शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

‘नंबर गेम’मधून शहर बाद; केवळ रँकिंगची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 01:20 IST

बहुप्रतीक्षित स्वच्छ सर्वेक्षण २०१८ चा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. महाराष्ट्र देशात स्वच्छतेच्या कामगिरीत दुसऱ्या क्रमांकाचे राज्य ठरले. तथापि, राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारप्राप्त शहरांच्या ‘नंबर गेम’मध्ये शहराचा समावेश नसल्याने अमरावतीकरांच्या पदरी पुन्हा एकदा निराशा पडली आहे.

ठळक मुद्देशहरनिहाय गुणांकनाकडे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : बहुप्रतीक्षित स्वच्छ सर्वेक्षण २०१८ चा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. महाराष्ट्र देशात स्वच्छतेच्या कामगिरीत दुसऱ्या क्रमांकाचे राज्य ठरले. तथापि, राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारप्राप्त शहरांच्या ‘नंबर गेम’मध्ये शहराचा समावेश नसल्याने अमरावतीकरांच्या पदरी पुन्हा एकदा निराशा पडली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाला आता केवळ स्वच्छता रँकिंगची प्रतिक्षा लागून राहिली आहे.जानेवारी ते मार्च २०१८ या कालावधीत स्वच्छ सर्वेक्षण २०१८ घेण्यात आले होते. ४ हजार गुणांच्या या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेचा निकाल बुधवारी घोषित करण्यात आला. त्यातील विविध राष्ट्रीय तथा राज्यपातळीवरील ‘स्वच्छ’ पुरस्कारात अमरावतीचा टिकाव लागलेला नाही. त्यामुळे स्पर्धेत असलेली एकूण ४०४१ शहरे व त्यातील ५०० अमृत शहरांच्या तुलनेत अमरावती शहराचे स्वच्छता रॅकिंग नेमके किती? याबाबत जाणून घेण्याची औपचारिकताच तेवढी शिल्लक आहे. पुरस्कारप्राप्त शहरांच्या यादीत कुठल्याही ‘कॅटेगरी’त नाव नसल्याने गतवर्षीच्या २३३ व्या क्रमांकावरुन शहर पुढे सरकते की पहिल्या शंभर क्रमांकात येते, याकडे प्रशासनाचे लक्ष लागले आहे. दरम्यान शहराचे मानांकन जाणून घेण्याची उत्सूकता लागलेल्या महापालिका आयुक्त हेमंत पवार यांनी बुधवारी नगरविकास विभागासह स्वच्छ भारत मिशनशी संपर्क साधून अमरावतीच्या निकालाबाबत विचारणा केली. मात्र बुधवारी निवडक पुरस्कार घोषित करण्यात आले असून संपुर्ण देशातील ४०४१ शहरांचे स्वच्छता रॅकिंग पारितोषिक वितरणावेळी घोषित करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली. त्यामुळे स्वच्छ सर्वेक्षणात शहर कोणत्या क्रमांकावर ही उत्सुकता गुरुवारपर्यंत शमू शकली नव्हती. केंद्रिय गृहनिर्माण व शहरी विकास राज्यमंत्री हरदीप सिंग पुरी यांनी नवी दिल्ली येथे स्वच्छ सर्वेक्षण २०१८ चा निकाल जाहीर केला. इंदूर हे सलग दुसºया वर्षी देशातील पहिल्या क्रमांकाचे ‘स्वच्छ’ शहर ठरले. तर भोपाळ व चंदीगढ या शहरांनी अनक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकाविला. नागपूर स्वच्छ सर्वेक्षणात देशातील नाविन्यपूर्ण व उत्कृष्ट कार्यशैली असणारे शहर ठरले आहे, तर नवी मुंबई शहर घनकचरा व्यवस्थापनात देशात सर्वोत्तम ठरले आहे. परभणी शहर नागरिकांच्या प्रतिसादात उत्कृष्ट ठरले आहे, तर भिवंडी शहरास गतिमान मध्यम शहर हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. बृहन्मुंबई शहरास सर्वोत्कृष्ट राजधानीचे स्वच्छ शहर असा पुरस्कार जाहीर झाला आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती