शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
6
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
7
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
8
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
9
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
10
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
11
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
12
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
13
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
14
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
15
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
16
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
17
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
18
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
19
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
20
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद

आज शहर बंद

By admin | Updated: February 27, 2017 00:05 IST

ईव्हीएम घोळाचा वणवा अमरावतीतही पोहोचला असून फेरमतदानाच्या मागणीसाठी शिवसेनेसह बहुपक्षिय पराभूत उमेदवारांनी सोमवार २७ फेब्रुवारीला ‘अमरावती बंद’ची हाक दिली आहे.

सर्वपक्षीय एकवटले : फेरमतदानाची मागणी बुलंदअमरावती : ईव्हीएम घोळाचा वणवा अमरावतीतही पोहोचला असून फेरमतदानाच्या मागणीसाठी शिवसेनेसह बहुपक्षिय पराभूत उमेदवारांनी सोमवार २७ फेब्रुवारीला ‘अमरावती बंद’ची हाक दिली आहे. सत्ताधिशांकडून घालण्यात आलेला मतदान यंत्रातील घोळ लोकशाहीची हत्या करण्याचा प्रकार असून त्याविरोधात पुकारलेल्या शहर बंदला व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे ,असे आवाहन खा. आनंदराव अडसूळ यांनी केले. रविवारी शिवसेना संपर्क कार्यालयात अडसूळ यांच्या नेतृत्वात सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली. भाजपक्षाने या ईव्हिएम सेट केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. सोमवारी सकाळी ८ ते ११ या कालावधीत शहर बंद केल्यानंतर नेहरु मैदानातून जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढल्या जाईल.या मोर्चात सर्वपक्षीय पराभूत उमेदवारांसह शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, मुस्लिम लिग व अन्य पक्षाचे पदाधिकारी, अपक्ष काळे झेंडे घेऊन सहभागी होतील.बंद आणि मोर्चाच्या माध्यमातून फेरमतदानाची मागणी बुलंद करण्यात येणार आहे.शनिवारी संत गाडगेबाबा समाधीमंदीरात पराभूत उमेदवारांची बैठक झाली.त्यापाठोपाठ रविवारी दुपारी राजकमल चौकस्थित शिवसेनेच्या संपर्क कार्यालयात खा.अडसूळ यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली.२१ फेब्रुवारीला झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान ईव्हिएममध्ये प्रचंड तांत्रिक घोळ घालण्यात आला. घरची हक्काची मते सुध्दा उमेदवारांना पडली नाहीत. विजयाची शाश्वती असताना काही पराभूत झालेत तर घरी बसलेले उमेदवार अनपेक्षितपणे निवडून आल्याची खंत अनेकांनी या बैठकीत व्यक्त केली. महापालिकेसोबतच जिल्हापरिषद निवडणुकीतही मतदानयंत्रातील कल्पक घोळामुळे अनेकांचा पराभव झाल्याची संतप्त प्रतिक्रिया यावेळी उमटली. महापालिकेच्या निवडणुकीत अनेक दिग्गजांसह विद्यमानांना पराभव स्विकारावा लागला. शिवसेनेचे सुधीर सूर्यवंशी वसुनिल खराटे, राष्ट्रवादीचे बाबा राठोड यांच्यासह माजी स्थायी सभापती अविनाश मार्डीकर यांनी ईव्हिएममधील घोळावर प्रकाश टाकला. विशिष्ट उमेदवार निवडून आणण्यासाठी ईव्हिएममध्ये घातलेला घोळ जनतेसमोर आणण्यासाठी रस्त्यावर उतरण्याचे आवाहन खा. अडसूळ यांनी केले. संपर्क कार्यालयातील ४०० पेक्षा अधिक उमेदवार पदाधिकाऱ्यांनी त्या आवाहनाला प्रतिसाद दिला. सोमवारच्या बंददरम्यान प्रसंगी पोलिसांशी दोन हात करावे लागतिल, त्यासाठी सर्वानी सज्ज राहावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. आता न्यायालयीन लढाईनुकत्याच झालेल्या निवडणुकीदरम्यान घालण्यात आलेल्या मतदान यंत्रातील घोळासंदर्भात न्यायालयीन लढाई लढण्याची भूमिका शिवसेनेसह पराभूत उमेदवारांनी घेतली आहे.महापालिका,जिल्हापरिषदेसाठी पुनर्मतदान घेण्यात यावे आणि त्याआधी महापौर आणि सभापती निवडीला स्थगिती देण्यात यावी, असे मुद्दे जनहित याचिकेच्या माध्यमातून मांडले जाणार आहे. यापुढील सर्व निवडणुका पेपर बॅलेटच्या साह्याने घेण्याची विनंती याचिकेतून करण्यात येणार आहे.राष्ट्रपतींकडे याचिका यासंदर्भात राष्ट्रपतींसह राष्ट्रीय निवडणूक आयोगाकडे पत्रव्यवहार करण्याचेही बैठकीदरम्यान ठरविण्यात आले.आपण याबाबत पुढकार घेणार असल्याचे खा. आनंदराव अडसूळ यांनी सांगितले.