शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
3
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
4
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
5
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
6
मुकेश अंबानींचा पगार किती? आकडा वाचून विश्वास बसणार नाही, ५ वर्षांपासून एकदाही बदल नाही!
7
बापरे! आई-वडिलांच्या एका छोट्याशा चुकीचा मुलांना त्रास, चेहऱ्यावर पडतात पांढरे डाग
8
Video: २५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले...
9
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
10
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
11
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
12
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली
13
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
14
मुंबई-गोवा ‘वंदे भारत’ २० कोचची होणार? कधीपासून सेवा सुरू करणार? प्रवाशांचा तुफान प्रतिसाद
15
ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?
16
Shravan Purnima 2025: श्रावण पौर्णिमेला कोळीबांधव का करतात रामाची पूजा? जाणून घ्या कारण!
17
मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो 
18
मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)
19
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
20
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?

‘नंबर गेम’मधून शहर बाद; केवळ रँकिंगची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 01:20 IST

बहुप्रतीक्षित स्वच्छ सर्वेक्षण २०१८ चा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. महाराष्ट्र देशात स्वच्छतेच्या कामगिरीत दुसऱ्या क्रमांकाचे राज्य ठरले. तथापि, राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारप्राप्त शहरांच्या ‘नंबर गेम’मध्ये शहराचा समावेश नसल्याने अमरावतीकरांच्या पदरी पुन्हा एकदा निराशा पडली आहे.

ठळक मुद्देशहरनिहाय गुणांकनाकडे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : बहुप्रतीक्षित स्वच्छ सर्वेक्षण २०१८ चा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. महाराष्ट्र देशात स्वच्छतेच्या कामगिरीत दुसऱ्या क्रमांकाचे राज्य ठरले. तथापि, राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारप्राप्त शहरांच्या ‘नंबर गेम’मध्ये शहराचा समावेश नसल्याने अमरावतीकरांच्या पदरी पुन्हा एकदा निराशा पडली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाला आता केवळ स्वच्छता रँकिंगची प्रतिक्षा लागून राहिली आहे.जानेवारी ते मार्च २०१८ या कालावधीत स्वच्छ सर्वेक्षण २०१८ घेण्यात आले होते. ४ हजार गुणांच्या या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेचा निकाल बुधवारी घोषित करण्यात आला. त्यातील विविध राष्ट्रीय तथा राज्यपातळीवरील ‘स्वच्छ’ पुरस्कारात अमरावतीचा टिकाव लागलेला नाही. त्यामुळे स्पर्धेत असलेली एकूण ४०४१ शहरे व त्यातील ५०० अमृत शहरांच्या तुलनेत अमरावती शहराचे स्वच्छता रॅकिंग नेमके किती? याबाबत जाणून घेण्याची औपचारिकताच तेवढी शिल्लक आहे. पुरस्कारप्राप्त शहरांच्या यादीत कुठल्याही ‘कॅटेगरी’त नाव नसल्याने गतवर्षीच्या २३३ व्या क्रमांकावरुन शहर पुढे सरकते की पहिल्या शंभर क्रमांकात येते, याकडे प्रशासनाचे लक्ष लागले आहे. दरम्यान शहराचे मानांकन जाणून घेण्याची उत्सूकता लागलेल्या महापालिका आयुक्त हेमंत पवार यांनी बुधवारी नगरविकास विभागासह स्वच्छ भारत मिशनशी संपर्क साधून अमरावतीच्या निकालाबाबत विचारणा केली. मात्र बुधवारी निवडक पुरस्कार घोषित करण्यात आले असून संपुर्ण देशातील ४०४१ शहरांचे स्वच्छता रॅकिंग पारितोषिक वितरणावेळी घोषित करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली. त्यामुळे स्वच्छ सर्वेक्षणात शहर कोणत्या क्रमांकावर ही उत्सुकता गुरुवारपर्यंत शमू शकली नव्हती. केंद्रिय गृहनिर्माण व शहरी विकास राज्यमंत्री हरदीप सिंग पुरी यांनी नवी दिल्ली येथे स्वच्छ सर्वेक्षण २०१८ चा निकाल जाहीर केला. इंदूर हे सलग दुसºया वर्षी देशातील पहिल्या क्रमांकाचे ‘स्वच्छ’ शहर ठरले. तर भोपाळ व चंदीगढ या शहरांनी अनक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकाविला. नागपूर स्वच्छ सर्वेक्षणात देशातील नाविन्यपूर्ण व उत्कृष्ट कार्यशैली असणारे शहर ठरले आहे, तर नवी मुंबई शहर घनकचरा व्यवस्थापनात देशात सर्वोत्तम ठरले आहे. परभणी शहर नागरिकांच्या प्रतिसादात उत्कृष्ट ठरले आहे, तर भिवंडी शहरास गतिमान मध्यम शहर हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. बृहन्मुंबई शहरास सर्वोत्कृष्ट राजधानीचे स्वच्छ शहर असा पुरस्कार जाहीर झाला आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती