शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा ढगाळ : शेतकऱ्यांची धाकधूक वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 05:00 IST

जिल्ह्यात गुरुवारी सर्वाधिक पाऊस वरूड तालुक्यात ४४.६ मिमी, चांदूर बाजार ३०.९ मिमी, मोर्शी २४.४ मिमी, अमरावती १९ मिमी, अचलपूर १७.६ मिमी, भातकुली १२ मिमी, चिखलदरा १०.६ मिमी असा दुहेरी आकड्यात कोसळला. इतर ठिकाणी कमी पाऊस झाला. मात्र, ढगाळ वातावरणाने शुक्रवारीदेखील पिच्छा सोडलेला नाही. सकाळपासून ढगांचे आच्छादन होतेच. दुपारनंतर जोरदार मेघगर्जनेसह काही ठिकाणी पाऊस कोसळला.

ठळक मुद्देपावसामुळे झाकल्या सोयाबीनच्या गंज्या : मळणी लांबली, पीक हातचे जाण्याची भीती

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदा जूनपासून लागून राहिलेल्या पावसाने शेतकऱ्यांना उसंत दिली. मात्र, पीक काही घरी येऊ दिलेले नाही. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांध्ये पाऊस १०० टक्क्क््यांहून अधिक कोसळला. आता सोयाबीनची सवंगणी करून मळणीची लगबग सुरू असताना आकाशात ढगांची रुंजी सुरू आहे. काही तालुक्यांमध्ये बुधवारी रात्री ते गुरुवारी सकाळपर्यंत जोरदार पाऊस झाला. शुक्रवारीदेखील ढगांचा गडगडाट सुरूच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मळणी तूर्तास लांबणीवर टाकल्याचे चित्र आहे.जिल्ह्यात गुरुवारी सर्वाधिक पाऊस वरूड तालुक्यात ४४.६ मिमी, चांदूर बाजार ३०.९ मिमी, मोर्शी २४.४ मिमी, अमरावती १९ मिमी, अचलपूर १७.६ मिमी, भातकुली १२ मिमी, चिखलदरा १०.६ मिमी असा दुहेरी आकड्यात कोसळला. इतर ठिकाणी कमी पाऊस झाला. मात्र, ढगाळ वातावरणाने शुक्रवारीदेखील पिच्छा सोडलेला नाही. सकाळपासून ढगांचे आच्छादन होतेच. दुपारनंतर जोरदार मेघगर्जनेसह काही ठिकाणी पाऊस कोसळला. शुक्रवारी सकाळी १० वाजेपर्यंतच्या पर्जन्यमान अहवालात सर्वाधिक पाऊस चांदूर बाजार तालुक्यात १५.५ मिमी झाल्याची नोंद आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका सोयाबीन पिकाला बसत आहे. काही शेतात सोयाबीन कापून त्याच्या मुठी ठिकठिकाणी टाकलेल्या आहेत. काही शेतांमध्ये ताडपत्री, प्लास्टिक पन्नीने सोयाबीनचे ढीग झाकले आहेत. मात्र, ज्या अल्पभूधारक शेतकºयांकडे ढीग झाकण्यासाठी काहीच सुविधा नाही, ते दैवावर हवाला देऊन चिंताग्रस्त चेहऱ्याने आकाशाकडे पाहत आहेत. याशिवाय अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन काढून घरी आणला असला तरी शेतमालातील ओलावा निघून जावा, यासाठी वाळविण्यासाठी टाकला आहे. सोयाबीन पीक अतिशय संवेदनशील असून, पाण्याचा थेंब लागताच दाणा फुगतो व डागाळतो. त्यामुळे पावसाची चिन्हे पाहून हा पसरविलेला शेतमाल एकत्र करताना संपूर्ण कुटुंबाची तारांबळ होत आहे.चांदूर रेल्वे तालुक्यात सोयाबीन काढण्याची लगबगचांदूर रेल्वे : तालुक्यात सोयाबीन काढणीचा वेग आला आहे. पावसाच्या वातावरणामुळे लवकरात लवकर सोयाबीन काढून घरी यावे, याचे नियोजन शेतकरी करीत आहेत.तीन दिवसांपासून अकाली पावसाची तालुक्यात रिमझिम सुरू केली. सोयाबीन काढणीच्या वेळी पाऊस आल्याने ताडपत्री घेणे व ताडपत्रीने संपूर्ण गंजी झाकून देणे, यामध्ये शेतकरी व मजूर वर्ग गर्क झाला आहे. शेतकऱ्याच्या सोयाबीनला एकरी खर्च ३० हजार रुपये असताना, यावर्षी उत्पादन एकरी दोन क्विंटलच्या आसपास राहिले आहे. यात लागवड ते काढणीचा खर्च निघत नसल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे काही वर्षे दुष्काळाच्या कचाट्यात सापडलेला शेतकरी यंदा कर्जाच्या मगरमिठीत जाणार आहे.

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस