शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
3
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
4
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
5
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
6
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
7
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
8
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
9
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
10
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
11
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
12
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
13
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
14
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
15
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
16
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
17
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
18
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
19
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
20
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!

एलईडी दिव्यांनी शहर लखलखणार

By admin | Updated: October 22, 2015 00:13 IST

‘स्मार्ट सिटी’ उपक्रमात अमरावती शहराचा समावेश झाल्याच्या पार्श्वभूमीवर आता एलईडी दिव्यांनी शहर प्रकाशमय करण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेने घेतला.

स्मार्ट सिटीच्या दिशेने पाऊल : ३६ कोटींचा खर्च अपेक्षित, ई-निविदा प्रक्रियेतून खरेदीअमरावती : ‘स्मार्ट सिटी’ उपक्रमात अमरावती शहराचा समावेश झाल्याच्या पार्श्वभूमीवर आता एलईडी दिव्यांनी शहर प्रकाशमय करण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेने घेतला. त्याकरिता ३६ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. पुणे येथील सायन्स अ‍ॅन्ड टेक्नॉलॉजी पार्क या एजन्सीने डीपीआर तयार केला असून मंगळवारी त्याचे सादरीकरण झाले.एलईडी बल्बचा वापर करण्याचे धोरण े शासनाचे आहे. त्यानुसार ऊर्जा बचत, खर्चात कपात करण्यासाठी शहरात आता एलईडी दिव्यांचा वापर केला जाणार असल्याचे आयुक्त गुडेवारांनी सर्वसाधारण सभेत स्पष्ट केले. दरम्यान सभेत पुणे येथील ‘सायन्स अ‍ॅन्ड टेक्नॉलॉजी पार्क एजन्सी’चे रानडे यांनी प्रात्यक्षिक सादरीकरण दरम्यान नगरसेवकांना मार्गदर्शन करताना काही प्रश्नांचे निराकरण केले. प्रदीप दंदे, प्रदीप बाजड, निलिमा काळे, चेतन पवार आदींनी काही मुद्दे उपस्थित करुन एलईडी दिवे वापरामागील कारणमिमांसा जाणून घेतली. पथदिवे बंद-सुरू करण्याची प्रक्रिया स्वयंचलित असावी, असा सूर नगरसेवकांचा होता. मात्र, एलईडी बल्बचा वापर केल्यास वीज बचत, खर्चात कपात होईल, ही बाब आयुक्तांनी स्पष्ट केली. यासाठी ३६ कोटींचा खर्च अपेक्षित आहे.महापालिका इमारत, पथदिवे, झोन कार्यालये, उद्याने आदी जागेवर एलईडी दिवे प्रस्तावित आहेत.निविदेअंती ब्राण्डेड कंपन्याचे एलईडी खरेदी करणारशहरात एलईडी दिव्यांच्या लखलखाटासाठी ब्राण्डेड कंपन्यांनी तयार केलेले दिवे खरेदी केले जातील. ही निविदा प्रक्रिया ‘ई’ पध्दतीने होईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. एलईडी दिव्यांचे आयुष्य १३ वर्षांचे राहत असून त्यानुसार करारनामा केला जाणार आहे.सव्वा दोन कोटींची वीज चोरीमहापालिकेला महिन्याकाठी पावणेदहा कोटी रुपयांचे वीज बिल येत असून यात सव्वा दोन कोटी रुपयांची वीज चोरी होत असल्याची कबुली आयुक्त गुडेवार यांनी दिली. वीज चोरी रोखण्यासाठी तसेच ऊर्जा बचतीचे धोरण लागू करण्यासाठी एलईडी दिव्यांचा वापर नितांत गरजेचा आहे, असे आयुक्त म्हणाले.चोरी जाणाऱ्या वीज खांबांवरही चर्चाशहरात जागोजागी विजेचे खांब पडले आहेत. मात्र, हे खांब स्थलांतरित करण्यास विलंब होत असल्याने चोरटे ते चोरुन नेत असल्याची बाब जावेद मेमन, अविनाश् मार्डीकर, मो. इमरान, दिगंबर डहाके, संजय अग्रवाल आदींनी निदर्शनास आणून दिली. नगरसेवकांच्या मागणीनुसार हे विजेचे खांब स्थलांतरीत करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.