शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठात स्वच्छतेचा जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 22:59 IST

कर्मयोगी संत गाडगेबाबांची कर्मभूमी अमरावती असल्याने आपण सर्व सुशिक्षित झालेल्या युवा पिढीने गाडगेबाबांनी दिलेला स्वच्छतेचा वारसा समृद्धपणे चालविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन अभिनेते तथा स्वच्छतादूत भारत गणेशपुरे यांनी केले.

ठळक मुद्देचर्चासत्र : भारत गणेशपुरे यांचे गाडगेबाबांचा वारसा चालविण्याचे आवाहन

लोकमत आॅनलाईनअमरावती : कर्मयोगी संत गाडगेबाबांची कर्मभूमी अमरावती असल्याने आपण सर्व सुशिक्षित झालेल्या युवा पिढीने गाडगेबाबांनी दिलेला स्वच्छतेचा वारसा समृद्धपणे चालविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन अभिनेते तथा स्वच्छतादूत भारत गणेशपुरे यांनी केले.संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ विद्यार्थी भवनात राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि अमरावती महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वच्छ भारत-स्वस्थ भारत’ अभियानातंर्गत चर्चासत्राप्रसंगी ते बोलत होते.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कुलगुरु मुरलीधर चांदेकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून कुलसचिव अजय देशमुख, स्थायी समितीचे सभापती तुषार भारतीय, अतिरिक्त आयुक्त सोमनाथ शेटे, उपायुक्त नरेंद्र वानखडे, आरोग्य अधिकारी सीमा नेताम, रासेयोचे प्रभारी संचालक राजेश मिरगे उपस्थित होते.गणेशपुरे पुढे म्हणाले, गाडगेबाबांच्या नावे असलेल्या संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता दूत म्हणून समाजात कार्य करण्याची आज गरज असून स्वच्छतेची सुरुवात आपण सर्वांनी आपल्यापासूनच केल्यास येणाºया काळात स्वच्छ आणि स्वस्थ अमरावती शहराची संकल्पना आपण साकार करु शकू. समाजात नवे काही तरी करण्याची क्षमता फक्त तरुणांमध्येच असून त्यासाठी तुमच्यातील शक्तीचा योग्य उपयोग समाजासाठी करा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.अध्यक्षीय भाषणात कुलगुरु मुरलीधर चांदेकर म्हणाले, आपल्यावर जन्माला आल्यापासूनच मातेकडून स्वच्छतेचे संस्कार होत असतात. मात्र, तरीही स्वच्छतेची शिकवण देण्याची वेळ आपल्यावर आली आहे. प्रत्येकाने स्वत: संकल्प केल्यास संपूर्ण भारत स्वच्छ व्हायला वेळ लागणार नाही. कुलसचिव अजय देशमुख यांनी सुद्धा अस्वच्छतेचा असूर घालविण्यासाठी शक्तीचे जागरण आपल्याला करावे लागणार असल्याचे विद्यार्थ्यांना सांगितले.कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगे बाबांच्या प्रतिमेचे पूजन, हारार्पण करुन विद्यापीठ गीताने करण्यात आली. संचालन राजेश पिदडी यांनी केले, तर आभार प्रदर्शन मंदा नांदूरकर यांनी केले.