शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा ढगाळ : शेतकऱ्यांची धाकधूक वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 05:00 IST

जिल्ह्यात गुरुवारी सर्वाधिक पाऊस वरूड तालुक्यात ४४.६ मिमी, चांदूर बाजार ३०.९ मिमी, मोर्शी २४.४ मिमी, अमरावती १९ मिमी, अचलपूर १७.६ मिमी, भातकुली १२ मिमी, चिखलदरा १०.६ मिमी असा दुहेरी आकड्यात कोसळला. इतर ठिकाणी कमी पाऊस झाला. मात्र, ढगाळ वातावरणाने शुक्रवारीदेखील पिच्छा सोडलेला नाही. सकाळपासून ढगांचे आच्छादन होतेच. दुपारनंतर जोरदार मेघगर्जनेसह काही ठिकाणी पाऊस कोसळला.

ठळक मुद्देपावसामुळे झाकल्या सोयाबीनच्या गंज्या : मळणी लांबली, पीक हातचे जाण्याची भीती

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदा जूनपासून लागून राहिलेल्या पावसाने शेतकऱ्यांना उसंत दिली. मात्र, पीक काही घरी येऊ दिलेले नाही. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांध्ये पाऊस १०० टक्क्क््यांहून अधिक कोसळला. आता सोयाबीनची सवंगणी करून मळणीची लगबग सुरू असताना आकाशात ढगांची रुंजी सुरू आहे. काही तालुक्यांमध्ये बुधवारी रात्री ते गुरुवारी सकाळपर्यंत जोरदार पाऊस झाला. शुक्रवारीदेखील ढगांचा गडगडाट सुरूच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मळणी तूर्तास लांबणीवर टाकल्याचे चित्र आहे.जिल्ह्यात गुरुवारी सर्वाधिक पाऊस वरूड तालुक्यात ४४.६ मिमी, चांदूर बाजार ३०.९ मिमी, मोर्शी २४.४ मिमी, अमरावती १९ मिमी, अचलपूर १७.६ मिमी, भातकुली १२ मिमी, चिखलदरा १०.६ मिमी असा दुहेरी आकड्यात कोसळला. इतर ठिकाणी कमी पाऊस झाला. मात्र, ढगाळ वातावरणाने शुक्रवारीदेखील पिच्छा सोडलेला नाही. सकाळपासून ढगांचे आच्छादन होतेच. दुपारनंतर जोरदार मेघगर्जनेसह काही ठिकाणी पाऊस कोसळला. शुक्रवारी सकाळी १० वाजेपर्यंतच्या पर्जन्यमान अहवालात सर्वाधिक पाऊस चांदूर बाजार तालुक्यात १५.५ मिमी झाल्याची नोंद आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका सोयाबीन पिकाला बसत आहे. काही शेतात सोयाबीन कापून त्याच्या मुठी ठिकठिकाणी टाकलेल्या आहेत. काही शेतांमध्ये ताडपत्री, प्लास्टिक पन्नीने सोयाबीनचे ढीग झाकले आहेत. मात्र, ज्या अल्पभूधारक शेतकºयांकडे ढीग झाकण्यासाठी काहीच सुविधा नाही, ते दैवावर हवाला देऊन चिंताग्रस्त चेहऱ्याने आकाशाकडे पाहत आहेत. याशिवाय अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन काढून घरी आणला असला तरी शेतमालातील ओलावा निघून जावा, यासाठी वाळविण्यासाठी टाकला आहे. सोयाबीन पीक अतिशय संवेदनशील असून, पाण्याचा थेंब लागताच दाणा फुगतो व डागाळतो. त्यामुळे पावसाची चिन्हे पाहून हा पसरविलेला शेतमाल एकत्र करताना संपूर्ण कुटुंबाची तारांबळ होत आहे.चांदूर रेल्वे तालुक्यात सोयाबीन काढण्याची लगबगचांदूर रेल्वे : तालुक्यात सोयाबीन काढणीचा वेग आला आहे. पावसाच्या वातावरणामुळे लवकरात लवकर सोयाबीन काढून घरी यावे, याचे नियोजन शेतकरी करीत आहेत.तीन दिवसांपासून अकाली पावसाची तालुक्यात रिमझिम सुरू केली. सोयाबीन काढणीच्या वेळी पाऊस आल्याने ताडपत्री घेणे व ताडपत्रीने संपूर्ण गंजी झाकून देणे, यामध्ये शेतकरी व मजूर वर्ग गर्क झाला आहे. शेतकऱ्याच्या सोयाबीनला एकरी खर्च ३० हजार रुपये असताना, यावर्षी उत्पादन एकरी दोन क्विंटलच्या आसपास राहिले आहे. यात लागवड ते काढणीचा खर्च निघत नसल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे काही वर्षे दुष्काळाच्या कचाट्यात सापडलेला शेतकरी यंदा कर्जाच्या मगरमिठीत जाणार आहे.

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस