शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
3
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
4
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
5
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
6
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
7
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
8
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
9
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
10
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
11
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
12
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
13
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
14
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
15
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
16
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
17
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
18
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
19
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
20
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…

शहर काँग्रेसची जिल्हाकचेरीवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 01:13 IST

केंद्र व राज्य शासनाने ऐन दिवाळीच्या तोंडावर गोर-गरिबांना रेशन दुकानातून दिली जाणारी साखर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देनिवेदन : साखरेचा पुरवठा पूर्ववत करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : केंद्र व राज्य शासनाने ऐन दिवाळीच्या तोंडावर गोर-गरिबांना रेशन दुकानातून दिली जाणारी साखर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजप शासनाच्या या निर्णयाचा शहर काँग्रेसने निषेध केला. हा अन्यायकारक निर्णय मागे घेण्याची मागणी करीत जिल्हाकचेरीवर शुक्रवारी धडक दिली. यावेळी माजी आमदार रावसाहेब शेखावत, काँग्रेसचे शहराध्यक्ष किशोर बोरकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाºयांना निवेदन सोपविण्यात आले.भाजप सरकारने शेतकºयांना अद्यापही कर्जमाफीचा लाभ दिला नाही. अशातच वाढत्या महागाईमुळे गोरगरीब नागरीकांचे जगणे कठीण झाले आहे. परिणामीे जनतेत संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे हा निर्णय त्वरीत मागे घेण्यात यावा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. सध्या राज्यभरातील ४५ लाख कुटुंबांना रेशन दुकानातून मिळणारी साखर बंद केली आहे. परिणामी या निर्णयाचा फटका जिल्ह्यातील ३ लाखांवर एपीएल, बीपीएल कार्डधारकांना बसला आहे. प्रत्येकी ५ युनिट याप्रमाणे व्यक्तीनुसार महिन्याकाठी १ लाख ८३ हजार २६२ क्विंटल साखर बंद केली आहे. त्यामुळे शासनाने अंत्योदयसह एपीएल, बीपीएल, कार्डधारकांना रेशन दुकानातून पूर्वरत दिवाळीपूर्वी साखर वाटप करावे, काँग्रेस सरकारच्या काळात देशातील गरिबांसाठी सुरू केलेल्या अंत्योदय योजनेत तीन रूपये किलो तांदूळ, २१ रुपये किलो गहू व १ रुपये किलो ज्वारी ही योजना नियमितपणे सुरू करावी, आदी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत शासनाकडे पाठविले आहे. यासंदर्भात योग्य कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी अभिति बांगर यांनी दिले. यावेळी विलास इंगोले, बबलू शेखावत, माजी आ. केवलराम काळे, हरीभाऊ मोहोड, पुरूषोत्तम मुंदडा, अभिनंदन पेंढारी, उत्तमराव भैसने, सुरेश स्वर्गे, चंद्रभागा इंगोले, योगिता गिरासे, राहूल येवले, अक्षय भुयार, मनोज भेले, अनिल माधोगडीया, मिर साजीद अली, भैय्यासाहेब निचळ, बी.आर. देशमुख, नाना सोनी, वंदना कंगाले, देवायनी कुर्वे, संजय वाघ, साहेबराव घोगरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.रेशन दुकानासमोर लागणार फलकशहरासह जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांमध्ये धान्याचे दरफलक नाहीत. त्यामुळे रेशनकार्ड धारकांना दुकान उघडण्याची व बंद होण्याची वेळ कळत नाही. एवढेच नव्हे तर दूकाने बरेचदा बंद असतात. त्यामुळे धान्यापासून लाभधारक वंचित राहतात, ही बाब लक्षात घेता रविवारीही दुकाने सुरू ठेवावीत. फलकावर तक्रारीसाठी टोल फ्रि क्रमांक,संर्पकासाठी अधिकाºयांचे नाव व मोबाईल नंबर असावा, अशी मागणी किशोर बोरकर यांनी केली. ही मागणी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी तुर्तास मान्य केली.