शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

‘नंबर गेम’मधून शहर बाद; केवळ रँकिंगची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 01:20 IST

बहुप्रतीक्षित स्वच्छ सर्वेक्षण २०१८ चा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. महाराष्ट्र देशात स्वच्छतेच्या कामगिरीत दुसऱ्या क्रमांकाचे राज्य ठरले. तथापि, राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारप्राप्त शहरांच्या ‘नंबर गेम’मध्ये शहराचा समावेश नसल्याने अमरावतीकरांच्या पदरी पुन्हा एकदा निराशा पडली आहे.

ठळक मुद्देशहरनिहाय गुणांकनाकडे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : बहुप्रतीक्षित स्वच्छ सर्वेक्षण २०१८ चा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. महाराष्ट्र देशात स्वच्छतेच्या कामगिरीत दुसऱ्या क्रमांकाचे राज्य ठरले. तथापि, राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारप्राप्त शहरांच्या ‘नंबर गेम’मध्ये शहराचा समावेश नसल्याने अमरावतीकरांच्या पदरी पुन्हा एकदा निराशा पडली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाला आता केवळ स्वच्छता रँकिंगची प्रतिक्षा लागून राहिली आहे.जानेवारी ते मार्च २०१८ या कालावधीत स्वच्छ सर्वेक्षण २०१८ घेण्यात आले होते. ४ हजार गुणांच्या या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेचा निकाल बुधवारी घोषित करण्यात आला. त्यातील विविध राष्ट्रीय तथा राज्यपातळीवरील ‘स्वच्छ’ पुरस्कारात अमरावतीचा टिकाव लागलेला नाही. त्यामुळे स्पर्धेत असलेली एकूण ४०४१ शहरे व त्यातील ५०० अमृत शहरांच्या तुलनेत अमरावती शहराचे स्वच्छता रॅकिंग नेमके किती? याबाबत जाणून घेण्याची औपचारिकताच तेवढी शिल्लक आहे. पुरस्कारप्राप्त शहरांच्या यादीत कुठल्याही ‘कॅटेगरी’त नाव नसल्याने गतवर्षीच्या २३३ व्या क्रमांकावरुन शहर पुढे सरकते की पहिल्या शंभर क्रमांकात येते, याकडे प्रशासनाचे लक्ष लागले आहे. दरम्यान शहराचे मानांकन जाणून घेण्याची उत्सूकता लागलेल्या महापालिका आयुक्त हेमंत पवार यांनी बुधवारी नगरविकास विभागासह स्वच्छ भारत मिशनशी संपर्क साधून अमरावतीच्या निकालाबाबत विचारणा केली. मात्र बुधवारी निवडक पुरस्कार घोषित करण्यात आले असून संपुर्ण देशातील ४०४१ शहरांचे स्वच्छता रॅकिंग पारितोषिक वितरणावेळी घोषित करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली. त्यामुळे स्वच्छ सर्वेक्षणात शहर कोणत्या क्रमांकावर ही उत्सुकता गुरुवारपर्यंत शमू शकली नव्हती. केंद्रिय गृहनिर्माण व शहरी विकास राज्यमंत्री हरदीप सिंग पुरी यांनी नवी दिल्ली येथे स्वच्छ सर्वेक्षण २०१८ चा निकाल जाहीर केला. इंदूर हे सलग दुसºया वर्षी देशातील पहिल्या क्रमांकाचे ‘स्वच्छ’ शहर ठरले. तर भोपाळ व चंदीगढ या शहरांनी अनक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकाविला. नागपूर स्वच्छ सर्वेक्षणात देशातील नाविन्यपूर्ण व उत्कृष्ट कार्यशैली असणारे शहर ठरले आहे, तर नवी मुंबई शहर घनकचरा व्यवस्थापनात देशात सर्वोत्तम ठरले आहे. परभणी शहर नागरिकांच्या प्रतिसादात उत्कृष्ट ठरले आहे, तर भिवंडी शहरास गतिमान मध्यम शहर हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. बृहन्मुंबई शहरास सर्वोत्कृष्ट राजधानीचे स्वच्छ शहर असा पुरस्कार जाहीर झाला आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती