शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
2
कोल्हापुरकरांचा नादच खुळा! वनताराचे पथक दुसऱ्यांदा दाखल, महास्वामींची भेट घेणार
3
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
4
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
5
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
6
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
7
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
8
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
9
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
10
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
11
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
12
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
13
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
14
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?
15
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
16
अभिमानास्पद! मित्रांनी वडिलांची उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवतेय फुटबॉलचं मैदान
17
"महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात’’, काँग्रेसची मागणी
18
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
19
महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमाचं काय झालं? मुख्य अभिनेता म्हणाला...
20
मच्छर घुसला की काम तमाम...! घरासाठी लेझर गायडेड एअर डिफेन्स सिस्टीम आली; दिसताच आडवा करणार...

ग्रामीण रुग्णालयात नागरिकांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2018 23:27 IST

आॅनलाईन लोकमतवरूड : शनिवारी रात्री १० वाजताच्या सुमारास पुसलाकडून येणाऱ्या टिप्परने दुचाकीला धडक दिली. यात दोघे ठार, तर तिसरा गंभीर जखमी झाला. रस्त्याचे काम सुरू असल्याने वरूडमध्ये अपघातांचे प्रमाण वाढल्याने नागरिकांमध्ये असंतोष पसरला असून, अपघातामुळे तो उफाळून आला. परिणामी रविवारी नागरिकांनी ग्रामीण रुग्णालयासमोर ठिय्या दिला. यावेळी काही काळ तणावाची स्थिती निर्माण ...

ठळक मुद्देराजकीय पक्ष एकवटले : बेताल वाहतुकीचे आणखी किती बळी?

आॅनलाईन लोकमतवरूड : शनिवारी रात्री १० वाजताच्या सुमारास पुसलाकडून येणाऱ्या टिप्परने दुचाकीला धडक दिली. यात दोघे ठार, तर तिसरा गंभीर जखमी झाला. रस्त्याचे काम सुरू असल्याने वरूडमध्ये अपघातांचे प्रमाण वाढल्याने नागरिकांमध्ये असंतोष पसरला असून, अपघातामुळे तो उफाळून आला. परिणामी रविवारी नागरिकांनी ग्रामीण रुग्णालयासमोर ठिय्या दिला. यावेळी काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती.शनिवारी झालेल्या अपघातात सिद्धार्थ काशीराव रामटेके (३५ रा. हातुर्णा), मोरेश्वर रामराव शेरेकर (४५ रा. वाठोडा) यांचा मृत्यू झाला, तर दिनेश कुऱ्हाडे (शेंदूरजनाघाट) गंभीर जखमी असल्याने नागपूरला रेफर करण्यात आले. मृतदेहाचे रविवारी सकाळी शवविच्छेदन करण्यात आले. मात्र, या अपघातासाठी रस्ता बांधकाम करणारी कपंनी जबाबदार असल्याने १० लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करीत मृताच्या नातलगांसह राजकीय पक्षाच्या नेत्यांनी ठिय्या दिला. आ. अनिल बोंडे यांनी कंपनीच्या मालकांशी संवाद साधून मृताच्या नातेवाइकांना १० लाख रुपये आणि गंभीर जखमींना उपचाराचा खर्च देण्याचे आश्वासन मिळविले. यानंतर तणाव निवळला.ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक प्रमोद पोतदार यांनी शवविच्छेदनानंतर मृतदेह नातलगांच्या ताब्यात दिले. त्यांना रुग्णवाहिका देण्यात आली. तणावाची स्थिती पाहता तहसीलदार आशिष बिजवल, नायब तहसीलदार कमलाकर देशमुख, ठाणेदार गोरख दिवे, शेंदूरजनाघाटचे ठाणेदार शेषराव नितनवरे, सहायक पोलीस निरीक्षक विजय शिंगाडे, उपनिरीक्षक दिलीप श्रीराव यांनी तगडा बंदोबस्त ठेवला.आमदारांची गाडी अडविलीमृतांच्या नातेवाइकांचे सांत्वन करण्याकरिता आलेले आमदार बोंडे यांनी डॉक्टरांकडे विचारणा केली, तर मृतांच्या नातलगांची त्यांनी विचारपूस केली नसल्याने संतापलेल्या नागरिकांसह माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे, स्वाभिमानीचे देवेंद्र भुयार यांनी आमदारांची गाडी रोखून धरली. मृतांच्या नातलगांना दहा लाखांची मदत मिळवून द्या, अशी मागणी त्यांनी केली.कारवाईची मागणी!एस.जी. इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचा कामातील हलगर्जीपणा नागरिकांच्या जिवावर बेतत आहे. अनेकांना अपंगत्व आले, तर काहींचा मृत्यू झाला. याप्रकरणी कंपनीसह प्रशासनातील अधिकाºयांवरसुद्धा सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी काँग्रेसचे नेते नरेशचंद्र ठाकरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे देवेंद्र भुयार, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजाभाऊ कुकडे, कार्याध्यक्ष बाळू पाटील, गिरीश कराळे ,माजी सभापती नीलेश मगर्दे, सभापती विक्रम ठाकरे, विनोद धरमठोक, धनंजय बोकडे आदींनी केली.