शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
2
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
3
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
4
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
5
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
6
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
7
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
8
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
9
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
10
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
12
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
13
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
14
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
15
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
16
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
17
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
18
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
19
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
20
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न

स्वच्छ सर्वेक्षणाचे ‘क्रॉस व्हेरिफिकेशन’

By admin | Updated: February 7, 2017 00:08 IST

स्वच्छ सर्वेक्षण २०१७ अंतर्गत पुन्हा एकदा अमरावती शहराचे स्वच्छताविषयक सर्वेक्षण केले जात आहे. मंगळवारी (७ फेब्रुवारी) ही पुनर्तपासणी होत आहे.

आज पुनर्तपासणी : गुणांकनावर होणार शिक्कामोर्तबअमरावती : स्वच्छ सर्वेक्षण २०१७ अंतर्गत पुन्हा एकदा अमरावती शहराचे स्वच्छताविषयक सर्वेक्षण केले जात आहे. मंगळवारी (७ फेब्रुवारी) ही पुनर्तपासणी होत आहे. क्यूसीआयचे पथक सकाळी महापालिकेत पोहोचणार आहेत. या पथकाकडून होणाऱ्या पुनर्तपासणीच्या अहवालावर अमरावती महापालिकेचे गुणांकन ठरणार आहे. सोमवारी दुपारी याबाबत ‘क्यूसीआय’कडून अतिरिक्त आयुक्तांना मोबाईल संदेश मिळाला असून पुनर्तपासणीच्या पूर्वतयारीला वेग देण्यात आला आहे. मंगळवारी हे ‘इव्हॅॅल्यूशन’ होणार आहे. स्वच्छ भारत मिशनमधील स्वच्छ भारत अभियान (नागरी) अंतर्गत देशातील ५०० शहरांमध्ये ४ जानेवारी ते ४ फेब्रुवारी या कालावधीत ‘क्वालिटी कौन्सिल आॅफ इंडिया’कडून स्वच्छ सर्वेक्षण २०१७ राबविण्यात आले. २००० गुणांच्या स्वच्छताविषयक स्पर्धेमध्ये शहरांचे गुणांकन ठरविण्यासाठी एका खासगी कंपनीच्या ‘असेसर्स’कडून तपासणी करण्यात आली. त्या अनुषंगाने क्यूसीआयने नेमलेल्या चारूदत्त पाठक, गोविंद घिमिरे आणि विजय जोशी या पथकाने १७ ते १९ जानेवारीदरम्यान अमरावती शहराचे स्वच्छताविषयक पाहणी केली. चारूदत्त पाठक यांनी महापालिकेत बसून महापालिकेचे दस्तऐवज तपासले. घिमिरे आणि जोशींनी ‘स्पॉट व्हिजीट’ करत स्वच्छ सर्वेक्षणाची तपासणी केली. घनकचरा व्यवस्थापन, वाहतूक प्रक्रिया आणि विल्हेवाटीच्यासंदर्भात २००० गुणांचीही तपासणी करण्यात आली आणि महापालिकेचा जीव भांड्यात पडला. क्यूसीआय पथकाच्या सर्वेक्षणावेळी यंत्रणेने जय्यत तयारी केली होती. स्वच्छताविषयक सर्वच डाटावर पाठक यांनी समाधान व्यक्त केल्याने पहिल्या २० शहरांमध्ये येणाऱ्या महापालिकेच्या आशा या समाधानातून पल्लवित झाल्या होत्या. मात्र पुन्हा एकदा क्यूसीआयचे पथक एक दिवसासाठी पुनर्तपासणी करण्यात येत असल्याने अतिरिक्त आयुक्त शेटे आणि त्यांची टीम कामाला लागली आहे. शेटे यांच्यानुसार, मंगळवारी येणारे क्यूसीआयचे ‘असेसर’ १७ ते १९ जानेवारीदरम्यान पार पडलेल्या सर्वेक्षणवजा तपासणीचेच क्रॉस व्हेरिफिकेशन करणार आहेत. (प्रतिनिधी)लाचखोरीचा संदर्भजोशी आणि घिमिरे यांचा समावेश असलेले क्यूसीआयचे एक पथक औरंगाबाद महापालिकेत १ लाख ७० हजारांची लाच घेताना ‘एसीबी’ने पकडले होते. अन्य ठिकाणी तर असा प्रकार केला नाही ना? आणि केला असेल, तर त्या शहराच्या सर्वेक्षणाची वास्तविकता काय? हे तपासण्यासाठी पुन्हा एकदा अमरावती महापालिका क्षेत्रात स्वच्छ सर्वेक्षण होत आहे की काय, अशी शंका उपस्थित करण्यात आली आहे. अमरावती महापालिकेने या पथकाची उत्तम बडदास्त राखली होती, हे येथे विशेष उल्लेखनीय.