शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
3
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
4
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
5
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
6
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
7
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
8
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
9
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
10
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
11
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
12
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
13
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
14
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
15
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
16
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
17
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
18
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
19
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
20
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...

नागरिक घरात; रुग्ण दवाखान्यात घामाघूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:13 IST

फोटो : महावितरणची लाईन दाखविणारा पान २ ची लिड परतवाडा : महावितरण कंपनीच्या अचलपूर कार्यालयाच्या कारभारामुळे सर्वसामान्य नागरिकांसह रुग्णांना ...

फोटो : महावितरणची लाईन दाखविणारा

पान २ ची लिड

परतवाडा : महावितरण कंपनीच्या अचलपूर कार्यालयाच्या कारभारामुळे सर्वसामान्य नागरिकांसह रुग्णांना कमालीचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. जुळ्या शहरांना लागून असलेल्या देवमाळी, कांडली व इतर परिसरात पूर्वसूचना न देताच वाटेल तेव्हा तीन ते चार तास पुरवठा खंडित केला जात असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे. महावितरणच्या या लालफीतशाहीचा फटका शासकीय रुग्णालयात दाखल रुग्णांनादेखील बसत आहे. गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांना विजेच्या लपंडावामुळे ऑक्सिजन घेण्यास अडचण होत असल्याचे वास्तव आहे.

जिल्ह्यासह अचलपूर तालुक्यात ९ मेपासून आठवड्याभराचे कडक निर्बंध असलेले लॉकडाऊन सुरू आहे. सर्व व्यवहार बंद आहेत. त्यामुळे नागरिक घरातच आहेत. दुसरीकडे कोरोना झाल्याने अनेक रुग्ण गृह विलगीकरणात आहेत. परंतु, विद्युत पुरवठा सतत आणि वाटेल तेव्हा खंडित होत आहे. पूर्वसूचना न देता पावसाळ्यापूर्वीच ट्री-कटिंग, तारा बदलणे, किरकोळ दुरुस्ती यासाठी हा पुरवठा खंडित केला जात आहे. परतवाडा, अचलपूर या जुळ्या शहरांसह लगतच्या देवमाळी, कांडली, गौरखेडा कुंभी या ग्रामीण भागात ग्रामपंचायतींना विद्युत पुरवठा खंडित करण्यापूर्वी पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी संपर्क केला जात असल्याचे सांगण्यात आले. मात्र, सर्वसामान्य ग्राहक या सेवेपासून वंचित आहेत.

बॉक्स

वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर येतो संदेश

विद्युत पुरवठा खंडित होत असल्याची पूर्वसूचना ग्राहकाला मिळावी, यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले. त्यासाठी महावितरण कंपनीच्यावतीने ग्राहकांचा मोबाईल क्रमांक घेण्यात आला. त्यावर पूर्वसूचना देणारे मेसेज काही दिवस पंधरा मिनिटे किंवा अर्धा तास अगोदर यायचे. मात्र, मागील दोन महिन्यांपासून ही सेवासुद्धा पूर्णत: खंडित झाली. आदल्या दिवशी वीजपुरवठा खंडित झाला असताना, मेसेज दुसऱ्या दिवशी येत असल्याचा संतापजनक प्रकार वरातीमागून घोडे दामटण्यासारखाच आहे.

बॉक्स

ग्राहक सेवा केंद्राचा क्रमांक ‘रामभरोसे’

घरगुती, दुकानांचा वीजपुरवठा किंवा तो वाहून नेणाऱ्या तारा खंडित झाल्यास वा इतरही माहिती देण्यासाठी प्रसारित केलेला अचलपूर येथील ग्राहक सेवा केंद्राचा क्रमांक कायमचा बंद किंवा व्यस्त आढळून येतो. त्यामुळे ही सेवा सुद्धा कुचकामी ठरली आहे.

बॉक्स

अधिकाऱ्यांची टोलवाटोलवी

वीजपुरवठा खंडित झाल्यावर अभियंत्यांना यासंदर्भात संपर्क केल्यास कनिष्ठ अधिकारी कर्मचाऱ्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक देतात. त्यांना विचारणा केली, तर अर्ध्या तासात विद्युत पुरवठा सुरळीत होईल, असे सांगून वेळ मारून नेली जाते. हा प्रकारही नागरिकांमध्ये चीड निर्माण करणारा ठरला आहे