शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

आज शहर बंद

By admin | Updated: February 27, 2017 00:05 IST

ईव्हीएम घोळाचा वणवा अमरावतीतही पोहोचला असून फेरमतदानाच्या मागणीसाठी शिवसेनेसह बहुपक्षिय पराभूत उमेदवारांनी सोमवार २७ फेब्रुवारीला ‘अमरावती बंद’ची हाक दिली आहे.

सर्वपक्षीय एकवटले : फेरमतदानाची मागणी बुलंदअमरावती : ईव्हीएम घोळाचा वणवा अमरावतीतही पोहोचला असून फेरमतदानाच्या मागणीसाठी शिवसेनेसह बहुपक्षिय पराभूत उमेदवारांनी सोमवार २७ फेब्रुवारीला ‘अमरावती बंद’ची हाक दिली आहे. सत्ताधिशांकडून घालण्यात आलेला मतदान यंत्रातील घोळ लोकशाहीची हत्या करण्याचा प्रकार असून त्याविरोधात पुकारलेल्या शहर बंदला व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे ,असे आवाहन खा. आनंदराव अडसूळ यांनी केले. रविवारी शिवसेना संपर्क कार्यालयात अडसूळ यांच्या नेतृत्वात सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली. भाजपक्षाने या ईव्हिएम सेट केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. सोमवारी सकाळी ८ ते ११ या कालावधीत शहर बंद केल्यानंतर नेहरु मैदानातून जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढल्या जाईल.या मोर्चात सर्वपक्षीय पराभूत उमेदवारांसह शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, मुस्लिम लिग व अन्य पक्षाचे पदाधिकारी, अपक्ष काळे झेंडे घेऊन सहभागी होतील.बंद आणि मोर्चाच्या माध्यमातून फेरमतदानाची मागणी बुलंद करण्यात येणार आहे.शनिवारी संत गाडगेबाबा समाधीमंदीरात पराभूत उमेदवारांची बैठक झाली.त्यापाठोपाठ रविवारी दुपारी राजकमल चौकस्थित शिवसेनेच्या संपर्क कार्यालयात खा.अडसूळ यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली.२१ फेब्रुवारीला झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान ईव्हिएममध्ये प्रचंड तांत्रिक घोळ घालण्यात आला. घरची हक्काची मते सुध्दा उमेदवारांना पडली नाहीत. विजयाची शाश्वती असताना काही पराभूत झालेत तर घरी बसलेले उमेदवार अनपेक्षितपणे निवडून आल्याची खंत अनेकांनी या बैठकीत व्यक्त केली. महापालिकेसोबतच जिल्हापरिषद निवडणुकीतही मतदानयंत्रातील कल्पक घोळामुळे अनेकांचा पराभव झाल्याची संतप्त प्रतिक्रिया यावेळी उमटली. महापालिकेच्या निवडणुकीत अनेक दिग्गजांसह विद्यमानांना पराभव स्विकारावा लागला. शिवसेनेचे सुधीर सूर्यवंशी वसुनिल खराटे, राष्ट्रवादीचे बाबा राठोड यांच्यासह माजी स्थायी सभापती अविनाश मार्डीकर यांनी ईव्हिएममधील घोळावर प्रकाश टाकला. विशिष्ट उमेदवार निवडून आणण्यासाठी ईव्हिएममध्ये घातलेला घोळ जनतेसमोर आणण्यासाठी रस्त्यावर उतरण्याचे आवाहन खा. अडसूळ यांनी केले. संपर्क कार्यालयातील ४०० पेक्षा अधिक उमेदवार पदाधिकाऱ्यांनी त्या आवाहनाला प्रतिसाद दिला. सोमवारच्या बंददरम्यान प्रसंगी पोलिसांशी दोन हात करावे लागतिल, त्यासाठी सर्वानी सज्ज राहावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. आता न्यायालयीन लढाईनुकत्याच झालेल्या निवडणुकीदरम्यान घालण्यात आलेल्या मतदान यंत्रातील घोळासंदर्भात न्यायालयीन लढाई लढण्याची भूमिका शिवसेनेसह पराभूत उमेदवारांनी घेतली आहे.महापालिका,जिल्हापरिषदेसाठी पुनर्मतदान घेण्यात यावे आणि त्याआधी महापौर आणि सभापती निवडीला स्थगिती देण्यात यावी, असे मुद्दे जनहित याचिकेच्या माध्यमातून मांडले जाणार आहे. यापुढील सर्व निवडणुका पेपर बॅलेटच्या साह्याने घेण्याची विनंती याचिकेतून करण्यात येणार आहे.राष्ट्रपतींकडे याचिका यासंदर्भात राष्ट्रपतींसह राष्ट्रीय निवडणूक आयोगाकडे पत्रव्यवहार करण्याचेही बैठकीदरम्यान ठरविण्यात आले.आपण याबाबत पुढकार घेणार असल्याचे खा. आनंदराव अडसूळ यांनी सांगितले.