शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

शहर काँग्रेसची जिल्हाकचेरीवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 01:13 IST

केंद्र व राज्य शासनाने ऐन दिवाळीच्या तोंडावर गोर-गरिबांना रेशन दुकानातून दिली जाणारी साखर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देनिवेदन : साखरेचा पुरवठा पूर्ववत करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : केंद्र व राज्य शासनाने ऐन दिवाळीच्या तोंडावर गोर-गरिबांना रेशन दुकानातून दिली जाणारी साखर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजप शासनाच्या या निर्णयाचा शहर काँग्रेसने निषेध केला. हा अन्यायकारक निर्णय मागे घेण्याची मागणी करीत जिल्हाकचेरीवर शुक्रवारी धडक दिली. यावेळी माजी आमदार रावसाहेब शेखावत, काँग्रेसचे शहराध्यक्ष किशोर बोरकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाºयांना निवेदन सोपविण्यात आले.भाजप सरकारने शेतकºयांना अद्यापही कर्जमाफीचा लाभ दिला नाही. अशातच वाढत्या महागाईमुळे गोरगरीब नागरीकांचे जगणे कठीण झाले आहे. परिणामीे जनतेत संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे हा निर्णय त्वरीत मागे घेण्यात यावा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. सध्या राज्यभरातील ४५ लाख कुटुंबांना रेशन दुकानातून मिळणारी साखर बंद केली आहे. परिणामी या निर्णयाचा फटका जिल्ह्यातील ३ लाखांवर एपीएल, बीपीएल कार्डधारकांना बसला आहे. प्रत्येकी ५ युनिट याप्रमाणे व्यक्तीनुसार महिन्याकाठी १ लाख ८३ हजार २६२ क्विंटल साखर बंद केली आहे. त्यामुळे शासनाने अंत्योदयसह एपीएल, बीपीएल, कार्डधारकांना रेशन दुकानातून पूर्वरत दिवाळीपूर्वी साखर वाटप करावे, काँग्रेस सरकारच्या काळात देशातील गरिबांसाठी सुरू केलेल्या अंत्योदय योजनेत तीन रूपये किलो तांदूळ, २१ रुपये किलो गहू व १ रुपये किलो ज्वारी ही योजना नियमितपणे सुरू करावी, आदी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत शासनाकडे पाठविले आहे. यासंदर्भात योग्य कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी अभिति बांगर यांनी दिले. यावेळी विलास इंगोले, बबलू शेखावत, माजी आ. केवलराम काळे, हरीभाऊ मोहोड, पुरूषोत्तम मुंदडा, अभिनंदन पेंढारी, उत्तमराव भैसने, सुरेश स्वर्गे, चंद्रभागा इंगोले, योगिता गिरासे, राहूल येवले, अक्षय भुयार, मनोज भेले, अनिल माधोगडीया, मिर साजीद अली, भैय्यासाहेब निचळ, बी.आर. देशमुख, नाना सोनी, वंदना कंगाले, देवायनी कुर्वे, संजय वाघ, साहेबराव घोगरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.रेशन दुकानासमोर लागणार फलकशहरासह जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांमध्ये धान्याचे दरफलक नाहीत. त्यामुळे रेशनकार्ड धारकांना दुकान उघडण्याची व बंद होण्याची वेळ कळत नाही. एवढेच नव्हे तर दूकाने बरेचदा बंद असतात. त्यामुळे धान्यापासून लाभधारक वंचित राहतात, ही बाब लक्षात घेता रविवारीही दुकाने सुरू ठेवावीत. फलकावर तक्रारीसाठी टोल फ्रि क्रमांक,संर्पकासाठी अधिकाºयांचे नाव व मोबाईल नंबर असावा, अशी मागणी किशोर बोरकर यांनी केली. ही मागणी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी तुर्तास मान्य केली.