शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

शहरबस दरवाढ दुपटीने!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 00:55 IST

शहर बससेचे दर वाढविण्याचा निर्णय मागील आमसभेत घेण्यात आला. त्यानंतर लगेच शहर बस सेवेचे दर दुपटीने वाढविण्यात आले. यासाठी डिझेल दरवाढीचे कारण देण्यात आले असले तरी प्रवास भाडेवाढ केली असली तरी प्रवाशांना सुविधेचा अभाव असल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहे.

ठळक मुद्देप्रवाशांना सुविधा कुठे? : डिझेलच्या दरवाढीचे दर्शविले कारण

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहर बससेचे दर वाढविण्याचा निर्णय मागील आमसभेत घेण्यात आला. त्यानंतर लगेच शहर बस सेवेचे दर दुपटीने वाढविण्यात आले. यासाठी डिझेल दरवाढीचे कारण देण्यात आले असले तरी प्रवास भाडेवाढ केली असली तरी प्रवाशांना सुविधेचा अभाव असल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहे.शहर बससेवेच्या प्रवासी वाहतुकीचे दर डिझेल ५६ रूपये लिटर असतानाचे आहेत. आता डिझेलचे ७५ दर झाल्याने शहर बससेवेच्या प्रवासी भाड्यात वाढ करण्याचा प्रस्ताव यापूर्वीच्या आमसभेत सभापतींनी मांडला असता, ही भाववाढ कशा पद्धतीची राहील, याविषयीचा प्रस्ताव पहिले सभागृहासमोर ठेवावा, अशी मागणी काही सदस्यांनी केली होती. मात्र, याच आमसभेत प्रवास भाडेवाढीस मंजुरी दिली होती. त्यामुळे शहर बस वाहतुकीत सुविधा वाढवाव्यात, अशी मागणी होत आहे.महापालिकेचा शहर बससेवेचा कंत्राट ज्या कंपनीकडे आहे, त्यांच्याद्वारा अनेक मार्गांवर बससेवा मिळत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. या कंपनीद्वारा शहरात केवळ २५ बसेसद्वारा वाहतूक सुविधा देण्यात येते. मात्र, शहराचा विस्तार झाल्याने ही सेवा तोकडी पडत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.महापालिका क्षेत्रात सन २००६ पासून शहर बससेवा उपक्रम राबवित आहेत. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाद्वारा १ मार्च २०१४ पासून सुधारित तिकिटांच्या दरपत्रकास मंजुरी प्रदान केल्यानंतर याच दराने आतापर्यंत तिकीट विक्री करण्यात येत होती. डिझेलचे दर व वाहानाचे सुटे भाग यांच्या दरात वाढ झाल्याने तिकिटांच्या दरात वाढ करण्याची मागणी कंत्राटदाराने केली होती.या दरवाढीच्या प्रस्तावास आयुक्तांनी एक सप्टेंबर व प्राधिकरणाने ९ आॅक्टोबर रोजी मंजुरी प्रदान केलेली आहे. आता आमसभेच्या मंजुरीनंतर ही दरवाढ लागू करण्यात आली आहे. मात्र, नागरिकांचा याला विरोध आहे.अशी झाली दरवाढसध्या दोन किमी अंतरापर्यंत प्रौढांचे आठ रूपये, तर बालकांचे चार रूपये, दोन ते चार किमी अंतरापर्यंत प्रौढांचे दहा रूपये, तर बालकांचे पाच रूपये, चार ते सहा किमी अंतरापर्यंत प्रौढांचे १३ रूपये, तर बालकांचे सात रूपये, सहा ते १० किमी अंतरांपर्यंत प्रौढांसाठी १५ रूपये व बालकांसाठी आठ रूपये, दहा ते १४ किमी अंतरापर्यंत प्रौढांसाठी २० रूपये, तर बालकांसाठी १० रूपये, १४ ते १८ किमी अंतरापर्यंत प्रौढांसाठी २५ रूपये, बालकांसाठी १३ रूपये व १८ ते २२ किमी अंतरापर्यंत प्रौढांसाठी २८ रूपये व बालकांसाठी १४ रूपयांनी ही दरवाढ झालेली आहे.२० किमीपर्यंत सेवाही विस्तारणारशहरालगतच्या नांदगाव पेठ एमआयडीसी, वलगाव, भातकुली, ांजनगाव बारी, कोंडेश्वर, लोणी आणि एसआरपीएफजवळील वैष्णोदेवी मंदिरापर्यत शहर बस सेवा सुरू करण्यात येणार आहे. या सर्व ठिकाणावरून अमरावती शहरासाठी ही बससेवा राहणार असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. शहरालगतच्या या भागातील नागरिकांचे दैंनदिन व्यवहार शहराशी असतांना या ठिकाणी बससेवेचा अभाव असल्यामुळे नागरिकांना अ‍ॅटोशिवाय पर्याय नव्हता . याविषयीचा प्रस्ताव जिल्हा वाहतुक प्रधिकरणाकडे पाठविलाअसल्याची माहिती आहे.