरावतीचे 'भाचे' असलेले देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झालेत. अवघी इंद्रपुरी हर्षोल्हासात न्हाली. मुख्यमंत्र्यांच्या आगमनाने बालाजी प्लॉट परिसराचे भाग्य उजळले आहे.

गणेश देशमुख - अमरावतीअमरावती : अमरावतीचे 'भाचे' असलेले देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झालेत. अवघी इंद्रपुरी हर्षोल्हासात न्हाली. मुख्यमंत्र्यांच्या आगमनाने बालाजी प्लॉट परिसराचे भाग्य उजळले आहे. आवश्यक सोईसुविधांसाठी आसुसलेल्या उर्वरित अंबानगरीचेही दिवस 'सीएम'च्या येण्याने नाही काय पालटू शकणार?बालाजी प्लॉट परिसरात कलोती यांच्याकडे मुख्यमंत्री येणार असल्यामुळे अत्यंत तातडीने सिमेंट काँक्रीटचे रस्ते निर्माण करण्यात आलेत. आकर्षक फुटपाथ रातोरात तयार झालेत. कलोती यांच्या घराजवळ असलेले कायम तुंबलेले कचऱ्याचे कंटेनर अचानक नाहीसे झाले. माणसांनी रमावे असा तो परिसर आता झाला आहे. आमच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी या पायघड्या अंथरल्याचा अमरावतीकरांना मनापासून आनंद आहे. 'विदर्भाची सांस्कृतिक राजधानी' असा भूषणावह दर्जा लाभलेल्या अमरावतीत 'आपल्यां'चे स्वागत याच रितीने व्हायला हवे. या मातीचा तो गुणधर्मच! मुख्यमंत्री राज्याच्या मंत्रिमंडळाचे प्रमुख आहेत. अवघे राज्य हे त्यांचे कुटंब. राज्यभरातील नागरिकांचे पालकत्त्व मुख्यमंत्र्यांच्या शिरावर आहे. तसे बालाजी प्लॉट परिसरात ते नात्याने मामा असलेल्या कलोती यांच्या घरी येत असलेत तरी आगळ्या अर्थाने या अंबापुरीतील प्रत्येक नागरिक त्यांच्या कुटुंबाचाच सदस्य होय. मग पालक येत असतील तर सत्यता त्यांच्यापासून लपविण्याचे कारण काय? उलटपक्षी जे जसे आहे ते वास्तव त्यांच्यासमोर तसेच सादर व्हायला नको काय? मुख्यमंत्री जाताहेत त्या बालाजी प्लॉट परिसरात कालपर्यंत खड्यांमध्ये रस्ते शोधावे लागायचे. साफसफाई होणार म्हणजे जणू दिवळसण, अशी स्थिती. त्या भागातील शेकडो लोक आजतागायत ज्या व्यवस्थेत वास्तव्य करीत आले आहेत त्याच व्यवस्थेत राज्याचे मुख्यमंत्रीही दाखल शकले असते ना!