शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

८४० ग्रामपंचायतींचा ग्रामसभांचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:15 IST

अमरावती जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या ग्रामसभांना १५ जानेवारी २०२१ च्या परिपत्रकानुसार स्थगिती देण्यात आली होती. मात्र, ही स्थगिती ग्रामविकास विभागाने ...

अमरावती जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या ग्रामसभांना १५ जानेवारी २०२१ च्या परिपत्रकानुसार स्थगिती देण्यात आली होती. मात्र, ही स्थगिती ग्रामविकास विभागाने ११ फेब्रुवारी रोजीच्या पत्रानुसार स्थगिती उठविली आहे. यामुळे जिल्हाभरातील ८४० ग्रामपंचायतींना ग्रामसभा घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र दुसरीकडे सध्या जिल्हाभरात कोरोना संक्रमित रूग्णाची वाढती संख्या लक्षात घेता सभा,मेळाव व अन्य कार्यक्रमाना जिल्हाधिकारी यांनी निर्बंध घातले आहेत. त्यामुळे ग्रामसभा घेण्याचा पेच सध्या तरी निर्माण झाला आहे.

राज्याच्या ग्रामविकास विभागाने १५ जानेवारीच्या जारी केलेल्या परिपत्रकानुसार ग्रामपंचायतीच्या ग्रामसभा ३१ मार्चपर्यंत स्थगिती दिली होती. मात्र ग्रामविकास विभागाने ही स्थगिती उठविली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत ग्रामसभा घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या पत्रानुसार जिल्ह्यात ग्रामसभा घेताना ग्रामपंचायतीने सोशल फिजिकल डिस्टंसिंग,कोविड १९ च्या अनुषंगाने निर्गमित मार्गदर्शक तत्वांचे काटेकोर पालन करावे. तसेच पूर्वीप्रमाणे ग्रामसभांचे आयोजन करण्यास परवानगी देण्यात येत असल्याचे ग्रामविकास विभागाने काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे. ग्रामसभेच्या मंजुरी अभावी वार्षिक आराखडे शासनाच्या विविध योजना अंतर्गत वैयक्तिक लाभार्थी यादी, पुनर्वसित गावांचे प्रस्ताव, गौण खनिज परवानगी, थेट सरपंच विरोधातील अविश्वास ठराव चौदाव्या व पंधराव्या वित्त आयोगाचा निधी खर्च या बाबी प्रलंबित राहिल्या आहेत तसेच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव देखील कमी होत चालला असल्याने जनजीवन पूर्ववत होत असल्याने शासन ग्रामसभेत स्थगिती उठविली असल्याचे या पत्रात म्हटले आहे. एकिकडे स्थगिती उठविली असल्याने सर्व ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभा घेण्याची लगीनघाई सुरू झाली असून ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी यांनी ग्रामसभेची तारीख काढण्याचे नियोजनाच्या हालचाली सुरू असतांनाच जिल्ह्यात सध्या कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता जिल्हाधिकारी यांनी वाढता संसर्गाला प्रतिबंध घालण्यासाठी सभा,मेळावे आदींना मनाई आदेश जारी केला आहे.त्यामुळे ग्रामविकास विभागाने ग्रामसभा घेण्यास परवानगी दिली असला तरी जिल्ह्यात मात्र या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी पेच निर्माण झाला आहे.

बॉक्स

सभा, मेळाव्यावर निर्बंध शिथिल झाल्यानंतर निर्णय

१५ जानेवारी रोजी ग्रामविकास विभागाने ग्रामसभांना ३१ मार्च पर्यत स्थगिती देण्याबाबतचे निर्देश दिले होते.अशातच ११ फेब्रुवारी रोजी स्थगीत घटवून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करून सभा घेण्याचे सूचविले आहे.मात्र सध्या जिल्ह्यात कोरोनाचा प्रक्रोप वाढत असल्याने मेळावे, सभाना मनाई केली आहे.याबाबत नियम शिथिल झाल्यानंतर ग्रामविकास विभागाच्या आदेशाची अंमलबजावणी केली जाणार जाणार असल्याचे जिल्हा परिषद पंचायत विभागाचे डेप्युटी सीईओ दिलीप मानकर यांनी सांगितले.