शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ कारभाराची ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 23:08 IST

मागील चार वर्षांचा आढावा घेता सत्ताधारी व विरोधक या दोन्ही बाजूंनी न्यायालयीन प्रक्रियेमध्येच अधिक वेळ घालविला, ....

ठळक मुद्देबाळासाहेब सपकाळ : न्यायालयीन प्रक्रियेमुळेच संस्था माघारली

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मागील चार वर्षांचा आढावा घेता सत्ताधारी व विरोधक या दोन्ही बाजूंनी न्यायालयीन प्रक्रियेमध्येच अधिक वेळ घालविला, यामुळे राज्यातील आघाडीची असणाºया या शिक्षण संस्थेची प्रगती माघारली, आम्ही भयमुक्त व स्वच्छ कारभार देऊ, अशी ग्वाही बाळासाहेब सपकाळ यांनी दिली.श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विकास पॅनेलचा जाहीरनामा काय, यावर ते बोलत होते. केवळ एका ओळीच्या ठरावाला आमसभेची मंजुरात पाहिजे, म्हणजे कंपणीचा मुद्दा निकाली निघतो व पुढचे त्रास वाचतात. सन २०१२ मधील निवडणुकीत याच मुद्यावर रस्सीखेच सुरू होती. गेल्या चार वर्षांपासून हा मुद्दा कोर्टात सुरू असल्यामुळे या काळात संस्थेची प्रगती खुंटली, ही वस्तुस्थिती आहे. यापुढे कंपनीला मतदान व उभे राहण्याचा अधिकार राहणार नाही, अशी घटनेत तरतूद करावी लागेल,असे सपकाळ यांनी सांगितले.या सर्व न्यायालयीन प्रक्रियेत संस्थेचा वेळ खर्ची पडला. संस्थेत नवीन कोर्सेस सुरू झालेली नाहीत. या सर्व भानगडीत युवा पिढीचे नुकसान होत आहे. राज्यात कधी अग्रणी असलेली संस्था ‘सिंबायसीस’ का होऊ शकत नाही, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. संस्थेत सर्व साधने उपलब्ध असताना काहीही अशक्य नाही. मात्र, यासाठी नियोजन व व्हिजन असावे लागते, असे सपकाळ यांनी सांगितले.संस्थेच्या आजीवन सभासदांच्या पाल्यांना वारस हा तांत्रिक शब्द टाकून घटनेत तरतूद नाही म्हणून सभासद करता येत नाही, हा सोयीस्कर पर्याय सत्ताधाºयांनी निवडला. वास्तविकता शिवपरिवारातील नवीन पाल्यांना सभासद करने सहज शक्य आहे.मात्र वारस या शब्दाचा वापर करून सोईस्कर गुंतागुंत करण्यात आली. वारसांना हक्क नाही आदी केवळ बतावनी आहे. शिव परिवारातील पाल्यांना नवीन सभासद करण्यात कोणतीही अडचण नाही. मात्र याविषयीची सतत दिशाभूल करण्यात येत असल्यांचे सपकाळ यांनी सांगितले.नुसत्या इमारती बांधून प्रगती होत नसते, तर नव्या युगाचे अभ्यासक्रम आणून विद्याथ्यांचे हित साधायला पाहिजे, संस्थेच्या उत्पन्नत वाढ झाली ती नैसगीक आहे. मूल्यांकन (नेटवर्थ) हे नैसर्गिकरीत्या वाढले. यामध्ये सत्तापक्षाचा कवडीचाही सहभाग नाही, असे सपकाळ यांनी सांगितले.भाऊसाहेबांनी विणलेली शिवपरिवाराची वीण कायम ठेवूसंस्थेच्या आजीवन सदस्यांना प्राधान्य दिले जात नाही. त्याऐवजी राजकीय लोकांना दिले जाते, ही दु:खाची बाब आहे. आम्ही त्यांना प्राधान्य देऊ संस्थेच्या कारभारात त्याचा सहभाग व मार्गदर्शन घेऊ, त्यांच्या आरोग्यासंदर्भात सुविधा देऊ. त्यांच्या पाल्यांना प्रवेशासंदर्भात प्राधान्य देऊ, असे सपकाळ यांनी सांगितले. भाऊसाहेबांनी विणलेली शिवपरिवाराची विण कायम ठेवू, असेही ते म्हणाले. शेतकºयांना सुविधा देणे आपले हे नैतिक कर्तव्य असल्याने कृषी महाविद्यालयाच्या मार्फत उपक्रम राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले.