शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

तासन्तास फ्रिजर बंद, कसे ठेवणार रक्त सुरक्षित? रक्तपेढीत पेच

By उज्वल भालेकर | Updated: May 15, 2023 23:48 IST

आठ दिवसांपासून इर्विनमध्ये विजेचा लपंडाव, रक्तपेढीत नाही जनरेटर

उज्वल भालेकर, अमरावती: जिल्हा सामान्य रुग्णालयात मागील आठ दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरूच आहे. सोमवारीही रुग्णालयातील रक्तपेढी, सीटीस्कॅन, लॅबमधील विद्युत पुरवठा बंद असल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे रक्तपेढीतील रक्त सुरक्षित ठेवण्यासाठी असलेले फ्रिजरही बंद होते. त्यामुळे तासन्तास विद्युत पुरवठ्यामुळे फ्रिजर बंद राहत असेल तर रक्त सुरक्षित कसे राहील, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

एखाद्या रक्तदात्याने रक्तदान केल्यानंतर ते रक्त खराब होऊ नये यासाठी तातडीने रेफ्रिजरेटरमध्ये (फ्रिजर) ठेवले जाते. लालपेशी या रेफ्रिजरेटरमध्ये ६ डिग्री सेल्सिअसवर ४ ते ५ आठवडे सुरक्षित ठेवता येते; परंतु जर रेफ्रिजरेटर बंद राहिल्यास किंवा तापमान वाढल्यास रक्तामध्ये इन्फेक्शन (संसर्ग) होऊ शकतो. तसचे लालपेशी खराब व्हायला सुरुवात होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे रक्तपेढी विभागात रक्त सुरक्षित राहावे, यासाठी विद्युत पुरवठा खंडित झाल्यास जनरेटरची सुविधा असणे गरजेचे आहे; परंतु जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढी अजूनही जनरेटरशी जोडली गेलेली नाही. त्यामुळे रुग्णालयात वारंवार खंडित होत असलेल्या वीजपुरवठ्यामुळे फ्रिजरमध्ये ठेवलेले रक्तही खराब होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच विजेअभावी रुग्णालयातील सोमवारी होणाऱ्या काही शस्त्रक्रियाही पुढे ढकलण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.

रक्तचाचण्याही थांबल्या- विविध आजारांचे निदान करण्यासाठी रक्ताची चाचणी करणे गरजेचे आहे; परंतु जिल्हा सामान्य रुग्णालयातील लॅबमधीलही विद्युत पुरवठा बंद असल्याचे चित्र सोमवारी पाहायला मिळाले. त्यामुळे या लॅबमध्ये होणाऱ्या रक्ताच्या चाचण्याही थांबल्या होत्या. त्यामुळे नातेवाइकांनाही आपल्या रुग्णांच्या अहवालाची प्रतीक्षा करावी लागली आहे.

सीटीस्कॅन, सोनोग्राफीही बंद- जिल्हा सामान्य रुग्णालयात रोज सरासरी शंभर ते दीडशे रुग्ण हे एक्स-रे, सीटीस्कॅन, सोनोग्राफीसाठी येतात; परंतु वीज नसल्याने अनेक रुग्ण हे सीटीस्कॅन, सोनोग्राफी विभागाबाहेर तासन्तास आपल्या रुग्णांना घेऊन बसल्याचे चित्र पाहायला मिळाले.

रुग्णालयात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाला दिली आहे. त्यामुळे वारंवार विद्युत खंडित होण्याचे नेमके कारण काय? हे ते सांगू शकतील. तरी या संदर्भातील आढावा घेऊन दोन ते तीन दिवसांत रुग्णालयातील विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुुरू आहेत. -डॉ. दिलीप सौंदळे, जिल्हा शल्यचिकित्सक, इर्विन

टॅग्स :Amravatiअमरावती