शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
3
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
4
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
5
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
6
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
7
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
8
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
9
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
10
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
11
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
12
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
13
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
14
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
15
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
16
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
17
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
18
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
19
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?

आज शहर बंद

By admin | Updated: February 27, 2017 00:05 IST

ईव्हीएम घोळाचा वणवा अमरावतीतही पोहोचला असून फेरमतदानाच्या मागणीसाठी शिवसेनेसह बहुपक्षिय पराभूत उमेदवारांनी सोमवार २७ फेब्रुवारीला ‘अमरावती बंद’ची हाक दिली आहे.

सर्वपक्षीय एकवटले : फेरमतदानाची मागणी बुलंदअमरावती : ईव्हीएम घोळाचा वणवा अमरावतीतही पोहोचला असून फेरमतदानाच्या मागणीसाठी शिवसेनेसह बहुपक्षिय पराभूत उमेदवारांनी सोमवार २७ फेब्रुवारीला ‘अमरावती बंद’ची हाक दिली आहे. सत्ताधिशांकडून घालण्यात आलेला मतदान यंत्रातील घोळ लोकशाहीची हत्या करण्याचा प्रकार असून त्याविरोधात पुकारलेल्या शहर बंदला व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे ,असे आवाहन खा. आनंदराव अडसूळ यांनी केले. रविवारी शिवसेना संपर्क कार्यालयात अडसूळ यांच्या नेतृत्वात सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली. भाजपक्षाने या ईव्हिएम सेट केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. सोमवारी सकाळी ८ ते ११ या कालावधीत शहर बंद केल्यानंतर नेहरु मैदानातून जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढल्या जाईल.या मोर्चात सर्वपक्षीय पराभूत उमेदवारांसह शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, मुस्लिम लिग व अन्य पक्षाचे पदाधिकारी, अपक्ष काळे झेंडे घेऊन सहभागी होतील.बंद आणि मोर्चाच्या माध्यमातून फेरमतदानाची मागणी बुलंद करण्यात येणार आहे.शनिवारी संत गाडगेबाबा समाधीमंदीरात पराभूत उमेदवारांची बैठक झाली.त्यापाठोपाठ रविवारी दुपारी राजकमल चौकस्थित शिवसेनेच्या संपर्क कार्यालयात खा.अडसूळ यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली.२१ फेब्रुवारीला झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान ईव्हिएममध्ये प्रचंड तांत्रिक घोळ घालण्यात आला. घरची हक्काची मते सुध्दा उमेदवारांना पडली नाहीत. विजयाची शाश्वती असताना काही पराभूत झालेत तर घरी बसलेले उमेदवार अनपेक्षितपणे निवडून आल्याची खंत अनेकांनी या बैठकीत व्यक्त केली. महापालिकेसोबतच जिल्हापरिषद निवडणुकीतही मतदानयंत्रातील कल्पक घोळामुळे अनेकांचा पराभव झाल्याची संतप्त प्रतिक्रिया यावेळी उमटली. महापालिकेच्या निवडणुकीत अनेक दिग्गजांसह विद्यमानांना पराभव स्विकारावा लागला. शिवसेनेचे सुधीर सूर्यवंशी वसुनिल खराटे, राष्ट्रवादीचे बाबा राठोड यांच्यासह माजी स्थायी सभापती अविनाश मार्डीकर यांनी ईव्हिएममधील घोळावर प्रकाश टाकला. विशिष्ट उमेदवार निवडून आणण्यासाठी ईव्हिएममध्ये घातलेला घोळ जनतेसमोर आणण्यासाठी रस्त्यावर उतरण्याचे आवाहन खा. अडसूळ यांनी केले. संपर्क कार्यालयातील ४०० पेक्षा अधिक उमेदवार पदाधिकाऱ्यांनी त्या आवाहनाला प्रतिसाद दिला. सोमवारच्या बंददरम्यान प्रसंगी पोलिसांशी दोन हात करावे लागतिल, त्यासाठी सर्वानी सज्ज राहावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. आता न्यायालयीन लढाईनुकत्याच झालेल्या निवडणुकीदरम्यान घालण्यात आलेल्या मतदान यंत्रातील घोळासंदर्भात न्यायालयीन लढाई लढण्याची भूमिका शिवसेनेसह पराभूत उमेदवारांनी घेतली आहे.महापालिका,जिल्हापरिषदेसाठी पुनर्मतदान घेण्यात यावे आणि त्याआधी महापौर आणि सभापती निवडीला स्थगिती देण्यात यावी, असे मुद्दे जनहित याचिकेच्या माध्यमातून मांडले जाणार आहे. यापुढील सर्व निवडणुका पेपर बॅलेटच्या साह्याने घेण्याची विनंती याचिकेतून करण्यात येणार आहे.राष्ट्रपतींकडे याचिका यासंदर्भात राष्ट्रपतींसह राष्ट्रीय निवडणूक आयोगाकडे पत्रव्यवहार करण्याचेही बैठकीदरम्यान ठरविण्यात आले.आपण याबाबत पुढकार घेणार असल्याचे खा. आनंदराव अडसूळ यांनी सांगितले.