शहरं
Join us  
Trending Stories
1
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
2
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
3
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
4
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
5
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
6
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
7
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
8
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
9
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
10
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
11
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
12
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
13
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
14
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
15
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
16
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
17
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
18
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
19
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
20
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले

स्वच्छ कारभाराची ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 23:08 IST

मागील चार वर्षांचा आढावा घेता सत्ताधारी व विरोधक या दोन्ही बाजूंनी न्यायालयीन प्रक्रियेमध्येच अधिक वेळ घालविला, ....

ठळक मुद्देबाळासाहेब सपकाळ : न्यायालयीन प्रक्रियेमुळेच संस्था माघारली

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मागील चार वर्षांचा आढावा घेता सत्ताधारी व विरोधक या दोन्ही बाजूंनी न्यायालयीन प्रक्रियेमध्येच अधिक वेळ घालविला, यामुळे राज्यातील आघाडीची असणाºया या शिक्षण संस्थेची प्रगती माघारली, आम्ही भयमुक्त व स्वच्छ कारभार देऊ, अशी ग्वाही बाळासाहेब सपकाळ यांनी दिली.श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विकास पॅनेलचा जाहीरनामा काय, यावर ते बोलत होते. केवळ एका ओळीच्या ठरावाला आमसभेची मंजुरात पाहिजे, म्हणजे कंपणीचा मुद्दा निकाली निघतो व पुढचे त्रास वाचतात. सन २०१२ मधील निवडणुकीत याच मुद्यावर रस्सीखेच सुरू होती. गेल्या चार वर्षांपासून हा मुद्दा कोर्टात सुरू असल्यामुळे या काळात संस्थेची प्रगती खुंटली, ही वस्तुस्थिती आहे. यापुढे कंपनीला मतदान व उभे राहण्याचा अधिकार राहणार नाही, अशी घटनेत तरतूद करावी लागेल,असे सपकाळ यांनी सांगितले.या सर्व न्यायालयीन प्रक्रियेत संस्थेचा वेळ खर्ची पडला. संस्थेत नवीन कोर्सेस सुरू झालेली नाहीत. या सर्व भानगडीत युवा पिढीचे नुकसान होत आहे. राज्यात कधी अग्रणी असलेली संस्था ‘सिंबायसीस’ का होऊ शकत नाही, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. संस्थेत सर्व साधने उपलब्ध असताना काहीही अशक्य नाही. मात्र, यासाठी नियोजन व व्हिजन असावे लागते, असे सपकाळ यांनी सांगितले.संस्थेच्या आजीवन सभासदांच्या पाल्यांना वारस हा तांत्रिक शब्द टाकून घटनेत तरतूद नाही म्हणून सभासद करता येत नाही, हा सोयीस्कर पर्याय सत्ताधाºयांनी निवडला. वास्तविकता शिवपरिवारातील नवीन पाल्यांना सभासद करने सहज शक्य आहे.मात्र वारस या शब्दाचा वापर करून सोईस्कर गुंतागुंत करण्यात आली. वारसांना हक्क नाही आदी केवळ बतावनी आहे. शिव परिवारातील पाल्यांना नवीन सभासद करण्यात कोणतीही अडचण नाही. मात्र याविषयीची सतत दिशाभूल करण्यात येत असल्यांचे सपकाळ यांनी सांगितले.नुसत्या इमारती बांधून प्रगती होत नसते, तर नव्या युगाचे अभ्यासक्रम आणून विद्याथ्यांचे हित साधायला पाहिजे, संस्थेच्या उत्पन्नत वाढ झाली ती नैसगीक आहे. मूल्यांकन (नेटवर्थ) हे नैसर्गिकरीत्या वाढले. यामध्ये सत्तापक्षाचा कवडीचाही सहभाग नाही, असे सपकाळ यांनी सांगितले.भाऊसाहेबांनी विणलेली शिवपरिवाराची वीण कायम ठेवूसंस्थेच्या आजीवन सदस्यांना प्राधान्य दिले जात नाही. त्याऐवजी राजकीय लोकांना दिले जाते, ही दु:खाची बाब आहे. आम्ही त्यांना प्राधान्य देऊ संस्थेच्या कारभारात त्याचा सहभाग व मार्गदर्शन घेऊ, त्यांच्या आरोग्यासंदर्भात सुविधा देऊ. त्यांच्या पाल्यांना प्रवेशासंदर्भात प्राधान्य देऊ, असे सपकाळ यांनी सांगितले. भाऊसाहेबांनी विणलेली शिवपरिवाराची विण कायम ठेवू, असेही ते म्हणाले. शेतकºयांना सुविधा देणे आपले हे नैतिक कर्तव्य असल्याने कृषी महाविद्यालयाच्या मार्फत उपक्रम राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले.