शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

शहराचा ‘जीवनशैली निर्देशांक’ ठरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 23:03 IST

केंद्र शासनाने देशातील ११६ शहरांचा जीवनशैली निर्देशांक (लाइव्ह अ‍ॅबिलिटी इंडेक्स) काढण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. राज्यातील १२ शहरांची जीवनशैली मूल्यांकनासाठी निवड करण्यात आली असून, यात अमरावती शहराचाही समावेश करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे७९ मानकांद्वारे होईल तपासणी : शहरांच्या राहणीमानाचा धांडोळा

प्रदीप भाकरे।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : केंद्र शासनाने देशातील ११६ शहरांचा जीवनशैली निर्देशांक (लाइव्ह अ‍ॅबिलिटी इंडेक्स) काढण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. राज्यातील १२ शहरांची जीवनशैली मूल्यांकनासाठी निवड करण्यात आली असून, यात अमरावती शहराचाही समावेश करण्यात आला आहे. विविध ७९ निकषांद्वारे शहरातील जीवनशैली निर्देशांक तपासण्यात येणार आहे. कुठले शहर अधिक राहण्यायोग्य आहे, याबाबतची क्रमवारी या कार्यक्रमातून पुढे येईल.शहरांच्या वर्तमान परिस्थितीचे आकलन करुन तेथिल रहिवाशांचे जीवनमान उंचावण्यासाठी रुपरेखा विकसित करण्याच्या हेतूने शहरांची विस्तृत माहिती संकलित करण्यात आली आहे. तो संपूर्ण डेटा केंद्रशासनाला पाठविण्यात आला असून महिन्याअखेरीस केंद्रशासनाच्या एका चमूकडून शहराने पाठविलेल्या माहितीची खातरजमा करण्यात येईल. शहर राहण्यायोग्य आहे का, की त्यात काही सुधारणा हव्या आहेत, या अनुषंगाने ही तपासणी करण्यात येणार आहे. त्यानंतर देशातील ११६ शहरांचा जीवनशैली निर्देशांक निश्चित केला जाणार आहे. लाइव्ह अ‍ॅबिलिटी इंडेक्स तपासण्याचे हे पहिलेच वर्ष आहे.शहराची सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, सुरक्षितता, अर्थव्यवस्था, रोजगार संधी, सार्वजनिक मैदाने, जमिनींचा वापर, ऊर्जा पुरवठा, वाहतूक व्यवस्था, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्था, कचरा व्यवस्थापन, प्रदूषण, स्थान, स्थिरता, आरोग्यसेवा, पर्यावरण, वीज कंपनी, सिंचन, परिवहन, राज्य विक्रीकर, बांधकाम, हॉटेल आणि इतर पायाभूत सुविधांचे सर्वेक्षण करून मापदंडांवर जीवनशैली निर्देशांक निश्चित केला जाणार आहे.शहरातील नागरिकांच्या जीवनशैलीशी निगडीत महापालिकेच्या स्थापत्य, विद्युत, आरोग्य, वैद्यकीय, बांधकाम, मिळकत कर, पाणीपुरवठा, नागरी वस्तीसह रेल्वे, एसटी, महावितरण, आरटीओ, शैक्षणिक संस्था अशा १८ विभागांतील माहिती एकत्रित करण्यात आलेली आहे. मूल्यांकनासाठी नियुक्त केलेली कोअर कमिटी महत्त्वाच्या व कमी महत्त्वाच्या अशा १५ मुद्यांवर शहराची पाहणी करणार आहे. याबाबत माहिती अहवाल एप्रिलअखेर केंद्र शासनाला सादर करण्यात आली आहे. योजनेत असलेल्या राज्यातील १२ शहरांपैकी कोणते शहर कोणत्या गोष्टींसाठी अग्रेसर आहे, हे या सर्वेक्षणातून दिसणार आहे. महापालिकेने यासंदर्भात ५४७ प्रश्नांची उत्तरे असणारा अहवाल केंद्र शासनाच्या शहरी विकास मंत्रालयाकडे पाठविला आहे. याशिवाय शहरातील राहणीमान निर्देशांकाविषयीचा संपूर्ण डेटा केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आला आहे.महिनाअखेरीस प्रत्यक्ष पाहणी, तपासणीमूल्यांकनासाठी नियुक्त केलेली कोअर कमिटी १५ मुद्यांवर शहराची पाहणी करणार आहे. महिन्याअखेरीस महापालिकेने केंद्रशासनास पाठविलेल्या डेटाची प्रत्यक्ष खातरजमा होईल. सर्वेक्षण अहवाल पुस्तिकेच्या स्वरूपात केंद्र शासनाला सादर होईल. प्रत्येक शहराकडून प्राप्त अहवालावरून त्या-त्या शहरांसाठी निधी पुरविला जाईल. निर्देशांकानुसार योजनांची अंमलबजावणी केली जाईल.एसबीएमच्या धर्तीवर शहरी राहणीमान निर्देशांकजीवनशैली निर्देशांक तपासून योजना तयार करण्यासाठी देशातील ११६ शहरे निवडण्यात आली आहेत. सर्वेक्षणादरम्यान या शहरांचे राहणीमान जाणून घेतले जाणार आहे. यातून त्या-त्या शहरांची जीवनशैली कशी आहे, हे स्पष्ट होईल. शहरांची क्रमवारी निश्चित केली जाईल. शहरांमध्ये विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी या जीवनशैली निर्देशांकाचा उपयोग होणार आहे. स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर शहराचे राहणीमान निर्देशांक कार्यक्रम राबविला जात आहे. आयुक्त हेमंत पवार यांनी ही जबाबदारी अतिरिक्त आयुक्त सोमनाथ शेटे यांच्याकडे दिली आहे. समन्वयक श्वेता बोके यांनी यासाठी पूर्वतयारी चालविली आहे.