शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

स्वच्छ सर्वेक्षणाचे ‘क्रॉस व्हेरिफिकेशन’

By admin | Updated: February 7, 2017 00:08 IST

स्वच्छ सर्वेक्षण २०१७ अंतर्गत पुन्हा एकदा अमरावती शहराचे स्वच्छताविषयक सर्वेक्षण केले जात आहे. मंगळवारी (७ फेब्रुवारी) ही पुनर्तपासणी होत आहे.

आज पुनर्तपासणी : गुणांकनावर होणार शिक्कामोर्तबअमरावती : स्वच्छ सर्वेक्षण २०१७ अंतर्गत पुन्हा एकदा अमरावती शहराचे स्वच्छताविषयक सर्वेक्षण केले जात आहे. मंगळवारी (७ फेब्रुवारी) ही पुनर्तपासणी होत आहे. क्यूसीआयचे पथक सकाळी महापालिकेत पोहोचणार आहेत. या पथकाकडून होणाऱ्या पुनर्तपासणीच्या अहवालावर अमरावती महापालिकेचे गुणांकन ठरणार आहे. सोमवारी दुपारी याबाबत ‘क्यूसीआय’कडून अतिरिक्त आयुक्तांना मोबाईल संदेश मिळाला असून पुनर्तपासणीच्या पूर्वतयारीला वेग देण्यात आला आहे. मंगळवारी हे ‘इव्हॅॅल्यूशन’ होणार आहे. स्वच्छ भारत मिशनमधील स्वच्छ भारत अभियान (नागरी) अंतर्गत देशातील ५०० शहरांमध्ये ४ जानेवारी ते ४ फेब्रुवारी या कालावधीत ‘क्वालिटी कौन्सिल आॅफ इंडिया’कडून स्वच्छ सर्वेक्षण २०१७ राबविण्यात आले. २००० गुणांच्या स्वच्छताविषयक स्पर्धेमध्ये शहरांचे गुणांकन ठरविण्यासाठी एका खासगी कंपनीच्या ‘असेसर्स’कडून तपासणी करण्यात आली. त्या अनुषंगाने क्यूसीआयने नेमलेल्या चारूदत्त पाठक, गोविंद घिमिरे आणि विजय जोशी या पथकाने १७ ते १९ जानेवारीदरम्यान अमरावती शहराचे स्वच्छताविषयक पाहणी केली. चारूदत्त पाठक यांनी महापालिकेत बसून महापालिकेचे दस्तऐवज तपासले. घिमिरे आणि जोशींनी ‘स्पॉट व्हिजीट’ करत स्वच्छ सर्वेक्षणाची तपासणी केली. घनकचरा व्यवस्थापन, वाहतूक प्रक्रिया आणि विल्हेवाटीच्यासंदर्भात २००० गुणांचीही तपासणी करण्यात आली आणि महापालिकेचा जीव भांड्यात पडला. क्यूसीआय पथकाच्या सर्वेक्षणावेळी यंत्रणेने जय्यत तयारी केली होती. स्वच्छताविषयक सर्वच डाटावर पाठक यांनी समाधान व्यक्त केल्याने पहिल्या २० शहरांमध्ये येणाऱ्या महापालिकेच्या आशा या समाधानातून पल्लवित झाल्या होत्या. मात्र पुन्हा एकदा क्यूसीआयचे पथक एक दिवसासाठी पुनर्तपासणी करण्यात येत असल्याने अतिरिक्त आयुक्त शेटे आणि त्यांची टीम कामाला लागली आहे. शेटे यांच्यानुसार, मंगळवारी येणारे क्यूसीआयचे ‘असेसर’ १७ ते १९ जानेवारीदरम्यान पार पडलेल्या सर्वेक्षणवजा तपासणीचेच क्रॉस व्हेरिफिकेशन करणार आहेत. (प्रतिनिधी)लाचखोरीचा संदर्भजोशी आणि घिमिरे यांचा समावेश असलेले क्यूसीआयचे एक पथक औरंगाबाद महापालिकेत १ लाख ७० हजारांची लाच घेताना ‘एसीबी’ने पकडले होते. अन्य ठिकाणी तर असा प्रकार केला नाही ना? आणि केला असेल, तर त्या शहराच्या सर्वेक्षणाची वास्तविकता काय? हे तपासण्यासाठी पुन्हा एकदा अमरावती महापालिका क्षेत्रात स्वच्छ सर्वेक्षण होत आहे की काय, अशी शंका उपस्थित करण्यात आली आहे. अमरावती महापालिकेने या पथकाची उत्तम बडदास्त राखली होती, हे येथे विशेष उल्लेखनीय.