शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

शहर काँग्रेसची जिल्हाकचेरीवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 01:13 IST

केंद्र व राज्य शासनाने ऐन दिवाळीच्या तोंडावर गोर-गरिबांना रेशन दुकानातून दिली जाणारी साखर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देनिवेदन : साखरेचा पुरवठा पूर्ववत करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : केंद्र व राज्य शासनाने ऐन दिवाळीच्या तोंडावर गोर-गरिबांना रेशन दुकानातून दिली जाणारी साखर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजप शासनाच्या या निर्णयाचा शहर काँग्रेसने निषेध केला. हा अन्यायकारक निर्णय मागे घेण्याची मागणी करीत जिल्हाकचेरीवर शुक्रवारी धडक दिली. यावेळी माजी आमदार रावसाहेब शेखावत, काँग्रेसचे शहराध्यक्ष किशोर बोरकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाºयांना निवेदन सोपविण्यात आले.भाजप सरकारने शेतकºयांना अद्यापही कर्जमाफीचा लाभ दिला नाही. अशातच वाढत्या महागाईमुळे गोरगरीब नागरीकांचे जगणे कठीण झाले आहे. परिणामीे जनतेत संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे हा निर्णय त्वरीत मागे घेण्यात यावा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. सध्या राज्यभरातील ४५ लाख कुटुंबांना रेशन दुकानातून मिळणारी साखर बंद केली आहे. परिणामी या निर्णयाचा फटका जिल्ह्यातील ३ लाखांवर एपीएल, बीपीएल कार्डधारकांना बसला आहे. प्रत्येकी ५ युनिट याप्रमाणे व्यक्तीनुसार महिन्याकाठी १ लाख ८३ हजार २६२ क्विंटल साखर बंद केली आहे. त्यामुळे शासनाने अंत्योदयसह एपीएल, बीपीएल, कार्डधारकांना रेशन दुकानातून पूर्वरत दिवाळीपूर्वी साखर वाटप करावे, काँग्रेस सरकारच्या काळात देशातील गरिबांसाठी सुरू केलेल्या अंत्योदय योजनेत तीन रूपये किलो तांदूळ, २१ रुपये किलो गहू व १ रुपये किलो ज्वारी ही योजना नियमितपणे सुरू करावी, आदी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत शासनाकडे पाठविले आहे. यासंदर्भात योग्य कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी अभिति बांगर यांनी दिले. यावेळी विलास इंगोले, बबलू शेखावत, माजी आ. केवलराम काळे, हरीभाऊ मोहोड, पुरूषोत्तम मुंदडा, अभिनंदन पेंढारी, उत्तमराव भैसने, सुरेश स्वर्गे, चंद्रभागा इंगोले, योगिता गिरासे, राहूल येवले, अक्षय भुयार, मनोज भेले, अनिल माधोगडीया, मिर साजीद अली, भैय्यासाहेब निचळ, बी.आर. देशमुख, नाना सोनी, वंदना कंगाले, देवायनी कुर्वे, संजय वाघ, साहेबराव घोगरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.रेशन दुकानासमोर लागणार फलकशहरासह जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांमध्ये धान्याचे दरफलक नाहीत. त्यामुळे रेशनकार्ड धारकांना दुकान उघडण्याची व बंद होण्याची वेळ कळत नाही. एवढेच नव्हे तर दूकाने बरेचदा बंद असतात. त्यामुळे धान्यापासून लाभधारक वंचित राहतात, ही बाब लक्षात घेता रविवारीही दुकाने सुरू ठेवावीत. फलकावर तक्रारीसाठी टोल फ्रि क्रमांक,संर्पकासाठी अधिकाºयांचे नाव व मोबाईल नंबर असावा, अशी मागणी किशोर बोरकर यांनी केली. ही मागणी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी तुर्तास मान्य केली.